शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेला धक्का देण्याच्या नादात नाशिकमध्ये भाजपत राडा; पक्षप्रवेशावरून तीन तास हाय व्होल्टेज ड्रामा
2
गरिबीमुळे आई-वडिलांचा गळफास; तर दोन तरुण मुलांची रेल्वेखाली आत्महत्या; हृदय पिळवटून टाकणारी नांदेड जिल्ह्यातील घटना
3
पवार ‘पाॅवर’ एकत्र? आघाडीची घोषणा लांबणीवर, अद्याप अंतिम प्रस्तावच नाही 
4
कुख्यात गणेश उईकेसह  ६ नक्षलवाद्यांचा खात्मा; मृतांमध्ये दोन महिला; ओडिशात कारवाई
5
हजारो प्रवासी बनले ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार; विमानतळावर उत्साह, कुतूहल; नवी मुंबईच्या अवकाशात विमानाची पहिली झेप 
6
जवानांना करता येणार नाही इन्स्टावर पोस्ट, कमेंट! सोशल मीडिया वापरावर लष्कराने आणले निर्बंध
7
नातेवाईकांसाठी दिग्गजांची ‘लॉबिंग’; मुंबईच्या रिंगणात कोणाचे नशीब उजळणार?
8
ठाकरे बंधूंची युती महाविकास आघाडीकरिता नाकापेक्षा मोती जड? वाटाघाटीत तणाव : शरद पवार गटाचा काँग्रेसवर कमी जागा स्वीकारण्याचा दबाव
9
कुणाला देवदर्शन, कुणाला फार्म हाऊसवर पार्ट्या, भेटवस्तू, सहली
10
दोन्ही राष्ट्रवादींचा ठाण्यातही ‘हम साथ साथ है...’चा नारा? नजीब मुल्ला म्हणतात, आव्हाड शत्रू नाहीत..!
11
भाजप माेठा पक्ष, त्यांनी जास्त जागा घेतल्या तर हरकत नाही : सरनाईक
12
दस्ताचा नोंदणी क्रमांक द्या, अन्‌ मिळवा बँकेकडून कर्ज
13
श्रीलंकेविरूद्ध टी-२० मालिका विजयासाठी भारत सज्ज; खराब फॉर्मशी झुंजणाऱ्या श्रीलंकेविरुद्ध आज तिसरा टी-२० सामना
14
आता प्रतिष्ठा जपण्याचे इंग्लंड संघापुढे आव्हान...
15
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
16
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
17
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
18
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
19
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
20
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
Daily Top 2Weekly Top 5

४४ बालकांना आरटीईचा आधार

By admin | Updated: May 29, 2014 00:34 IST

चेतन धनुरे , लातूर शिक्षणाचा अधिकार कायद्यानुसार पहिल्या टप्प्यात लातूर जिल्ह्यातील १३ नामांकित शाळांमधून ४४ बालकांना कोणत्याही प्रवेश शुल्काशिवाय मोफत प्रवेश देण्यात आला आहे़

 चेतन धनुरे , लातूर राज्य शासनाच्या शिक्षणाचा अधिकार कायद्यानुसार यंदाच्या पहिल्या टप्प्यात लातूर जिल्ह्यातील १३ नामांकित शाळांमधून ४४ बालकांना कोणत्याही प्रवेश शुल्काशिवाय मोफत प्रवेश देण्यात आला आहे़ आता शाळा सुरु होण्याच्या पार्श्वभूमीवर दुसरा टप्पा राबविण्यात येत असून, यावर्षी २५० हून अधिक बालकांना या योजनेचा लाभ मिळण्याबाबत शिक्षण विभागास आशा आहे़ मागील शैक्षणिक वर्षापासून शिक्षणाचा अधिकार कायद्यांतर्गत अनुदानित, विनाअनुदानित शाळांमध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल व वंचित घटकातील बालकांना मोफत प्रवेश देण्यात येत आहे़ गतवर्षी या योजनेंतर्गत लातूर जिल्ह्यातील २९ नामांकित शाळांमधून १५८ बालकांना पहिलीत प्रवेश देण्यात आला होता़ यावर्षीची प्रक्रिया सुरु झाली असून, पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील १३ शाळांमध्ये ४४ बालकांना मोफत प्रवेश देण्यात आला आहे़ त्यात लातुरातील नामांकित गोल्डक्रेस्ट हाय व सनशाईन इंग्लिश स्कूलमध्ये प्रत्येकी ५ तर श्री बंकटलाल लाहोटी व श्री श्री रवीशंकर इंग्लिश स्कूलमध्ये प्रत्येकी १ प्रवेश झाला आहे़ उदगीरमधील ३ नामांकित शाळांमधून १३, मुरुड येथे ६, चाकूर येथे १, निलंगा व किल्लारी येथे प्रत्येकी २, ताडमुगळी व शिरुर अनंतपाळमध्ये प्रत्येकी ४ असे एकूण ४४ प्रवेश या कायद्यातंर्गत झाले आहेत़ या योजनेंतर्गत जिल्ह्यातील जवळपास ११८ शाळांचा समावेश आहे़ या शाळांमध्ये शिक्षणाचा अधिकार कायद्यानुसार दुसर्‍या टप्प्यातील प्रवेश प्रक्रिया १ जूनपासून राबविण्यात येणार आहे़ त्यासाठी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने जोरदार तयारी सुरु केली आहे़ प्रवेशासंदर्भातील अडचणी सोडविण्यासाठी प्रत्येक तालुक्यास गटशिक्षणाधिकारी किंवा विस्तार अधिकारी व लातुरातील १२ नामांकित शाळांसाठी प्रत्येकी एका समन्वयकाची नियुक्ती करण्यात आली आहे़ शिक्षणाधिकारी सुधाकर तेलंग यांच्या सूचनेप्रमाणे लवकरच दर्शनी भागात बॅनर्सही लावले जाणार असल्याची माहिती विस्तार अधिकारी चव्हाण यांनी दिली़ कोणाला मिळणार लाभ़़़? वंचित घटकातून अनुसूचित जाती-जमाती व अपंग बालकांना या योजनेचा लाभ मिळतो़ तसेच वार्षिक उत्पन्न १ लाखाच्या आत असलेल्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील पालकाच्या पाल्यासही या योजनेंतर्गत प्रवेश घेता येतो़ मात्र प्रवेशपात्र बालकाचे पालक राहत असलेल्या घरापासून १ किलोमीटरच्या आतील किंवा त्याहून नजिकच्या शाळेतच प्रवेश घेता येईल़ आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकात जातीची अट नाही मात्र पालकाचे उत्पन्न १ लाखाच्या आत असल्याचे सक्षम अधिकार्‍याचे प्रमाणपत्र व रहिवासी प्रमाणपत्र आवश्यक आहे़ वंचित घटकास जात व रहिवासी प्रमाणपत्र गरजेचे आहे़ कशी आहे प्रक्रिया़़? पहिलीतील प्रवेशपात्र विद्यार्थीसंख्येच्या २५ टक्के जागा या योजनेंतर्गत राखीव आहेत़ पालक राहत असलेल्या घरापासून १ किमीच्या आतील शाळेच्या मुख्याध्यापकाकडून या योजनेचा प्रवेश अर्ज घेता येईल़ तो भरुन आवश्यक कागदपत्रांसह विहित मुदतीत शाळेकडे सादर करावा़ या अर्जाची छाननी करुन शाळा प्रवेशपात्र विद्यार्थ्यांची यादी शाळेत डकवेल़ जर प्रवेश अर्जात त्रुटी असतील तर त्या शाळेने संबंधित पालकास कळविणे बंधनकारक आहे़ त्रुटीची पूर्तता झाल्यानंतरच प्रवेश निश्चिती होईल़ जर एखाद्या शाळेत २५ टक्केपेक्षा जास्त अर्ज आले असतील तर त्या ठिकाणी सोडत पद्धतीने प्रवेश देण्यात येणार आहे़ ज्या शाळांमध्ये मुदतीत २५ टक्के जागा भरत नसतील तरी त्या शाळांना या जागांवर अन्य विद्यार्थ्यास प्रवेश देता येत नाही़ या कोट्यातून भरलेल्या विद्यार्थ्यांचा आठवीपर्यंतचा संपूर्ण शैक्षणिक खर्च शासन उचलणार आहे़