शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

लॉकडाऊनमुळे रिक्षाचे हप्ते थकले, फायनान्स कंपनीच्या धमक्याने चालकाने उचले टोकाचे पाऊल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 14:46 IST

वसुली पथकाच्या धमक्यामुळे कर्जबाजारी रिक्षाचालकाची आत्महत्या

ठळक मुद्दे पत्नीची मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात तक्रार फायनान्स कंपनीच्या चार जणांवर गुन्हा दाखल

औरंगाबाद : ऑटो रिक्षाचे थकलेले हप्ते भरण्यासाठी खासगी फायनान्स कंपनीच्या वसुली टीमच्या सततच्या धमक्यांना कंटाळून घाबरलेला रिक्षाचालक संतोष पावशे यांनी आत्महत्या केल्याचे समोर आले असून, फायनान्स कंपनीच्या ४ जणांविरुद्ध मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सायंकाळपर्यंत कुणालाही अटक करण्यात आली नव्हती.

खासगी फायनान्सचे शेख इमरान शेख अब्दुल माजिद (रा. दादा कॉलनी), जावेद साबेर कुरेशी (रा. सिल्लेखाना औरंगाबाद), अंकुश रामराव कांबळे (रा. चिकलठाणा), ॲड. अनंत एस. लऊळकर (रा. एरंडवणे, पुणे) आणि फायनान्सचे इतर कर्मचारी अशा ८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. कोरोना काळात लॉकडाऊनने सर्वच थांबले. त्यात रिक्षाचा धंदाही संपला. त्यामुळे कर्जाचे हप्ते थांबले. त्यातच पावशे यांनी रिक्षाही विक्री केली. रिक्षाचे थकलेले हप्ते भरण्यासाठी आरोपींनी पावशे यांना धमकावणे सुरू केले होते. या त्रासाला कंटाळून घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. कमल संतोष पावशे (२७. रा. रामनगर, एन-२ सिडको) यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, दि. ३ मे ते दि.२५ सप्टेंबर २०२१ या काळात उपरोक्त आरोपी वसुलीसाठी सतत फोन करून धमक्या देत होते.

ठाण्यासमोर जमाव..वसुलीसाठी सतत अपशब्द वापरून अपमानित करणे, जीवे मारण्याची धमकी देणे यामुळेच पतीने आत्महत्या केली. यास कारणीभूत आरोपीवर गुन्हे दाखल करा, अशी मागणी अतुल घडामोडे, सुभाष पाटील, सुनील सूर्यवंशी, बापू घडामोडे, सुभाष शुक्ला, मोहन साळवे यांच्यासह मोठा जमाव रविवारी सकाळी मुकुंदवाडी ठाण्यासमोर जमा झाला. आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणीनातेवाइकांनी लावून धरली होती, अन्यथा मृतदेह पोलीस ठाण्यासमोर आणण्याचा इशाराही दिला होता. पोलीस निरीक्षक ब्रह्मा गिरी यांनी गुन्हा दाखल केल्यावर जमाव निघून गेला. उपनिरीक्षक वैशाली गुळवे अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादDeathमृत्यूcorona virusकोरोना वायरस बातम्या