शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
4
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
5
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
6
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
7
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
8
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
9
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
10
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
11
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
13
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
14
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
15
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
16
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
17
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
18
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
19
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
20
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स

रिपाइं आठवले गटाचा मोठा निर्णय; दलित पँथर युथ विंग कार्यान्वित करण्याचा विचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2023 14:16 IST

छत्रपती संभाजीनगरात १४ ऑक्टोबरला पँथर सुवर्णमहोत्सवी कार्यक्रम

छत्रपती संभाजीनगर : समाजावर अन्याय- अत्याचार झाल्यानंतर जशास तसे उत्तर देणारे संघटन म्हणून दलित पँथरचा दरारा व धाक होता. आजही अन्याय- अत्याचार कमी झालेला नाही. त्यामुळे रिपाइं हे राजकीय आणि पँथर हे सामाजिक संघटन म्हणून कार्यान्वित करावे, अशा भावना कार्यकर्ते तसेच समाजातील विविध घटकांच्या आहेत. त्यानुसार रिपाइंच्या कोअर कमिटीमध्ये विचारमंथन सुरू आहे, असे या पक्षाचे प्रदेश कार्याध्यक्ष बाबूराव कदम यांनी सांगितले.

धम्मचक्र प्रवर्तन दिनी १४ ऑक्टोबरला दलित पँथरच्या सुवर्णमहोत्सवी वर्ष सांगता समारोहाचे आयोजन छत्रपती संभाजीनगर शहरात केले जाणार आहे. त्यानिमित्त पत्रकार परिषदेत रिपाइंचे प्रदेश कार्याध्यक्ष कदम यांनी सांगितले की, अन्याय- अत्याचाराविरुद्ध लढणारी संघटना म्हणून पँथरने वचक निर्माण केला होता. या संघटनेने आंबेडकरी चळवळीत लढाऊ कार्यकर्त्यांची मोठी फळी निर्माण केली. ९ जुलै २०२३ रोजी पँथरच्या स्थापनेला ५० वर्षे पूर्ण झाली. त्यानुसार या शहरात सुवर्णमहोत्सवी सांगता वर्षाचे औचित्य साधून १४ ऑक्टोबरला आमखास मैदानावर मोठा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. सायंकाळी ५ वाजता होणाऱ्या या मेळाव्याचे उद्घाटन रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते होणार असून, अध्यक्षस्थानी बाबूराव कदम असतील. 

या कार्यक्रमास ज्येष्ठ साहित्यिक अर्जुन डांगळे, रिपाइंचे प्रदेशाध्यक्ष राजा सरवदे, डॉ. ऋषिकेश कांबळे, गौतम सोनवणे ऐक्यवादी रिपाइंचे नेते दिलीप जगताप, मिलिंद शेळके, दौलत खरात, विजय सोनवणे, पप्पू कागदे, ब्रह्मानंद चव्हाण, आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. यावेळी किशोर थोरात, संजय ठोकळ, नागराज गायकवाड, अरविंद अवसरमल, दिलीप पाडमुख, राकेश पंडित, मनोज सरीन, सदानंद धांडे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :Ramdas Athawaleरामदास आठवलेAurangabadऔरंगाबादPoliticsराजकारण