शहरं
Join us  
Trending Stories
1
हेट स्पीच: राज ठाकरेंवर एफआयआरची मागणी करणारी याचिका, उच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला फटकारले
2
'लाडकी बहीण' योजनेच्या महिलांसाठी मोठी दिलासादायक बातमी! e-KYC ला ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
3
रक्षाविसर्जनावेळी मयताचा सावत्र मुलगा आल्याने वाद; दोन गटांत हाणामारी 
4
सौदी बस अग्निकांडाला जबाबदार कोण? एकाच कुटुंबातील १८ जणांचा जळून मृत्यू, क्षणात ३ पिढ्यांतील लोकांचा अंत!
5
कसली महायुती अन् कोणती आघाडी घेऊन बसला! शिंदे शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी नगरपरिषद एकत्र लढवणार...
6
ईव्हीएममध्ये २५,००० मते आधीच होती, तरीही आमच्या पक्षाचे २५ उमेदवार जिंकले; 'RJD'च्या जगदानंद यांचा मोठा दावा
7
लाल किल्ला स्फोटात 'डिजिटल सस्पेंस'; स्विस ॲप 'थ्रीमा'चा वापर, सुरक्षा यंत्रणांपुढे मोठे आव्हान!
8
थंडी सुरु झाली...! रात्री झोपण्यापूर्वी बेंबीमध्ये या तेलाचे दोन थेंब टाका, मिळतील ७ आरोग्यदायी फायदे...
9
'फिदायीन' उमरनं घातला होता 'बूट बॉम्ब'; यात असं काय होतं? ज्याला म्हटलं जातं 'शैतान की मां'!
10
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आरक्षणाच्या ५० टक्के मर्यादेचे उल्लंघन, सुप्रीम कोर्टात १९ नोव्हेंबरला सुनावणी
11
कागलमध्ये हसन मुश्रीफ-समरजित घाटगेंची युती, मुश्रीफांनी संजयबाबांची मागितली माफी; म्हणाले...
12
'या' बँकेच्या शेअरनं लोकांना केलं मालामाल, १५ वर्षांच्या उच्चांकावर पोहोचला भाव; किंमतही खिशाला परवडणारी! झुनझुनवालांचा मोठा डाव
13
IND vs SA : "सगळे घाबरुन खेळत आहेत..." डावललेल्या खेळाडूचं नाव घेत कैफ थेट 'गंभीर' मुद्यावर बोलला
14
शेख हसिनांना फाशी, हा भारताविरोधात अमेरिका-पाकिस्तानचा कट; संरक्षण विश्लेषकांचा खळबळजनक दावा
15
दिल्ली लाल किल्ला स्फोट प्रकरणात आणखी एक अटक; हमास स्टाईल हल्ला करण्याची होती योजना
16
भाजपने पहिला गुलाल उधळला! अख्खे पॅनल बिनविरोध विजयी; नगराध्यक्ष निवडणुकीकडे लक्ष
17
तेजस्वी यादवांना राजदने नेता म्हणून निवडले; लालू-राबडी बैठकीतूनच निघाले
18
Travel : परिकथेत रमणाऱ्यांनी आयुष्यात एकदा तरी 'या' ठिकाणांना भेट द्यायलाच हवी! आताच करून ठेवा यादी
19
ओलाची स्कूटर बंद पडली, कंपनी सर्व्हिस देईना; ग्राहकाने बाहेरून दुरुस्त केली, ८५०० रुपयांचे बिल झाले...
20
शेख हसीना यांना तात्काळ परत पाठवा; 'या' कराराचा हवाला बांगलादेशची भारताला विनंती
Daily Top 2Weekly Top 5

उत्तम तपासासाठी २५ लाख रुपयांची बक्षिसे दिली, गुन्ह्यांचा उलगडा करण्यात शहर पोलीस सहा वर्षात सर्वोत्तम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2022 15:43 IST

पोलीस आयुक्त निखिल गुप्ता : ८४ टक्के गुन्ह्यांचा तपास; प्रसंगी बंद दाराआड कानपिचक्याही

औरंगाबाद : शहर पोलिसांनी नुकत्याच संपलेल्या २०२१ या वर्षामध्ये गुन्ह्यांचा उलगडा करण्यात मागील सहा वर्षात सर्वोत्तम कामगिरी केली आहे. २०२१ मध्ये दाखल ४ हजार ५८५ गुन्ह्यांपैकी ३ हजार ५१४ गुन्हे उघड केले आहेत. गुन्हे उघड करण्याची टक्केवारी तब्बल ८५ टक्के एवढी असल्याची माहिती पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांनी पत्रकार परिषदेत दिली.

शहर पोलीस आयुक्तालयात २०२१ मध्ये पोलिसांनी केलेल्या कामगिरीची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी आयुक्त डाॅ. गुप्ता यांच्यासह उपायुक्त अपर्णा गिते, उज्ज्वला वनकर, गुन्हे शाखेचे निरीक्षक अविनाश आघाव यांची उपस्थिती होती. यावेळी डॉ. गुप्ता म्हणाले, शहर पोलिसांनी वर्षभरात उत्तम कामगिरी केली आहे. काही बाबींमध्ये कमतरताही राहिल्या आहेत. त्यामध्ये सुधारणा करण्यात येत आहे. गुन्हे शाखा, सायबर शाखा यांनी गुन्ह्यांची उकल करण्यात महत्त्वाची जबाबदारी निभावली आहे. दोन्ही शाखांचे काम उत्तम झाले आहे. याशिवाय सिटी चौक पोलिसांनीही दुचाकी शोधण्यात मोठी आघाडी घेतली. मागील वर्षात एकूण ३१ खुनाचे प्रकार उघडकीस आले. त्यातील सर्वच आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या. खुनाचा प्रयत्न ४१, सदोष मनुष्यवधाचे ४ गुन्हे नोंदविण्यात आले. ते सर्वच उघड करण्यात आले. वर्षभरात महिलांवर बलात्काराचे ८८ गुन्हे दाखल झाले. त्यातील ८७ गुन्हे उघड करण्यात पोलिसांना यश मिळाल्याचे डॉ. गुप्ता यांनी सांगितले.

हद्दवाढीचा प्रस्ताव अंतिम टप्प्यातशहर पोलीस आयुक्तालयाची हद्दवाढ करण्याचा प्रस्ताव पोलीस महासंचालकांकडे दाखल केलेला आहे. त्यावर महासंचालक कार्यालयाने संबंधित हद्दवाढीत येणाऱ्या ग्रामपंचायतीचे प्रस्ताव मागविले आहेत. त्यासाठी जिल्हाधिकारी आणि जि.प. च्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची मदत मागितली आहे. यासाठी पालकमंत्री प्रयत्न करीत आहेत. या हद्दवाढीमध्ये चिकलठाणा पोलीस ठाण्यासह शेंद्रा, बिडकीन इ. भागांचा समावेश असल्याचेही डॉ. गुप्ता यांनी सांगितले.

२५ लाख रुपयांची बक्षिसेउत्तम कामगिरी करणाऱ्या पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना २०२१ मध्ये तब्बल २५ लाख रुपयांचे रिवॉर्ड दिले आहेत. त्याची कोणतीही जाहिरातबाजी केली नाही. जे अधिकारी काम करतात, त्यांचे कौतुक केले जाते. काहींचे कानही टोचले जातात. ते बंद दाराच्या आड असते. त्याचीही वाच्यता केली जात नाही, असेही डॉ. गुप्ता यांनी सांगितले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबाद