शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणं युद्धासारखंच!
2
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
3
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
4
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
5
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
6
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
7
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
8
पहलगाम हल्ल्यानंतर भारतात होणारी मोठी स्पर्धा पुढे ढकलली
9
मायेची फुंकर! ब्रेकअप, स्ट्रेस, रागावर फक्त एकाच थेरपीने उपचार, उशी ठरतेय वेदनांवरची डॉक्टर
10
सलग ७ दिवसांच्या वाढीला ब्रेक! एफएमसीजी आणि रिअल्टीमुळे बाजार कोसळला; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
11
WhatsApp वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! अ‍ॅडव्हान्स्ड चॅट प्रायव्हसी फीचर आले, कसे वापरायचे जाणून घ्या
12
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार
13
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
14
दुसऱ्यांचा विनाश करणे हा धर्म नाही अधर्म आहे, शिक्षा झालीच पाहिजे - प्रेमानंद महाराज
15
‘पत्नीचे अनेक तरुणांशी अनैतिक संबंध, नशेच्या धुंदीत घालतात धिंगाणा, करतात अश्लील चाळे ’, पतीचे गंभीर आरोप, पुरावेही दिले   
16
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
17
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
18
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
19
जिद्द असावी तर अशी! अंगणवाडी ते IAS अधिकारी; ३ वेळा अपयश, मानली नाही हार, रचला इतिहास
20
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान

रिपाइं आठवले गटाचा मोठा निर्णय; दलित पँथर युथ विंग कार्यान्वित करण्याचा विचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2023 14:16 IST

छत्रपती संभाजीनगरात १४ ऑक्टोबरला पँथर सुवर्णमहोत्सवी कार्यक्रम

छत्रपती संभाजीनगर : समाजावर अन्याय- अत्याचार झाल्यानंतर जशास तसे उत्तर देणारे संघटन म्हणून दलित पँथरचा दरारा व धाक होता. आजही अन्याय- अत्याचार कमी झालेला नाही. त्यामुळे रिपाइं हे राजकीय आणि पँथर हे सामाजिक संघटन म्हणून कार्यान्वित करावे, अशा भावना कार्यकर्ते तसेच समाजातील विविध घटकांच्या आहेत. त्यानुसार रिपाइंच्या कोअर कमिटीमध्ये विचारमंथन सुरू आहे, असे या पक्षाचे प्रदेश कार्याध्यक्ष बाबूराव कदम यांनी सांगितले.

धम्मचक्र प्रवर्तन दिनी १४ ऑक्टोबरला दलित पँथरच्या सुवर्णमहोत्सवी वर्ष सांगता समारोहाचे आयोजन छत्रपती संभाजीनगर शहरात केले जाणार आहे. त्यानिमित्त पत्रकार परिषदेत रिपाइंचे प्रदेश कार्याध्यक्ष कदम यांनी सांगितले की, अन्याय- अत्याचाराविरुद्ध लढणारी संघटना म्हणून पँथरने वचक निर्माण केला होता. या संघटनेने आंबेडकरी चळवळीत लढाऊ कार्यकर्त्यांची मोठी फळी निर्माण केली. ९ जुलै २०२३ रोजी पँथरच्या स्थापनेला ५० वर्षे पूर्ण झाली. त्यानुसार या शहरात सुवर्णमहोत्सवी सांगता वर्षाचे औचित्य साधून १४ ऑक्टोबरला आमखास मैदानावर मोठा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. सायंकाळी ५ वाजता होणाऱ्या या मेळाव्याचे उद्घाटन रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते होणार असून, अध्यक्षस्थानी बाबूराव कदम असतील. 

या कार्यक्रमास ज्येष्ठ साहित्यिक अर्जुन डांगळे, रिपाइंचे प्रदेशाध्यक्ष राजा सरवदे, डॉ. ऋषिकेश कांबळे, गौतम सोनवणे ऐक्यवादी रिपाइंचे नेते दिलीप जगताप, मिलिंद शेळके, दौलत खरात, विजय सोनवणे, पप्पू कागदे, ब्रह्मानंद चव्हाण, आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. यावेळी किशोर थोरात, संजय ठोकळ, नागराज गायकवाड, अरविंद अवसरमल, दिलीप पाडमुख, राकेश पंडित, मनोज सरीन, सदानंद धांडे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :Ramdas Athawaleरामदास आठवलेAurangabadऔरंगाबादPoliticsराजकारण