शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

चिकलठाण्यातील रस्ते महानगरपालिकेच्या ठरावाच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2018 17:39 IST

या रस्त्यांची कामे करण्यास महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने (एमआयडीसी) तयारी दर्शविली आहे; परंतु त्यासाठी महापालिकेचा ठराव मिळण्याची प्रतीक्षा आहे.

ठळक मुद्दे हा ठराव मिळाल्यानंतरच रस्त्यांच्या कामाचा मार्ग मोकळा होणार आहे.  

औरंगाबाद : चिकलठाणा एमआयडीसी परिसरात आजघडीला खड्डेमय रस्त्यांमुळे माल वाहतूक करताना अनेकदा आर्थिक नुकसान होत असल्याचे उद्योजकांचे म्हणणे आहे. या रस्त्यांची कामे करण्यास महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने (एमआयडीसी) तयारी दर्शविली आहे; परंतु त्यासाठी महापालिकेचा ठराव मिळण्याची प्रतीक्षा आहे. हा ठराव मिळाल्यानंतरच रस्त्यांच्या कामाचा मार्ग मोकळा होणार आहे.  

चिकलठाणा एमआयडीसी या औद्योगिक क्षेत्रातील रस्त्यांचा प्रश्न बिकट बनला आहे. गेल्या ४० वर्षांपासून या औद्योगिक वसाहतीतील उद्योगांकडून महसूल घेऊनही रस्ते दुरुस्त केलेले नाहीत. सर्व रस्त्यांची दुरवस्था झालेली आहे. त्यामुळे उद्योजक, कामगार, सर्वसामान्य नागरिकांसह माल वाहतुकीसाठी गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. 

सध्या कार्यरत असलेले उद्योजक त्रस्त असून, या औद्योगिक क्षेत्राचा औद्योगिक विकास खुंटत असल्याची भावना उद्योजकांतून व्यक्त होत आहे. जळगाव आणि अमरावती येथे महापालिका असून, तेथील औद्योगिक क्षेत्रातील रस्ते बांधणी, दुरुस्ती व देखभाल महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ करीत आहे. त्याच धर्तीवर चिकलठाणा एमआयडीसीतील रस्ते महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने बांधून द्यावेत,अशी मागणी उद्योजकांनी केली. येथील उद्योगांची खराब रस्त्यांच्या त्रासातून सुटका करण्यासाठी लवकरात लवकर क ाम करण्याची मागणी ‘मसिआ’चे अध्यक्ष किशोर राठी यांनी केली आहे.

महानगरपालिकेला घ्यावा लागणार ठराव२७ मार्च आणि १४ मे रोजी उद्योगमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक झाली. त्यामध्ये चिकलठाणा येथील रस्ते एमआयडीसीने बांधून देण्याचे तत्त्वत: मान्य करण्यात आले. त्यासाठी महापालिकेचे नाहरकत प्रमाणपत्र आवश्यक सांगण्यात आले. काही दिवसांपूर्वीच मनपाने एमआयडीसीला पत्र दिले; परंतु रस्त्यांच्या कामासाठी आता मनपाचा ठराव आवश्यक आहे. ठरावासंदर्भात महापालिकेबरोबर पत्रव्यवहार करण्यात येणार असल्याचे ‘एमआयडीसी’चे कार्यकारी अभियंता भूषण हर्षे म्हणाले.  

टॅग्स :chikhalthanaचिखलठाणाhighwayमहामार्गAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका