शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

हातावर ‘जय शिवराय’ असे लिहून रिक्षा चालकाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 18:46 IST

वाळूज परिसरात रिक्षा चालवून कुटुंबाची उपजीविका भागवीत असे.

ठळक मुद्देविटावा येथे राहत्या घरी घेतला गळफास

वाळूज महानगर : हाताच्या पंजावर ‘जय शिवराय’, मी आत्महत्या करीत आहे, असा मजकूर लिहून रिक्षाचालकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी सकाळी ९.३० वाजेच्या सुमारास विटावा गावात उघडकीस आली. प्रल्हाद बळीराम पोळ (५२), असे आत्महत्या करणाऱ्या रिक्षाचालकाचे नाव असून, आत्महत्येचे कारण मात्र समजू शकले नाही.

प्रल्हाद पोळ (रा. बनचिंचोली, ता. हदगाव, जि. नांदेड) पत्नी लता व मुलगा यांच्या सोबत विटावा येथे रामभाऊ गव्हाणे यांच्या घरात किरायाने राहत होते. वाळूज परिसरात रिक्षा चालवून ते कुटुंबाची उपजीविका भागवीत. महिनाभरापूर्वी त्यांचे वडील बळीराम पोळ यांचे निधन झाल्याने पत्नी लता पोळ ही मुलासह मूळ गावी गेलेली आहे. शुक्रवारी सकाळी ९.३० वाजेच्या सुमारास प्रल्हाद पोळ हे राहत्या घरी पंख्याला नायलॉन दोरीच्या साहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आले. हा प्रकार लक्षात येताच बालाजी सूर्यवंशी व लक्ष्मण डोळस यांनी शेजाऱ्यांच्या मदतीने प्रल्हाद यांना बेशुद्धावस्थेत शासकीय रुग्णालयात दाखल केले. तिथे डॉक्टरांना सकाळी ११.१५ वाजेच्या सुमारास प्रल्हाद यांस मयत घोषित केले.

हाताच्या पंजावर मजकूर लिहून संपविले जीवनपत्नी व मुलगा गावी गेलेले असल्याने प्रल्हाद महिनाभरापासून घरी एकटेच होते. आत्महत्या करण्यापूर्वी प्रल्हाद यांनी हाताच्या पंजावर पेनाने ‘जय शिवराय’ मी आत्महत्या करीत आहे, असा मजकूर लिहिला असून, अशोक दामले या नावाचा उल्लेख करण्यात आला आहे. याप्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याप्रकरणी पुढील तपास पोहेकॉ. योगेश कासरले करीत आहेत.

टॅग्स :Deathमृत्यूAurangabadऔरंगाबाद