शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
2
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
3
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
4
"देशाला दिशा देण्याऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
5
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
6
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
7
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
8
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
9
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
10
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
11
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
12
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
13
'देशांतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका', भारताने दलाई लामांना पाठिंबा दिल्याने चीन संतापला
14
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!
15
मथुरा श्रीकृष्ण जन्मभूमी प्रकरण: हिंदू पक्षाला झटका, शाही ईदगाहला वादग्रस्त ढाचा घोषित करण्याची मागणी HC नं फेटाळली
16
ENG vs IND : जलद शतकी खेळीसह Jamie Smith चा पराक्रम! १४८ वर्षांत असं पहिल्यांदा घडलं
17
'रामायण'मध्ये दिग्गज कलाकारांची फौज रावणावर तुटून पडणार, अमिताभसह कोण साकारणार कोणती भूमिका?
18
'बिहार की बेटी', PM मोदींनी उल्लेख केलेल्या त्रिनिदादच्या पंतप्रधान कोण? बिहारशी काय संबंध?
19
एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीसांनी घेतले शरद पवारांचे नाव
20
Video: मोठी बातमी! एकनाथ शिंदेंकडून पुण्यात 'जय महाराष्ट्र' पाठोपाठ 'जय गुजरात'चा नारा; आधीच मराठी-हिंदी वाद...

काँग्रेसच्या आढावा बैठकीत औरंगाबाद जिल्हा आज करणार अहवाल सादर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2019 11:45 IST

पराभवाची कारणमीमांसा, आगामी विधानसभा निवडणुकांची तयारी आदी मुद्यांवर होणार चर्चा

ठळक मुद्दे लोकसभा निवडणुकीतील पराभवावरही बैठकीत चर्चा होईल.संभाव्य उमेदवारांची चर्चा आदी ठळक मुद्यांची यावेळी चर्चा होईल.

औरंगाबाद : लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर प्रदेश काँग्रेसतर्फे दि. ७ व ८ जून रोजी जिल्हावार आढावा घेण्यात येणार आहे. मुंबईच्या टिळक भवनात यासाठी त्या त्या जिल्ह्याचे अध्यक्ष, शहराध्यक्ष, लोकसभेचे उमेदवार, आजी-माजी आमदार, प्रदेशच्या पदाधिकाऱ्यांना पाचारण करण्यात आले आहे. 

आज सकाळी १० वा. औरंगाबाद जिल्ह्याचा आढावा घेण्यात येईल. त्यासाठी ४५ मिनिटे देण्यात आली आहेत. प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष केशवराव औताडे, जिल्हा काँग्रेसचे प्रभारी अध्यक्ष अनिल पटेल, शहर-जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष नामदेवराव तायडे, लोकसभेचे काँग्रेस-राष्ट्रवादी महाआघाडीचे उमेदवार आ. सुभाष झांबड यांच्यासह आणखी काही मंडळी मुंबईकडे रवाना झाली आहे. 

लोकसभा निवडणुकीतील पराभवाची कारणमीमांसा, आगामी विधानसभा निवडणुकांची तयारी, संभाव्य उमेदवारांची चर्चा आदी ठळक मुद्यांची यावेळी चर्चा होईल. प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अशोकराव चव्हाण यांची या बैठकीस प्रमुख उपस्थिती राहणार आहे. प्रत्येक पदाधिकारी आपला लेखी अहवाल सादर करील. दोन दिवसांपूर्वीच अशोकराव चव्हाण यांनी औरंगाबादच्या पदाधिकाऱ्यांशी सिल्लोड विधानसभेच्या अनुषंगाने चर्चा केली होती. नांदेडकडे रवाना होताना गाडीत करमाडपर्यंत ही चर्चा अनिल पटेल, नामदेवराव पवार, प्रभाकर पालोदकर, माजी खासदार तुकाराम रेंगे पाटील यांच्यात झाली. सिल्लोडमध्ये यावेळी विधानसभेची निवडणूक मोठी रंगतदार होण्याची चिन्हे आहेत. वाढता विरोध असूनही अब्दुल सत्तार यांना भाजपमध्ये प्रवेश मिळालाच आणि उमेदवारीही मिळाली तर काँग्रेसतर्फे तगडा उमेदवार द्यावा यादृष्टीने हालचाली वाढल्या आहेत. त्यादृष्टीने प्रभाकर पालोदकर, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीराम महाजन अशा नावांवर चर्चा चालू आहे. 

नुकत्याच्या झालेल्या लोकसभा निवडणुकीतील पराभवावरही उद्याच्या बैठकीत चर्चा होईल. या निवडणुकीत काँग्रेसचा प्रचार न केलेल्या कार्यकर्त्यांवर व पदाधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा यापूर्वीच प्रभारी जिल्हाध्यक्ष अनिल पटेल यांनी दिला आहे. या पार्श्वभूमीवर आगामी काही दिवसांमध्ये काय काय घडते, हे पाहणे औत्सुक्याचेच ठरेल. 

टॅग्स :congressकाँग्रेसAurangabadऔरंगाबादLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९vidhan sabhaविधानसभा