शहरं
Join us  
Trending Stories
1
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
2
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
3
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
4
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
5
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
6
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
7
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
8
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
9
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
10
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
11
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
12
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
13
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
14
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
15
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
16
रस्ते गिळलेली अतिक्रमणे होणार नियमित; महसूल विभागाचा मोठा निर्णय
17
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
18
सहाव्या वर्षी वडिलांना एक चाल सांगितली अन्...; कोनेरू हम्पीची खास आठवण
19
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
20
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)

उत्तम तपासासाठी २५ लाख रुपयांची बक्षिसे दिली, गुन्ह्यांचा उलगडा करण्यात शहर पोलीस सहा वर्षात सर्वोत्तम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2022 15:43 IST

पोलीस आयुक्त निखिल गुप्ता : ८४ टक्के गुन्ह्यांचा तपास; प्रसंगी बंद दाराआड कानपिचक्याही

औरंगाबाद : शहर पोलिसांनी नुकत्याच संपलेल्या २०२१ या वर्षामध्ये गुन्ह्यांचा उलगडा करण्यात मागील सहा वर्षात सर्वोत्तम कामगिरी केली आहे. २०२१ मध्ये दाखल ४ हजार ५८५ गुन्ह्यांपैकी ३ हजार ५१४ गुन्हे उघड केले आहेत. गुन्हे उघड करण्याची टक्केवारी तब्बल ८५ टक्के एवढी असल्याची माहिती पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांनी पत्रकार परिषदेत दिली.

शहर पोलीस आयुक्तालयात २०२१ मध्ये पोलिसांनी केलेल्या कामगिरीची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी आयुक्त डाॅ. गुप्ता यांच्यासह उपायुक्त अपर्णा गिते, उज्ज्वला वनकर, गुन्हे शाखेचे निरीक्षक अविनाश आघाव यांची उपस्थिती होती. यावेळी डॉ. गुप्ता म्हणाले, शहर पोलिसांनी वर्षभरात उत्तम कामगिरी केली आहे. काही बाबींमध्ये कमतरताही राहिल्या आहेत. त्यामध्ये सुधारणा करण्यात येत आहे. गुन्हे शाखा, सायबर शाखा यांनी गुन्ह्यांची उकल करण्यात महत्त्वाची जबाबदारी निभावली आहे. दोन्ही शाखांचे काम उत्तम झाले आहे. याशिवाय सिटी चौक पोलिसांनीही दुचाकी शोधण्यात मोठी आघाडी घेतली. मागील वर्षात एकूण ३१ खुनाचे प्रकार उघडकीस आले. त्यातील सर्वच आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या. खुनाचा प्रयत्न ४१, सदोष मनुष्यवधाचे ४ गुन्हे नोंदविण्यात आले. ते सर्वच उघड करण्यात आले. वर्षभरात महिलांवर बलात्काराचे ८८ गुन्हे दाखल झाले. त्यातील ८७ गुन्हे उघड करण्यात पोलिसांना यश मिळाल्याचे डॉ. गुप्ता यांनी सांगितले.

हद्दवाढीचा प्रस्ताव अंतिम टप्प्यातशहर पोलीस आयुक्तालयाची हद्दवाढ करण्याचा प्रस्ताव पोलीस महासंचालकांकडे दाखल केलेला आहे. त्यावर महासंचालक कार्यालयाने संबंधित हद्दवाढीत येणाऱ्या ग्रामपंचायतीचे प्रस्ताव मागविले आहेत. त्यासाठी जिल्हाधिकारी आणि जि.प. च्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची मदत मागितली आहे. यासाठी पालकमंत्री प्रयत्न करीत आहेत. या हद्दवाढीमध्ये चिकलठाणा पोलीस ठाण्यासह शेंद्रा, बिडकीन इ. भागांचा समावेश असल्याचेही डॉ. गुप्ता यांनी सांगितले.

२५ लाख रुपयांची बक्षिसेउत्तम कामगिरी करणाऱ्या पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना २०२१ मध्ये तब्बल २५ लाख रुपयांचे रिवॉर्ड दिले आहेत. त्याची कोणतीही जाहिरातबाजी केली नाही. जे अधिकारी काम करतात, त्यांचे कौतुक केले जाते. काहींचे कानही टोचले जातात. ते बंद दाराच्या आड असते. त्याचीही वाच्यता केली जात नाही, असेही डॉ. गुप्ता यांनी सांगितले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबाद