शहरं
Join us  
Trending Stories
1
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
2
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
3
तुमचा गॅस एजन्सीवाला चांगली सेवा देत नाही? मोबाईल सिमप्रमाणे आता LPG गॅस कंपनी बदला
4
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
5
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
6
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
7
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
8
BCCIचे अध्यक्ष झालेले मिथुन मन्हास आहेत कोण? कधी वीरू-युवीच्या नेतृत्वाखाली खेळले, असा आहे रेकॉर्ड
9
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
10
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
11
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न
12
"सरकार मायबाप… आता कसं जगायचं?", अतिवृष्टीने हिरवी स्वप्नं चुराडली; राहेरीतील शेतकऱ्यांचा हंबरडा
13
प्रणितकडे इशारा करत वरुण धवन म्हणाला, 'इसने मेरा भी मजाक उडाया है!', कॉमेडियन म्हणतो...
14
आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा मोठा धक्का! 'या' कंपनीने ११,००० हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं
15
बीसीसीआयला मिळाला नवा अध्यक्ष, या माजी क्रिकेटपटूच्या नावावर झालं शिक्कामोर्तब
16
एस जयशंकर यांच्या संयुक्त राष्ट्रातील भाषणावर पाकिस्तान प्रतिक्रिया देऊन फसले; स्वतःला दहशतवादाचे अड्डे मानले
17
पाकिस्तानच्या नकवींचा कांगावा! म्हणे, इस्त्रायलने आमच्या ऑईल टँकरवर हल्ला केला, नंतर हुतींनी कब्जा केला
18
डोंबिवलीत त्या तरुणाने ११ व्या मजल्यावरुन उडी का मारली; धक्कादायक कारण आले समोर
19
'फुलवंती'सारखंच खऱ्या आयुष्यातही नकळत दुसऱ्या महिलेच्या प्रेमात पडलास तर? गश्मीर म्हणाला...
20
दिवाळीत बाइक खरेदीचा विचार करताय? ८०,००० रुपयांच्या बजेटमधील टॉप ५ पर्याय पाहा!

९५ हजार भुकेलेल्यांना अन्न पोहोचविणारी युवकांची ‘रॉबिनहुड आर्मी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2019 12:57 IST

समारंभातील शिल्लक अन्न पोहोचवितात भुकेलेल्यांपर्यंत

ठळक मुद्देसध्या देशातील १३० पेक्षा अधिक शहरांमध्ये हा उपक्रम सुरू आहे. २० पेक्षा अधिक सामाजिक उपक्रम 

- राम शिनगारे 

औरंगाबाद : १६ सप्टेंबर २०१८ पासून रॉबिनहुड आर्मी नावाने एकत्र आलेल्या शहरातील ३७० युवकांनी नऊ महिन्यांमध्ये ९५ हजारांहून अधिक भुकेलेल्यांना अन्नाचा घास भरविला आहे.  विविध लग्नकार्य, समारंभात शिल्लक राहिलेले अन्न भुकेलेल्यांपर्यंत पोहोचविण्याचे कार्य शहरातील सीए, डॉक्टर, विधिज्ञांसह महाविद्यालयात शिक्षण घेत असलेले युवक करीत आहेत.

दिल्ली येथे नील घोष नावाच्या युवकाने २०१६ मध्ये शहरातील विविध कार्यक्रमांमध्ये शिल्लक राहणाऱ्या अन्नाचे वाटप करण्यासाठी २०१६ मध्ये रॉबिनहुड आर्मीची स्थापना केली. सध्या देशातील १३० पेक्षा अधिक शहरांमध्ये हा उपक्रम सुरू आहे. औरंगाबाद शहरातही रोहित इंगळे, अजिंक्य पूर्णपात्रे, नुरेन नहरी, माधवी सोनी आणि डॉ. लुबना सिद्दी यांनी एकत्र येऊन हा सामाजिक उपक्रम १६ सप्टेंबर २०१८ पासून सुरू केला. आतापर्यंत या उपक्रमात ३७० युवक जोडले गेले आहेत. हिरव्या रंगाचे टी शर्ट परिधान करून शहरातील कोणत्याही भागात कार्यक्रमाच्या स्थळी अन्न शिल्लक राहिले असल्याची माहिती समजताच या ग्रुपमधील युवक त्याठिकाणी पोहोचतात. अन्न खराब झालेले नसेल तर तात्काळ ताब्यात घेऊन रेल्वेस्थानक, घाटी परिसर, राहुलनगर, धूत हॉस्पिटलसमोर गोरगरीब भागात जाऊन वाटप करतात. या उपक्रमाला लग्नसराईत अतिशय उत्तम प्रतिसाद मिळाला असल्याचे रोहित इंगळे, सुचित शेटे यांनी सांगितले. नऊ महिन्यांत ९५ हजारांहून अधिक लोकांना शिल्लक राहिलेल्या अन्नातून पोटभर खाऊ घातले असल्याचेही इंगळे यांनी स्पष्ट केले. 

या उपक्रमासाठी कोणताही खर्च येत नाही. शिल्लक राहिलेले अन्न असते. ते आॅटोरिक्षा किंवा कोणाच्याही चारचाकी वाहनातून भुकेल्यांपर्यंत घेऊन जावे लागते. त्याठिकाणी अन्नाचे वाटप होताच युवक स्वत:च्या कामाला निघून जातात. त्यामुळे फक्त श्रम, मेहनत आणि वेळच द्यावा लागतो. हिरव्या रंगाचे टी शर्ट घातलेले युवक रेल्वेस्टेशन किंवा भुकेल्या वस्तीच्या परिसरात दिसताच अन्न घेण्यासाठी गर्दी होते. त्याच वेळी शहरातील स्वयंपाक करणाऱ्या केटरर्संनाही माहिती झाली आहे. त्यामुळे तेही अन्न शिल्लक राहिल्यास संपर्क साधून माहिती देतात, असेही रोहित इंगळे हे सांगत होते. या उपक्रमात सुचित शेटे, गौरव मेश्राम, शुभम चक्रे, नंदकुमार फुटाणे, शुभम पाटीदार, आकाश जाधव, शेखर देशपांडे, श्रुती पाटील, निधी श्रीसुंदर, वेदांत जैस्वाल आदी युवक सक्रिय सहभाग नोंदवत आहेत.

२० पेक्षा अधिक सामाजिक उपक्रम भुकेलेल्यांपर्यंत अन्न पोहोचविणाऱ्या रॉबिनहुड आर्मीच्या युवकांना आतापर्यंत ९ महिन्यांत २० पेक्षा अधिक सामाजिक उपक्रमही घेतले आहेत. कारगिल विजय दिनानिमित्त या युवकांनी शहराच्या विविध भागांतून तुटलेल्या, फुटलेल्या १७ सायकली गोळा केल्या. या सायकली दुरुस्तीनंतर नारेगाव येथील महापालिकेच्या शाळेतील १७ विद्यार्थ्यांना त्या वाटप केल्या. यात दहा सायकली मुलांना तर ७ सायकली मुलींना दिल्या असल्याचे सुचित शेटे यांनी सांगितले. सायकल मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर दिसलेला आनंद हाच आमच्या सामाजिक उपक्रमाचे यश असल्याचेही हे युवक सांगतात.

टॅग्स :social workerसमाजसेवकSocialसामाजिकfoodअन्नAurangabadऔरंगाबाद