शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

काँग्रेसच्या आढावा बैठकीत औरंगाबाद जिल्हा आज करणार अहवाल सादर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2019 11:45 IST

पराभवाची कारणमीमांसा, आगामी विधानसभा निवडणुकांची तयारी आदी मुद्यांवर होणार चर्चा

ठळक मुद्दे लोकसभा निवडणुकीतील पराभवावरही बैठकीत चर्चा होईल.संभाव्य उमेदवारांची चर्चा आदी ठळक मुद्यांची यावेळी चर्चा होईल.

औरंगाबाद : लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर प्रदेश काँग्रेसतर्फे दि. ७ व ८ जून रोजी जिल्हावार आढावा घेण्यात येणार आहे. मुंबईच्या टिळक भवनात यासाठी त्या त्या जिल्ह्याचे अध्यक्ष, शहराध्यक्ष, लोकसभेचे उमेदवार, आजी-माजी आमदार, प्रदेशच्या पदाधिकाऱ्यांना पाचारण करण्यात आले आहे. 

आज सकाळी १० वा. औरंगाबाद जिल्ह्याचा आढावा घेण्यात येईल. त्यासाठी ४५ मिनिटे देण्यात आली आहेत. प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष केशवराव औताडे, जिल्हा काँग्रेसचे प्रभारी अध्यक्ष अनिल पटेल, शहर-जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष नामदेवराव तायडे, लोकसभेचे काँग्रेस-राष्ट्रवादी महाआघाडीचे उमेदवार आ. सुभाष झांबड यांच्यासह आणखी काही मंडळी मुंबईकडे रवाना झाली आहे. 

लोकसभा निवडणुकीतील पराभवाची कारणमीमांसा, आगामी विधानसभा निवडणुकांची तयारी, संभाव्य उमेदवारांची चर्चा आदी ठळक मुद्यांची यावेळी चर्चा होईल. प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अशोकराव चव्हाण यांची या बैठकीस प्रमुख उपस्थिती राहणार आहे. प्रत्येक पदाधिकारी आपला लेखी अहवाल सादर करील. दोन दिवसांपूर्वीच अशोकराव चव्हाण यांनी औरंगाबादच्या पदाधिकाऱ्यांशी सिल्लोड विधानसभेच्या अनुषंगाने चर्चा केली होती. नांदेडकडे रवाना होताना गाडीत करमाडपर्यंत ही चर्चा अनिल पटेल, नामदेवराव पवार, प्रभाकर पालोदकर, माजी खासदार तुकाराम रेंगे पाटील यांच्यात झाली. सिल्लोडमध्ये यावेळी विधानसभेची निवडणूक मोठी रंगतदार होण्याची चिन्हे आहेत. वाढता विरोध असूनही अब्दुल सत्तार यांना भाजपमध्ये प्रवेश मिळालाच आणि उमेदवारीही मिळाली तर काँग्रेसतर्फे तगडा उमेदवार द्यावा यादृष्टीने हालचाली वाढल्या आहेत. त्यादृष्टीने प्रभाकर पालोदकर, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीराम महाजन अशा नावांवर चर्चा चालू आहे. 

नुकत्याच्या झालेल्या लोकसभा निवडणुकीतील पराभवावरही उद्याच्या बैठकीत चर्चा होईल. या निवडणुकीत काँग्रेसचा प्रचार न केलेल्या कार्यकर्त्यांवर व पदाधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा यापूर्वीच प्रभारी जिल्हाध्यक्ष अनिल पटेल यांनी दिला आहे. या पार्श्वभूमीवर आगामी काही दिवसांमध्ये काय काय घडते, हे पाहणे औत्सुक्याचेच ठरेल. 

टॅग्स :congressकाँग्रेसAurangabadऔरंगाबादLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९vidhan sabhaविधानसभा