शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
2
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
3
अर्चना तिवारी चतुर निघाली! ट्रेनमध्ये प्रेम, नेपाळला पळून जाण्याचा प्रयत्न; घरच्यांनी किडनॅपिंकची तक्रार केली पण निघाले वेगळेच
4
१ मोटरसायकल, १ मिनी ट्रक आणि प्रवासी बस; अफगाणिस्तानमध्ये भीषण आगीत ६९ जणांचा मृत्यू
5
बेस्ट निवडणुकीतील दारुण पराभवावर ठाकरे गटाच्या पॅनेलची प्रतिक्रिया...; 'म्हणून हरलो...'
6
‘३० दिवसांहून अधिक काळ अटक झाल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पद सोडावे लागणार’ शहांनी विधेयक मांडले, लोकसभेचे कामकाज तहकूब
7
"मी निर्दोष सिद्ध झालो नाही तोपर्यंत..."; राजीनामा दिला होता का म्हणणाऱ्या काँग्रेस खासदाराला अमित शहांचे प्रत्युत्तर
8
फैजल खानचं आमिरला DNA चाचणी करण्याचं आव्हान, म्हणाला, "रीनाशी लग्न केलं तेव्हाच..."
9
'ही' कंपनी देणार ८ बोनस शेअर्स; २८ ऑगस्ट आहे रेकॉर्ड डेट, शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
10
नोकरीची उत्तम संधी! एलआयसीमध्ये विविध पदांची भरती, पगार एक लाखापेक्षा अधिक
11
Ganesh Festival 2025: गणेश मूर्ती विकत घेताना टाळा 'या' चुका; जाणून घ्या नियम!
12
Smallest Countries : जगातील सगळ्यात लहान ५ देश; दुसऱ्या क्रमांकाच्या देशात तर अवघ्या एका दिवसात फिरून होईल!
13
श्रावण शिवरात्रिला गुरुपुष्यामृत योग: ‘असे’ करा शिव-लक्ष्मी पूजन; वैभव-ऐश्वर्य-सुबत्ता लाभेल!
14
मुंबई महापालिकेत ठाकरे बंधूंना टक्कर देणार भाजपाचे 'जय-वीरू'; आशिष शेलारांनी डिवचलं, म्हणाले...
15
शेअर आहे की पैशांचं झाड...? ५ महिन्यांत २००%, तर आतापर्यंत दिलाय ५१३१२% चा छप्परफाड परतावा; गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
16
अमूल गर्ल कोण, एक नाही दोन? एवढ्या वर्षांनी सिक्रेट बाहेर आले, त्या प्रसिद्ध राजकीय नेत्याच्या सख्ख्या बहिणी...
17
उत्तर प्रदेशातील आणखी एका शहराचे नामांतर, नवे नाव असणार 'परशुरामपुरी'
18
बेस्ट निवडणूक २०२५: CM फडणवीसांची मदत, ठाकरेंचा पराभव; शशांक राव यांनी सांगितली Inside Story
19
ICC ODI Rankings : केशव महाराज नंबर वन बॉलर! बॅटरच्या यादीतून रोहित-विराटचं नाव 'गायब'; कारण...
20
Astro Tips: हा हळदीचा ट्रेंड नाही तर आयुष्यातील नकारात्मकता घालवण्यासाठी आहे गुरुवारचा उपाय!

काँग्रेसच्या आढावा बैठकीत औरंगाबाद जिल्हा आज करणार अहवाल सादर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2019 11:45 IST

पराभवाची कारणमीमांसा, आगामी विधानसभा निवडणुकांची तयारी आदी मुद्यांवर होणार चर्चा

ठळक मुद्दे लोकसभा निवडणुकीतील पराभवावरही बैठकीत चर्चा होईल.संभाव्य उमेदवारांची चर्चा आदी ठळक मुद्यांची यावेळी चर्चा होईल.

औरंगाबाद : लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर प्रदेश काँग्रेसतर्फे दि. ७ व ८ जून रोजी जिल्हावार आढावा घेण्यात येणार आहे. मुंबईच्या टिळक भवनात यासाठी त्या त्या जिल्ह्याचे अध्यक्ष, शहराध्यक्ष, लोकसभेचे उमेदवार, आजी-माजी आमदार, प्रदेशच्या पदाधिकाऱ्यांना पाचारण करण्यात आले आहे. 

आज सकाळी १० वा. औरंगाबाद जिल्ह्याचा आढावा घेण्यात येईल. त्यासाठी ४५ मिनिटे देण्यात आली आहेत. प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष केशवराव औताडे, जिल्हा काँग्रेसचे प्रभारी अध्यक्ष अनिल पटेल, शहर-जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष नामदेवराव तायडे, लोकसभेचे काँग्रेस-राष्ट्रवादी महाआघाडीचे उमेदवार आ. सुभाष झांबड यांच्यासह आणखी काही मंडळी मुंबईकडे रवाना झाली आहे. 

लोकसभा निवडणुकीतील पराभवाची कारणमीमांसा, आगामी विधानसभा निवडणुकांची तयारी, संभाव्य उमेदवारांची चर्चा आदी ठळक मुद्यांची यावेळी चर्चा होईल. प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अशोकराव चव्हाण यांची या बैठकीस प्रमुख उपस्थिती राहणार आहे. प्रत्येक पदाधिकारी आपला लेखी अहवाल सादर करील. दोन दिवसांपूर्वीच अशोकराव चव्हाण यांनी औरंगाबादच्या पदाधिकाऱ्यांशी सिल्लोड विधानसभेच्या अनुषंगाने चर्चा केली होती. नांदेडकडे रवाना होताना गाडीत करमाडपर्यंत ही चर्चा अनिल पटेल, नामदेवराव पवार, प्रभाकर पालोदकर, माजी खासदार तुकाराम रेंगे पाटील यांच्यात झाली. सिल्लोडमध्ये यावेळी विधानसभेची निवडणूक मोठी रंगतदार होण्याची चिन्हे आहेत. वाढता विरोध असूनही अब्दुल सत्तार यांना भाजपमध्ये प्रवेश मिळालाच आणि उमेदवारीही मिळाली तर काँग्रेसतर्फे तगडा उमेदवार द्यावा यादृष्टीने हालचाली वाढल्या आहेत. त्यादृष्टीने प्रभाकर पालोदकर, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीराम महाजन अशा नावांवर चर्चा चालू आहे. 

नुकत्याच्या झालेल्या लोकसभा निवडणुकीतील पराभवावरही उद्याच्या बैठकीत चर्चा होईल. या निवडणुकीत काँग्रेसचा प्रचार न केलेल्या कार्यकर्त्यांवर व पदाधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा यापूर्वीच प्रभारी जिल्हाध्यक्ष अनिल पटेल यांनी दिला आहे. या पार्श्वभूमीवर आगामी काही दिवसांमध्ये काय काय घडते, हे पाहणे औत्सुक्याचेच ठरेल. 

टॅग्स :congressकाँग्रेसAurangabadऔरंगाबादLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९vidhan sabhaविधानसभा