शहरं
Join us  
Trending Stories
1
"तर मी फडणवीसांना या जन्मी माफ करणार नाही", अंजली दमानियांची पोस्ट, 'तो' फोटोही केला शेअर
2
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
3
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
4
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
5
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
6
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
7
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
8
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
9
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
10
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
11
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
12
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
13
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
14
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
15
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
16
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
17
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
18
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
19
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
20
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादमधील प्रदूषणाचा वाढता इंडेक्स उद्योगांच्या मुळावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2020 19:34 IST

Pollution in Aurangabad पाच वर्षांपूर्वी होती शहरातील ६९.८५ एवढी प्रदूषणाची पातळी 

ठळक मुद्देनव्याने सर्वेक्षण करण्याची मागणी ‘सीएमआयए’च्या प्रतिनिधीचा समावेश असावा

औरंगाबाद : केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने पाच वर्षांपूर्वी केलेल्या सर्वेक्षणानुसार औरंगाबाद शहरातील प्रदूषण पातळी धोक्याच्या वळणार पोहोचल्याचा निष्कर्ष निघाला असून, ही बाब येथे होणाऱ्या गुंतवणुकीवर तसेच पर्यायाने शहराच्या विकासावरही परिणाम करणारी आहे. तथापि, पर्यावरण विभागाच्या नियमानुसार दर तीन वर्षांनी औद्योगिक शहरातील प्रदूषण पातळी मोजणे अनिवार्य आहे. त्यानुसार या शहरातील प्रदूषण पातळी नव्याने मोजावी व या शहराला रेड झोनच्या यादीत जाण्यापासून वाचवावे, अशी मागणी येथील ‘सीएमआयए’ या उद्योग संघटनेची आहे.

केंद्रीय पर्यावरण नियंत्रण मंडळाने सन २०१६ मध्ये देशभरातील ८८ औद्योगिक शहरांचे सर्वेक्षण केले होते. त्यामध्ये महाराष्ट्रातील चंद्रपूर, डोंबिवली, औरंगाबाद, नवी मुंबई व तारापूर या शहरांचा इंडेक्स धोक्याच्या वळणावर, तर नाशिक, चेंबूर व पिंप्री चिंचवड ही तीन शहरे धोक्याच्या पातळीजवळ पोहोचली आहेत, असा निष्कर्ष काढला होता. सर्वेक्षणात औरंगाबादेतील प्रदूषणाची पातळी (कंपर्हेसिंव्ह इन्व्हायर्मेंटल पोल्युशन इंडेक्स) ६९.८५ एवढी होती. एखाद्या उद्योगनगरीची प्रदूषणाची पातळी ७० च्या पुढे पोहोचली असेल, तर ते शहर रेड झोनमध्ये टाकले जाते. अलीकडे येथील औद्योगिक क्षेत्रांमध्ये दर्जेदार प्रक्रिया प्रकल्प उभारलेले आहेत.  रस्ते चांगले झालेले आहेत. बायोवेस्टबद्दल  महापालिकेने काळजी घेतली आहे. या सर्वांचा विचार करून केंद्रीय प्रदूषण मंडळाने नव्याने सर्वेक्षण करून शहराचा ‘सेपी स्कोअर’ निश्चित करावा, अशी मागणी ‘सीएमआयए’चे माजी सचिव शिवप्रसाद जाजू यांनी केंद्र सरकारकडे केली आहे.

‘सीएमआयए’च्या प्रतिनिधीचा समावेश असावायासंदर्भात ‘सीएमआयए’चे अध्यक्ष कमलेश धूत म्हणाले की, या शहरातील चार-पाच वर्षांपूर्वी निश्चित केलेला प्रदूषणाचा इंडेक्स मोजला तेव्हा एकाही उद्योग संघटनेचा प्रतिनिधी सोबत घेतलेला नव्हता. चुकीच्या पद्धतीने निकष लावले. घाटी हॉस्पिटलमधील रुग्णसंख्या मोजण्यात आली. तेव्हा शहरातील रुग्णांची संख्या न घेता सरसकट दाखल रुग्ण संख्या ग्राह्य धरली. घाटी हॉस्पिटलमध्ये औरंगाबादच्या आजूबाजूच्या अनेक जिल्ह्यांतून रुग्ण येत असतात. त्यामुळे नव्याने सर्वेक्षण करताना ‘सीएमआयए’ या संघटनेचा प्रतिनिधी सोबत घ्यावा, अशी आमची मागणी आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादMIDCएमआयडीसीpollutionप्रदूषण