शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

नदी पुनर्भरण प्रकल्प राबवून तालुका दुष्काळमुक्त करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2017 01:15 IST

आगामी एक वर्षात जलयुक्तच्या माध्यमातून नदी पुनर्भरण प्रकल्प राबवून गाव व तालुका संपूर्णपणे कायमस्वरूपी दुष्काळमुक्त करू, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी केले.

लोकमत न्यूज नेटवर्कआडूळ : आगामी एक वर्षात जलयुक्तच्या माध्यमातून नदी पुनर्भरण प्रकल्प राबवून गाव व तालुका संपूर्णपणे कायमस्वरूपी दुष्काळमुक्त करू, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी केले.घारेगाव येथे सुखना नदीच्या खोलीकरण व रुंदीकरण कामाचा शुभारंभ राम यांच्या हस्ते करण्यात आला.त्यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर आ. संदीपान भुमरे, मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे माजी अध्यक्ष विठ्ठलमामा लहाने, उपविभागीय अधिकारी भाऊसाहेब जाधव, तहसीलदार महेश सावंत, सतीश सोनी, उपविभागीय कृषी अधिकारी कुलथे, गटविकास अधिकारी भास्कर कुलकर्णी, तालुका कृषी अधिकारी भाऊसाहेब पायघन, पं. स. सदस्या कावेरी सोपान थोरे, माजी नगराध्यक्ष दत्ता गोर्डे, जि.प. सदस्य प्रकाश चांगुलपाये, मार्केट कमिटीचे माजी सभापती विलास गोरे, मुरलीधर चौधरी, जि.प.चे माजी उपाध्यक्ष अशोक पवार, पं.स. सदस्य शुभम पिवळ, हरिश्चंद्र लघाने, दादा बारे, ख.वि. संघाचे चेअरमन बाबुराव पडुळे, तेजराव लहाने आदींसह इतर मान्यवर उपस्थित होते.याप्रसंगी आडूळच्या सरपंच शेख शमीम नासेर, उपसरपंच अलका बनकर, संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याचे माजी व्हाईस चेअरमन नारायण थोरे, घारेगावचे सरपंच रामेश्वर थोरे, उपसरपंच अशोक बारगळ, माजी उपसरपंच सोपान थोरे, संदीपान पवार, शिवसेनेचे तालुका उपप्रमुख भाऊसाहेब वाघ, घारेगाव पिंप्रीच्या सरपंच पार्वताबाई शिंगाडे, विठ्ठल गलधर, घारेगाव एकतुनीच्या सरपंच कुशावतार्बाई काजळे, शरद कुलकर्णी, सुरेश कतारे, संदीप थोरे,भगवान थोरे, शेख नासेर, रामकिसन वाघ, काकासाहेब थोरे, भरत फटांगडे, गोपीनाथ थोरे, ग्रामसेवक किरण वानखेडे, विजय थोरे, नंदलाल थोरे, श्रीमंत थोरे, शेख समीर आदींसह नागरिक व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन सोपान थोरे यांनी केले तर आभार मदन लहाने यांनी मानले.जलयुक्त शिवारमुळे टँकरची संख्या घटलीगेल्या काही दिवसात जलयुक्त शिवारमुळे जिल्ह्यातील ९० टक्के टँकरची संख्या कमी झाली असून आगामी एका वर्षामध्ये गाव, तालुका दुष्काळ व टँकरमुक्त करू तसेच या भागातील अपूर्ण राहिलेले जलसंधारणाचे प्रश्न तातडीने मार्गी लावू असे सांगून जिल्हाधिकारी पुढे म्हणाले की, कोणत्याही परिस्थितीत शेतकºयांना शेतीसाठी प्रथम पाणी उपलब्ध करून देण्याचा संकल्प शासनाचा आहे. कारण शेतीसाठी पाणी उपलब्ध झाले तर कोरडवाहू क्षेत्र कमी होऊन शेतकरी बागायती पिके घेऊन सुखी राहील, असे ते म्हणाले.