शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Alert: मुंबईत रेड अलर्ट; तीन ते चार तासात 'अतिमुसळधार' कोसळणार, शाळांना सुट्टी जाहीर
2
School Holiday: मुंबईत शाळांना सुट्टी जाहीर, पाणी साचल्याने अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प; ४८ तासांसाठी रेड अलर्ट जारी
3
आभाळ फाटले! मुखेड तालुक्यातील सहा गावांत पाणी शिरले; बेपत्ता १२ जणांचा शोध सुरु
4
चेकच्या मागच्या बाजूला सही का करतात? ९०% लोकांना या प्रश्नाचे उत्तर माहित नसणार
5
‘मत चोरी’चा वाद वाढला, विरोधक मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याच्या तयारीत 
6
Technology: ATM मधून पैसे काढल्यानंतर तुमचा PIN सुरक्षित राहतो का? 'अशी' घ्या काळजी!
7
Asia Cup India Squad : गंभीरनं 'फिल्डिंग' लावली तर गिल खेळणार; नाहीतर... आगरकर हे ३ मोठे निर्णय घेणार?
8
धक्कादायक! रणथंभोर व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांची गाडी अचानक पडली बंद आणि मग...
9
श्रावणातला शेवटचा आठवडा; 'या' दिशेला लावा बेलाचे झाड, घरात धन, समृद्धी, पैसा येईल अपार
10
"सिनेमाच्या नावाखाली अभिनेते मजा..." कमी वयाच्या अभिनेत्रींसोबत काम करण्यावर आर माधवनचं भाष्य
11
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
12
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
13
भाडे देऊन लाखोंचे नुकसान की EMI देऊन घर खरेदी करावे? ५० लाखांच्या घराचं आर्थिक गणित समजून घ्या
14
फ्लॉप शोचा सिलसिला संपेना! अन् म्हणे; सलमानचा पाक संघ आशिया कपमध्ये टीम इंडियासमोर हिट ठरेल
15
Apple नं ट्रम्प आणि चीनला दाखवला ठेंगा; भारतात आणखी एका प्रकल्पातून सुरू केलं iPhone चं उत्पादन
16
Home Remedy: महागडी हेअर ट्रीटमेंट सोडा, ५० रुपयांत लांबसडक, घनदाट, काळेभोर केस मिळवा 
17
जन्माष्टमीच्या मिरवणुकीतील रथ विजेच्या तारांना चिकटला, शॉक लागून ५ जणांचा मृत्यू, केंद्रीय मंत्र्यांचा सुरक्षा रक्षकही जखमी 
18
'सिटी ऑफ ड्रीम्स'नंतर प्रिया बापटचा पुन्हा 'तो' सीन, अभिनेत्री सुरवीन चावलासोबत लिपलॉक
19
दरमहा १२,५०० रुपये गुंतवा आणि ४० लाख रुपये मिळवा! पोस्ट ऑफिसची ही योजना देते करमुक्त परतावा
20
शेतकऱ्यांवर चिनी संकट! महत्त्वाच्या खनिजांवरील निर्यात कमी, रोखला खतांचाही पुरवठा

औरंगाबादेत वाळूचा ६० कोटींचा बुडाला महसूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2018 00:27 IST

जिल्हा प्रशासनाच्या हद्दीतील वाळूपट्ट्यांतून सरत्या वर्षात तिसऱ्यांदा लिलाव करण्याची वेळ आली आहे. वाळूपट्ट्याच्या लिलावातून सरकारला ६० कोटींचा महसूल जातो. या वर्षातील महसूल पूर्णत: बुडाला असून, तेवढ्या महसुलाच्या तुलनेत वाळूची तस्करी झाल्याची शक्यता बळावली आहे.

ठळक मुद्देहतबलता : बोटावर मोजण्याइतक्या पट्ट्यांचा लिलाव; वाळूचोरांची झाली चांदी

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : जिल्हा प्रशासनाच्या हद्दीतील वाळूपट्ट्यांतून सरत्या वर्षात तिसऱ्यांदा लिलाव करण्याची वेळ आली आहे. वाळूपट्ट्याच्या लिलावातून सरकारला ६० कोटींचा महसूल जातो. या वर्षातील महसूल पूर्णत: बुडाला असून, तेवढ्या महसुलाच्या तुलनेत वाळूची तस्करी झाल्याची शक्यता बळावली आहे.आॅक्टोबर २०१७ ते सप्टेंबर २०१८ या कालावधीसाठी जिल्ह्यात ३१ वाळूपट्ट्यांची लिलाव प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. त्यातून जिल्हा प्रशासनाला ६० कोटी रुपयांचा महसूल अपेक्षित होता. आजवर पूर्ण क्षमतेने लिलावच झाला नाही. त्यामुळे सरकारचे उत्पन्न बुडाले. ३ वर्षांपासून वाळू लिलाव प्रक्रियेत सहभाग न घेता चोरट्या मार्गने वाळू उपसा करणाºया तस्करांच्या मुसक्या आवळण्यात प्रशासन अपयशी ठरले आहे. ९ महिन्यांत प्रशासनाने वाळू तस्करांना पूर्णत: अभय दिले. प्रतिसाद न मिळालेल्या घाटांमधून वाळू चोरी होते. सरकारचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडतो हा नित्याचा प्रकार असताना प्रशासन गंभीर नाही. ३१ पैकी ७ पट्ट्यांची लिलाव प्रक्रिया झाली. त्यातून एका पट्ट्याचा लिलाव अंतिम झाला. ४ जणांनी भरलेली अनामत रक्कम प्रशासनाने जप्त केली. अशी स्थिती सध्या असून, तिसºयांदा लिलावासाठी निविदा मागविण्याच्या हालचाली सुरू आहेत. तरीही शहर परिसरामध्ये वाळू येते कुठून, असा प्रश्न आहे. पट्टा लिलावाला देण्यापूर्वी एका पट्ट्यातून किती ब्रास वाळू उपसा करायचा याची अंदाजे माहिती प्रशासनाने खरेदीदारांना दिलेली असते.वाळूपट्ट्यांचे सर्वेक्षण रखडलेवाळू चोरीला लगाम लावण्यासाठी प्रशासनाने लिलावात प्रतिसाद न मिळालेल्या वाळूपट्ट्यांमध्ये किती वाळू शिल्लक आहे याचे सर्वेक्षण करण्याचा घेतलेला निर्णय कागदावरच राहिला. एकही वाळूपट्टा खरेदीदाराच्या ताब्यात नाही. मग वाळू येते कुठून? यासाठी प्रशासनाने पथक स्थापन करण्याचा निर्णय घेतला. त्या पथकानेही काही केले नाही.महसूल कोणाकडून वसूल करणारजिल्हाधिकाºयांपासून तलाठ्यांपर्यंत पूर्ण यंत्रणेवर या महसूल वसुलीची जबाबदारी आहे. शासनाचे ६० कोटी रुपये बुडाल्यास ते कोणाकडून वसूल करणार, असा प्रश्न आहे. ज्या ठिकाणच्या वाळूपट्ट्यातून चोरी करण्यात येते त्या भागातील तलाठ्यांपासून ते महसूल विभागाचे कर्मचारी तसेच पोलीस प्रशासनातील कर्मचारीही वाळू चोरीकडे कानाडोळा करीत असल्याचे वारंवार आरोप होतात. गौण व खनिज विभाग निविदा प्रक्रियेपलीकडे काहीही करीत नाही. जुजबी कारवाई करून प्रसिद्धी मिळविण्यासाठी काही अधिकारी चमकोगिरी करण्यात पुढे असतात. चिरीमिरीपुरती कारवाई झाल्यानंतर पुन्हा वाळू उपसा करण्यासाठी ती वाहने धावतात.

टॅग्स :sandवाळूAurangabadऔरंगाबादcollectorजिल्हाधिकारी