शहरं
Join us  
Trending Stories
1
उड्डाण करताच ब्रिटनमध्ये विमान कोसळले; एअर इंडिया अपघातासारखेच आगीचे लोळ... 
2
पुढील महिन्यापासून संपूर्ण देशात मतदार याद्यांचे सखोल पुनरीक्षण
3
उम्र का तू तमाशा न दिखा, तकाजा कुछ और हैं...; काळाबरोबर खूप काही बदलले...
4
धक्कादायक : बिहारच्या मतदार याद्यांत म्यानमार, नेपाळी, बांगलादेशींचा भरणा
5
नागरिकांना ४ लाखांचे विमा संरक्षण मिळणार? पीएमजेजेबीवाय अंतर्गत विमा संरक्षण दुप्पट करणार
6
विधिज्ञ उज्ज्वल निकम, आणखी तिघे राज्यसभेवर; श्रुंगला, सदानंदन, मीनाक्षी जैन यांचाही समावेश
7
बिहारमध्ये गुंडाराज: १३ दिवसांत ३० हत्या; नेते, अधिकाऱ्यांनाही सोडले नाही
8
उत्तर कोरियाच्या विरोधात जाऊ नका, रशियाचा अमेरिका-जपानला इशारा
9
शनैश्वर बनावट ॲप तयार करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आंदोलने मजेसाठी नसतात, लोकांचे हक्क महत्वाचे; मद्रास हायकोर्ट : पक्षाची मनमानी चालू शकत नाही
11
‘सुंदर’ फिरकीने भारताचा ‘रूट’ मोकळा; भारताला विजयासाठी १९३ धावांचे लक्ष्य
12
भारताचा पराभव, पण मालिका ३-२ ने जिंकली; शेफाली वर्माची अर्धशतकी खेळी व्यर्थ
13
बाजाराची चाल कंपन्यांचे निकाल ठरवणार; विक्रीचा मारा सुरूच
14
तुमच्यामुळे झाला महाराष्ट्र टॉपर! नागरिकांची यूपीआयला पसंती
15
IND vs ENG : अति 'सुंदर'! वॉशिंग्टनच्या फिरकीतील जादूसह टीम इंडियाच्या विजयातील मोठा अडथळा झाला दूर
16
नीरज चोप्रा अन् अरशद नदीम पुन्हा भिडणार; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिलीच लढत
17
ठाणे: जि.प., पं. समित्यांचा निवडणूक प्रभाग रचना मसुदा प्रसिद्ध; हरकतींसाठी २१ जुलैपर्यंत मुदत
18
भाजपाकडून खासदारकी मिळालेल्या उज्ज्वल निकम यांची संपत्ती किती? मुंबईत किती कोटींची घरं?
19
ब्रूकची आडवी-तिडवी फटकेबाजी! ३ चेंडूत कुटल्या १४ धावा; मग आकाशदीपनं 'मिडल स्टंप' उडवत घेतला बदला
20
"प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करणाऱ्या गुंडांना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करा’’, काँग्रेसची मागणी  

नववर्षात पहिल्यांदा तांदळाच्या भावात घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:09 IST

औरंगाबाद : जगातील प्रमुख तांदूळ उत्पादक देशांत तांदळाच्या कमतरतेमुळे चीन देशाने भारताकडून तांदूळ खरेदी करणे सुरू केले होते, पण ...

औरंगाबाद : जगातील प्रमुख तांदूळ उत्पादक देशांत तांदळाच्या कमतरतेमुळे चीन देशाने भारताकडून तांदूळ खरेदी करणे सुरू केले होते, पण मागील काही दिवसांत चीनने आयात कमी केल्याने त्याचा परिणाम भारतीय बाजारपेठेत झाला व मागील दोन दिवसांत स्थानिक बाजारात तांदळाचे भाव क्विंटलमागे २०० ते ३०० रुपयांपर्यंत कमी झाले.

नवीन तांदळाची आवक दिवाळीनंतर सुरू होते. सुरुवातीला आवक वाढल्याने भाव कमी होतात. त्यामुळे वार्षिक धान्य खरेदी करणारे डिसेंबर ते फेब्रुवारीदरम्यान तांदूळ खरेदी करून ठेवतात. मात्र, यंदा भारतीयांच्या दररोजच्या जेवणातील अविभाज्य घटक असलेला तांदूळ यंदा एवढा महागला की, सर्वजण चिंतातुर झाले होते, पण मागील आठवड्यात तांदळाचे भाव २०० ते ३०० रुपयांनी कमी झाले. तांदूळ ३००० ते ५३०० रुपये, तर बासमती तांदूळ ३२०० ते ७८०० रुपये प्रतिक्विंटल विकला जात आहे. मागील वर्षीच्या तुलनेत बिगर बासमती तांदूळ क्विंटलमागे ४०० ते ८०० रुपयांपर्यंत व बासमती तांदूळ क्विंटलमागे ३०० ते १ हजार रुपयांपर्यंत जास्त भावात विकत होता.

त्याचे कारणही तसेच होते. यासंदर्भात तांदळाच्या होलसेल व्यापाऱ्यांनी सांगितले की, भारत प्रामुख्याने बांगलादेश, नेपाळ, बेलीन आणि सेनेगलमध्ये बिगर बासमती तांदळाची निर्यात करतो, तर इराण, सौदी अरेबिया आणि इराक, आदी देशांना बासमती तांदूळ निर्यात करतो. तांदूळ उत्पादक प्रमुख देश थायलंड येथे मागील वर्षी दुष्काळामुळे तांदळाचे उत्पादन कमी झाले होते. व्हिएतनाममध्ये उत्पादन घटले. यामुळे चीन देशाने भारताकडून तांदूळ खरेदी सुरू केल्याने देशात तांदळाचे भाव गगनाला भिडले होते. यामुळे देशात २०१९ च्या आर्थिक वर्षात ९९ लाख टन तांदळाच्या निर्यातीच्या तुलनेत २०२० ते २०२१ या आर्थिक वर्षात १०४ कोटींपर्यंत होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

चौकट

दररोज ३५ ते ४० टन तांदळाचा खप

औरंगाबाद शहरात दररोज ३५ ते ४० टन तांदळाची विक्री होते

नीलेश सोमाणी

होलसेल व्यापारी