शहरं
Join us  
Trending Stories
1
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
2
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
3
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
4
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
5
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
6
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
7
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
8
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
9
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
10
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
11
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
12
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
13
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
14
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
15
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
16
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
17
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर
18
'निराधार आणि बेजबाबदार'; राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाने सोडले मौन, काय दिले उत्तर?
19
IND vs ENG 5th Test: Gus Atkinson चा 'पंजा'! टीम इंडियानं २० धावांत गमावल्या ४ विकेट्स! अन्...
20
सेबीच्या नियमांना फाटा देऊन शेअर्सची खरेदी-विक्री, पण धोकाही मोठा! 'ग्रे मार्केट'ची Inside Story

जुन्या पद्धतीने आजपासून आरटीईची प्रवेश प्रक्रिया सुरू; अनुदानित, सरकारी शाळा वगळल्या

By राम शिनगारे | Updated: May 17, 2024 13:32 IST

आरटीई प्रवेशासाठी पूर्वी ऑनलाइन फॉर्म भरलेल्या पालकांना पुन्हा ऑनलाइन फॉर्म भरावा लागेल.

छत्रपती संभाजीनगर : मागील काही महिन्यांपासून वादविवादात अडकलेली आरटीई प्रवेश प्रक्रिया पुन्हा एकदा जुन्याच पद्धतीने राबविण्यात येणार आहे. मात्र, आता इंग्रजी माध्यमाच्या स्वयंअर्थसहाय्यित शाळांमध्ये जागा शिल्लक राहिलेल्या नसल्यामुळे नवेच संकट निर्माण झाले आहे. दरम्यान, उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर थांबविण्यात आलेली आरटीई प्रवेश प्रक्रियेची शुक्रवारपासून (दि. १७) नव्याने सुरुवात होणार आहे.

राज्य शासनाने आरटीई कायद्यात केलेल्या बदलानंतर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात २,८३६ शाळांची प्रवेशासाठी नोंदणी करण्यात आली होती. मात्र, मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पुन्हा जुन्याच पद्धतीने प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. त्यामुळे मागील वर्षी असलेल्या ५७३ शाळांमध्येच आरटीईनुसार प्रवेश देण्यात येणार आहे. त्यामळे ३६ हजार १४३ जागांऐवजी ४ हजार ४४१ जागांवरच प्रवेश होणार आहेत. पूर्वी केलेली ऑनलाइन नोंदणीही पाण्यात गेली असून, पुन्हा एकदा दोनशे ते तीनशे रुपये खर्च करून नव्याने ऑनलाइन नोंदणी केली जाणार आहे.

आर्थिक दुर्बल घटकातील पालकांच्या पाल्यास शिक्षणाचा अधिकार मिळावा, यासाठी शिक्षण हक्क कायदा २००९ करण्यात आला. यांतर्गत खासगी शाळांमध्ये २५ टक्के जागांवर प्रवेश देण्यात येतात. त्यासाठीची शुल्क प्रतिपूर्ती शिक्षण विभागाकडून केली जाते. मात्र, शुल्क प्रतिपूर्ती वेळेत होत नसल्याने खासगी शाळा संचालकांचा आरटीई प्रवेशांना विरोध होता. तसेच शुल्क प्रतिपूर्तीची २,४०० कोटी रुपयांची रक्कम थकीत आहे. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने कायद्यात बदल करून शासकीय, अनुदानित व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये प्राधान्याने प्रवेश देण्याचा निर्णय घेतला. १५ एप्रिल ते १० मेपर्यंत नोंदणीची मुदत दिली होती. त्यापूर्वीच आरटीई कायद्यातील बदलाला मुंबई उच्च न्यायालयात याचिकेद्वारे आव्हान दिले होते. या कायद्याला न्यायालयाने स्थगिती दिल्यामुळे जुन्याच पद्धतीने प्रवेश करण्याची वेळ शिक्षण विभागावर आली आहे.

सावळा गोंधळ असणारी प्रक्रियाआरटीई प्रवेशासाठी पूर्वी ऑनलाइन फॉर्म भरलेल्या पालकांना पुन्हा ऑनलाइन फॉर्म भरावा लागेल. कष्टकरी आणि कामगार समुहातील सदर वर्ग हा फारसा सुशिक्षित नसल्यामुळे साहजिकच इंटरनेट कॅफेवर जाऊन २०० रुपये शुल्क देऊन फॉर्म भरले आहेत. पुन्हा हा भुर्दंड शेतकरी आणि कामगारवर्गातील पालकांना सहन करावा लागणार आहे.- प्रशांत साठे,अध्यक्ष, आरटीई पालक संघ

टॅग्स :Right To Educationशिक्षण हक्क कायदाAurangabadऔरंगाबाद