शहरं
Join us  
Trending Stories
1
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
2
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
3
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
4
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
5
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
6
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
7
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
8
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
9
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
10
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
11
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
12
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
13
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
14
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
15
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
16
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
17
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
18
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
19
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
20
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू

महसूल विभागाची कमाल, शेतीच नाही अन आले अतिवृष्टीचे अनुदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2021 6:07 PM

शेती नसणाऱ्या व्यक्तीच्या खात्यावर अतिवृष्टीची ८२५ रुपये नुकसान भरपाई जमा झाली आहे.

सिल्लोड ( औरंगाबाद ) : ज्यांना शेती आहे ज्यांचे अतिवृष्टी मुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले अशा शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्यास शेतकऱ्यांना शासकीय कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागतात. मात्र, एका भूमीहीन व्यक्तीस अतिवृष्टीची 825 रुपये नुकसान भरपाई मिळाल्याचा प्रकार अजिंठा येथे उघडकीस आला (no agricultural land but got excess rainfall subsidy) . त्या भूमिहीन व्यक्तीने मिळालेली रक्कम शासन खात्यावर जमा करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

अजिंठा येथील मोहम्मद अब्दुल मशहूद मुगीस चाऊस यांच्या कडे शेती नाही फक्त त्यांच्याकडे एक राहते घर आहे. त्यांना जमीन नाही इतकेच नव्हे तर त्यांच्या परिवारात वडिलोपार्जित कोणतीही जमीन सुद्धा नाही. तरी ही अजिंठा येथील एसबीआय शाखेतील त्यांच्या खात्यात 26 नोव्हेंबर रोजी  अतिवृष्टीचे 825 रुपये नुकसान भरपाई जमा झाल्याचा मेसेज मोबाईलवर आला आहे. बँकेत जाऊन चौकशी केली असता त्यांना अतिवृष्टीची नुकसान भरपाई जमा झाल्याचे सांगण्यात आले. यानंतर मोहम्मद अब्दुल मशहूद मुगीस चाऊस यांनी सिल्लोडचे  तहसीलदार विक्रम राजपूत, उपविभागीय अधिकारी संजीव मोरे यांच्याकडे तक्रार केली आहे. जमा झालेले अनुदान सरकारी खात्यावर जमा करून करावे, तसेच भूमिहीन असताना अनुदान कसे मिळाले याची चौकशी करण्याची मागणी केली आहे.

कठोर कारवाई केली जाईलचौकशी समिती नेमण्यात आली आहे. दोषींवर कठोर कारवाई केली जाईल. मोहम्मद अब्दुल मशहूद मुगीस चाऊस यांनी प्रशासनाची चूक लक्षात आणून दिली. -  उपविभागीय अधिकारी संजीव मोरे सिल्लोड.

मला अनुदान मिळाले कसे..भूमिहीन असताना नुकसान भरपाई मिळाली याचे आश्चर्य वाटत आहे.  लक्षात आले नसते तर कदाचित माझ्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला असता. आता कुणावर गुन्हे दाखल होतात याकडे माझे लक्ष आहे.-मोहम्मद अब्दुल मशहूद मुगीस चाऊस, अजिंठा

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरीRevenue Departmentमहसूल विभाग