शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
IND vs PAK : भारताला हरवायचंय? मग सेना प्रमुखांसोबत ओपनिंग करा! इम्रान खानचा PCB अध्यक्षाला यॉर्कर
4
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
5
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
6
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
7
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
8
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
9
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
10
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
11
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
12
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
13
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
14
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
15
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
16
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
17
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
18
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
19
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
20
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना

उत्तम तपासासाठी २५ लाख रुपयांची बक्षिसे दिली, गुन्ह्यांचा उलगडा करण्यात शहर पोलीस सहा वर्षात सर्वोत्तम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2022 15:43 IST

पोलीस आयुक्त निखिल गुप्ता : ८४ टक्के गुन्ह्यांचा तपास; प्रसंगी बंद दाराआड कानपिचक्याही

औरंगाबाद : शहर पोलिसांनी नुकत्याच संपलेल्या २०२१ या वर्षामध्ये गुन्ह्यांचा उलगडा करण्यात मागील सहा वर्षात सर्वोत्तम कामगिरी केली आहे. २०२१ मध्ये दाखल ४ हजार ५८५ गुन्ह्यांपैकी ३ हजार ५१४ गुन्हे उघड केले आहेत. गुन्हे उघड करण्याची टक्केवारी तब्बल ८५ टक्के एवढी असल्याची माहिती पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांनी पत्रकार परिषदेत दिली.

शहर पोलीस आयुक्तालयात २०२१ मध्ये पोलिसांनी केलेल्या कामगिरीची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी आयुक्त डाॅ. गुप्ता यांच्यासह उपायुक्त अपर्णा गिते, उज्ज्वला वनकर, गुन्हे शाखेचे निरीक्षक अविनाश आघाव यांची उपस्थिती होती. यावेळी डॉ. गुप्ता म्हणाले, शहर पोलिसांनी वर्षभरात उत्तम कामगिरी केली आहे. काही बाबींमध्ये कमतरताही राहिल्या आहेत. त्यामध्ये सुधारणा करण्यात येत आहे. गुन्हे शाखा, सायबर शाखा यांनी गुन्ह्यांची उकल करण्यात महत्त्वाची जबाबदारी निभावली आहे. दोन्ही शाखांचे काम उत्तम झाले आहे. याशिवाय सिटी चौक पोलिसांनीही दुचाकी शोधण्यात मोठी आघाडी घेतली. मागील वर्षात एकूण ३१ खुनाचे प्रकार उघडकीस आले. त्यातील सर्वच आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या. खुनाचा प्रयत्न ४१, सदोष मनुष्यवधाचे ४ गुन्हे नोंदविण्यात आले. ते सर्वच उघड करण्यात आले. वर्षभरात महिलांवर बलात्काराचे ८८ गुन्हे दाखल झाले. त्यातील ८७ गुन्हे उघड करण्यात पोलिसांना यश मिळाल्याचे डॉ. गुप्ता यांनी सांगितले.

हद्दवाढीचा प्रस्ताव अंतिम टप्प्यातशहर पोलीस आयुक्तालयाची हद्दवाढ करण्याचा प्रस्ताव पोलीस महासंचालकांकडे दाखल केलेला आहे. त्यावर महासंचालक कार्यालयाने संबंधित हद्दवाढीत येणाऱ्या ग्रामपंचायतीचे प्रस्ताव मागविले आहेत. त्यासाठी जिल्हाधिकारी आणि जि.प. च्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची मदत मागितली आहे. यासाठी पालकमंत्री प्रयत्न करीत आहेत. या हद्दवाढीमध्ये चिकलठाणा पोलीस ठाण्यासह शेंद्रा, बिडकीन इ. भागांचा समावेश असल्याचेही डॉ. गुप्ता यांनी सांगितले.

२५ लाख रुपयांची बक्षिसेउत्तम कामगिरी करणाऱ्या पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना २०२१ मध्ये तब्बल २५ लाख रुपयांचे रिवॉर्ड दिले आहेत. त्याची कोणतीही जाहिरातबाजी केली नाही. जे अधिकारी काम करतात, त्यांचे कौतुक केले जाते. काहींचे कानही टोचले जातात. ते बंद दाराच्या आड असते. त्याचीही वाच्यता केली जात नाही, असेही डॉ. गुप्ता यांनी सांगितले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबाद