शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
5
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
6
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
7
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
8
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
9
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
10
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
11
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
12
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
14
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
15
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
16
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
17
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
18
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
19
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
20
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे

वाहून गेली १ लाख कोटींची शेतमाल उलाढाल !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2019 16:37 IST

विभागीय आयुक्तालयाचा अंदाज 

ठळक मुद्देमराठवाडा विभागात विदारक चित्र  अवकाळी पावसाने केले नुकसान

- विकास राऊत 

औरंगाबाद : मराठवाड्यातील खरीप हंगामाचे अवकाळी पावसाने नुकसान केल्यामुळे विभागातील कृषी उत्पादनातून होणाऱ्या अंदाजे १ लाख कोटींहून अधिक रुपयांच्या उलाढालीवर पाणी फेरले गेले आहे. खरीप हंगामात शेतकऱ्यांनी नांगरणी, मोगडणी, चरी पाडणे, बियाणे, निंदणे, खत खरेदी, युरिया आणि फवारणी, अंदाजे ४ वेळा वखरणी करण्यासाठी केलेला खर्च वाया गेला. आता सरकारी मदतीविना शेतकऱ्यांच्या हाती फारसे काही राहिले नाही. पूर्ण १०० टक्के खरीप हंगाम हाती लागला असता, तर मागील पाच वर्षांच्या तुलनेत यंदा कृषी उत्पादकता वाढण्याची शक्यता होती. 

यंदाच्या खरीप हंगामात पावसाने सुरुवातीला कमी-अधिक हजेरी लावली. आॅक्टोबर पूर्वार्धापर्यंत पिकांची पस्थिती चांगली असतानाच उत्तरार्धात परतीच्या पावसाने मराठवाड्याला झोडपले. त्यात हाती आलेल्या खरीप हंगामातील पिकांचे प्रचंड नुकसान झाले. ४२ लाख हेक्टवरील पिकांचे नुकसान झाले. मागील पाच वर्षांच्या तुलनेत यंदा पिकांची उत्पादकता चांगली राहील असा अंदाज होता. मात्र, पावसाने शेतकऱ्यांच्या तोंडी आलेला घास हिरावून नेला.

विभागात एकूण ५२ लाख ६५ हजार १६५.९६ हेक्टर खरीप हंगामाचे पेरणीलायक क्षेत्र आहे. त्यातील ४८ लाख ७० हजार १९४ हेक्टरवर खरिपाची पेरणी झाली. विभागातील ८ हजार ५१४ पैकी ८,४५० गावांना आॅक्टोबरमध्ये झालेल्या पावसाचा फटका बसला आहे. ४३ लाख १ हजार ४३६ पैकी ३० लाख २५ हजार ७६२ शेतकरी बाधित झाले. जिरायती आणि बागायती, फळबागा मिळून सुमारे ४१ लाख हेक्टर क्षेत्र आॅक्टोबर-नोव्हेंबरमध्ये झालेल्या पावसामुळे नष्ट झाले आहे. २,९०४ कोटी रुपयांची मदत शासनाकडून मिळण्याचा अहवाल शासनाकडे पाठविण्यात आला. त्यातील ८१९ कोटी रुपयांचा पहिला टप्पा विभागाला प्राप्त झाला आहे. दुसऱ्या टप्प्यात ५०० कोटींचे अनुदान मिळणे शक्य आहे. 

विभागीय प्रशासनाचे मत असे... खरीप हंगामातील ज्वारी, बाजरी, मका, तूर, मूग, उडीद, सोयाबीन, कापूस या पिकांतून होणाऱ्या आर्थिक उलाढालीचा हिशेब केलेला नाही किंवा तशी आकडेवारी, माहिती अजून संकलित केली नाही; परंतु १ लाख कोटींहून कमी-अधिक उलाढाल होत असावी, असा अंदाज आहे.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरीMarathwadaमराठवाडाAurangabadऔरंगाबाद