शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
4
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
5
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
6
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
7
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
8
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
9
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
10
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
11
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
12
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
13
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
14
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
15
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
16
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
17
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
18
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
19
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
20
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय

उत्तम तपासासाठी २५ लाख रुपयांची बक्षिसे दिली, गुन्ह्यांचा उलगडा करण्यात शहर पोलीस सहा वर्षात सर्वोत्तम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2022 15:43 IST

पोलीस आयुक्त निखिल गुप्ता : ८४ टक्के गुन्ह्यांचा तपास; प्रसंगी बंद दाराआड कानपिचक्याही

औरंगाबाद : शहर पोलिसांनी नुकत्याच संपलेल्या २०२१ या वर्षामध्ये गुन्ह्यांचा उलगडा करण्यात मागील सहा वर्षात सर्वोत्तम कामगिरी केली आहे. २०२१ मध्ये दाखल ४ हजार ५८५ गुन्ह्यांपैकी ३ हजार ५१४ गुन्हे उघड केले आहेत. गुन्हे उघड करण्याची टक्केवारी तब्बल ८५ टक्के एवढी असल्याची माहिती पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांनी पत्रकार परिषदेत दिली.

शहर पोलीस आयुक्तालयात २०२१ मध्ये पोलिसांनी केलेल्या कामगिरीची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी आयुक्त डाॅ. गुप्ता यांच्यासह उपायुक्त अपर्णा गिते, उज्ज्वला वनकर, गुन्हे शाखेचे निरीक्षक अविनाश आघाव यांची उपस्थिती होती. यावेळी डॉ. गुप्ता म्हणाले, शहर पोलिसांनी वर्षभरात उत्तम कामगिरी केली आहे. काही बाबींमध्ये कमतरताही राहिल्या आहेत. त्यामध्ये सुधारणा करण्यात येत आहे. गुन्हे शाखा, सायबर शाखा यांनी गुन्ह्यांची उकल करण्यात महत्त्वाची जबाबदारी निभावली आहे. दोन्ही शाखांचे काम उत्तम झाले आहे. याशिवाय सिटी चौक पोलिसांनीही दुचाकी शोधण्यात मोठी आघाडी घेतली. मागील वर्षात एकूण ३१ खुनाचे प्रकार उघडकीस आले. त्यातील सर्वच आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या. खुनाचा प्रयत्न ४१, सदोष मनुष्यवधाचे ४ गुन्हे नोंदविण्यात आले. ते सर्वच उघड करण्यात आले. वर्षभरात महिलांवर बलात्काराचे ८८ गुन्हे दाखल झाले. त्यातील ८७ गुन्हे उघड करण्यात पोलिसांना यश मिळाल्याचे डॉ. गुप्ता यांनी सांगितले.

हद्दवाढीचा प्रस्ताव अंतिम टप्प्यातशहर पोलीस आयुक्तालयाची हद्दवाढ करण्याचा प्रस्ताव पोलीस महासंचालकांकडे दाखल केलेला आहे. त्यावर महासंचालक कार्यालयाने संबंधित हद्दवाढीत येणाऱ्या ग्रामपंचायतीचे प्रस्ताव मागविले आहेत. त्यासाठी जिल्हाधिकारी आणि जि.प. च्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची मदत मागितली आहे. यासाठी पालकमंत्री प्रयत्न करीत आहेत. या हद्दवाढीमध्ये चिकलठाणा पोलीस ठाण्यासह शेंद्रा, बिडकीन इ. भागांचा समावेश असल्याचेही डॉ. गुप्ता यांनी सांगितले.

२५ लाख रुपयांची बक्षिसेउत्तम कामगिरी करणाऱ्या पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना २०२१ मध्ये तब्बल २५ लाख रुपयांचे रिवॉर्ड दिले आहेत. त्याची कोणतीही जाहिरातबाजी केली नाही. जे अधिकारी काम करतात, त्यांचे कौतुक केले जाते. काहींचे कानही टोचले जातात. ते बंद दाराच्या आड असते. त्याचीही वाच्यता केली जात नाही, असेही डॉ. गुप्ता यांनी सांगितले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबाद