शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
3
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
4
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
6
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
7
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
8
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
9
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
10
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
11
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
12
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
13
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
14
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
15
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
16
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
17
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
18
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
19
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
20
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'

‘महाराष्ट्राच वाटोळं करणा-या युती सरकारला वर्धापन दिन साजरा करण्याचा अधिकार नाही’ - अशोक चव्हाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2017 19:43 IST

हे  सरकार  पायउतार झाल्याश्विाय अच्छे दिन येणार नाहीत’ अशी जळजळीत प्रतिक्रिया आज येथे प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष व माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी व्यक्त केली.

ठळक मुद्देहे सरकार पायउतार झाल्याशिवाय अच्छे  दिन येणार नाहीकांच्या खिशात हात घालण्याची सवय या सरकारला लागल्यामुळे प्रश्न जटिल होत आहेत. पेट्रोल तर महाराष्ट्रात सर्वाधिक महाग आहे, असे ते म्हणाले.

औरंगाबाद: ‘ युती सरकारनं गेल्या तीन वर्षात महाराष्ट्राचं वाटोळं केलेलं आहे. राज्य दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आहे. शेतक-यांच्या आत्महत्त्या वाढतच चाललेल्या आहेत.नागपूर तर गुन्हेगारीची राजधानी झालेली आहे. अन्य सर्वत्र  गुन्हेगारी वाढली आहे. बेरोजगारी तर वाढतच चालली आहे. नोटबंदी व जीएसटीमुळे लाखो नोक-यांवर गदा आलेली आहे. केवळ बालिश नव्हे तर त्याहीपेक्षा अधिक असे हे सरकार आहे. या सरकारला आपला वाढदिवस साजरा करण्याचा काहीही अधिकार पोहचत नाही. असे हे  सरकार  पायउतार झाल्याश्विाय अच्छे दिन येणार नाहीत’ अशी जळजळीत प्रतिक्रिया आज येथे प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष व माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी व्यक्त केली.

काल रात्री उशीरा  त्यांचे औरंगाबादेत आगमन झाले, तेव्हा त्यांचे रेल्वेस्थानकावर जंगी स्वागत करण्यात आले. नांदडे मनपातील विजयानंतर पहिल्यांदाच औरंगाबादला आले होते. आज सकाळी त्यांनी गांधी भवन, शहागंजात माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त व लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या  जयंतीनिमित्त प्रतिमांना पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. नंतर सुभेदारी गेस्ट हाऊसवर अशोकराव चव्हाण यांनी पत्रकारांनशी वार्तालाप केला.

केवळ घोषणाबाजी आणि भाषणबाजीची तीन वर्षे 

राज्य सरकारवर तुटून पडताना अशोकराव चव्हाण यांनी अनेक आरोपांच्या फैरी झाडल्या. ते म्हणाले, केवळ घोषणाबाजी आणि भाषणबाजीची ही तीन वर्षे राहिली. खोटी आश्वासनं दिली गेली. आणि अंमलबजावणी मात्र शून्य राहिली. राज्य सरकार सर्व आघाड्यांवर अयशस्वी ठरले आहे. शेती, शेतक यांचे प्रश्न, महिला, दलित, अल्पसंख्यक, शिक्षण, रोजगार अशा सर्व आघाड्यांवरची या सरकारची कामगिरी अयशस्वी ठरली आहे. नोटबंदी आणि जीएसटीमुळे तर देशाचं आणि महाराष्ट्राचं वाटोळं झालं आहे. विकास दर घटतोय. महागाई वाढते आहे. धर्मांध शक्तींनी हैदोस घालायला सुरुवात केलेली आहे. लोकांच्या खिशात हात घालण्याची सवय या सरकारला लागल्यामुळे प्रश्न जटिल होत आहेत. पेट्रोल तर महाराष्ट्रात सर्वाधिक महाग आहे, असे ते म्हणाले.

टॅग्स :Ashok Chavanअशोक चव्हाणcongressकाँग्रेसBJPभाजपाShiv Senaशिवसेना