शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
2
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
3
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
4
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
5
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
6
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
7
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
8
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
9
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
10
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
11
शतांक विपरीत राजयोग: ९ राशींना वक्री शनिचे वरदान, सुबत्ता भरभराट; भरघोस लाभ, शुभ कल्याण होईल!
12
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
13
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
14
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
15
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
16
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
17
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
18
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
19
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
20
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती

नदी पुनर्भरण प्रकल्प राबवून तालुका दुष्काळमुक्त करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2017 01:15 IST

आगामी एक वर्षात जलयुक्तच्या माध्यमातून नदी पुनर्भरण प्रकल्प राबवून गाव व तालुका संपूर्णपणे कायमस्वरूपी दुष्काळमुक्त करू, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी केले.

लोकमत न्यूज नेटवर्कआडूळ : आगामी एक वर्षात जलयुक्तच्या माध्यमातून नदी पुनर्भरण प्रकल्प राबवून गाव व तालुका संपूर्णपणे कायमस्वरूपी दुष्काळमुक्त करू, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी केले.घारेगाव येथे सुखना नदीच्या खोलीकरण व रुंदीकरण कामाचा शुभारंभ राम यांच्या हस्ते करण्यात आला.त्यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर आ. संदीपान भुमरे, मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे माजी अध्यक्ष विठ्ठलमामा लहाने, उपविभागीय अधिकारी भाऊसाहेब जाधव, तहसीलदार महेश सावंत, सतीश सोनी, उपविभागीय कृषी अधिकारी कुलथे, गटविकास अधिकारी भास्कर कुलकर्णी, तालुका कृषी अधिकारी भाऊसाहेब पायघन, पं. स. सदस्या कावेरी सोपान थोरे, माजी नगराध्यक्ष दत्ता गोर्डे, जि.प. सदस्य प्रकाश चांगुलपाये, मार्केट कमिटीचे माजी सभापती विलास गोरे, मुरलीधर चौधरी, जि.प.चे माजी उपाध्यक्ष अशोक पवार, पं.स. सदस्य शुभम पिवळ, हरिश्चंद्र लघाने, दादा बारे, ख.वि. संघाचे चेअरमन बाबुराव पडुळे, तेजराव लहाने आदींसह इतर मान्यवर उपस्थित होते.याप्रसंगी आडूळच्या सरपंच शेख शमीम नासेर, उपसरपंच अलका बनकर, संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याचे माजी व्हाईस चेअरमन नारायण थोरे, घारेगावचे सरपंच रामेश्वर थोरे, उपसरपंच अशोक बारगळ, माजी उपसरपंच सोपान थोरे, संदीपान पवार, शिवसेनेचे तालुका उपप्रमुख भाऊसाहेब वाघ, घारेगाव पिंप्रीच्या सरपंच पार्वताबाई शिंगाडे, विठ्ठल गलधर, घारेगाव एकतुनीच्या सरपंच कुशावतार्बाई काजळे, शरद कुलकर्णी, सुरेश कतारे, संदीप थोरे,भगवान थोरे, शेख नासेर, रामकिसन वाघ, काकासाहेब थोरे, भरत फटांगडे, गोपीनाथ थोरे, ग्रामसेवक किरण वानखेडे, विजय थोरे, नंदलाल थोरे, श्रीमंत थोरे, शेख समीर आदींसह नागरिक व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन सोपान थोरे यांनी केले तर आभार मदन लहाने यांनी मानले.जलयुक्त शिवारमुळे टँकरची संख्या घटलीगेल्या काही दिवसात जलयुक्त शिवारमुळे जिल्ह्यातील ९० टक्के टँकरची संख्या कमी झाली असून आगामी एका वर्षामध्ये गाव, तालुका दुष्काळ व टँकरमुक्त करू तसेच या भागातील अपूर्ण राहिलेले जलसंधारणाचे प्रश्न तातडीने मार्गी लावू असे सांगून जिल्हाधिकारी पुढे म्हणाले की, कोणत्याही परिस्थितीत शेतकºयांना शेतीसाठी प्रथम पाणी उपलब्ध करून देण्याचा संकल्प शासनाचा आहे. कारण शेतीसाठी पाणी उपलब्ध झाले तर कोरडवाहू क्षेत्र कमी होऊन शेतकरी बागायती पिके घेऊन सुखी राहील, असे ते म्हणाले.