शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
3
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
4
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
5
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
6
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
7
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
8
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
9
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
10
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
11
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
12
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?
13
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
14
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
15
Mumbai Accident: ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
16
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
17
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
18
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
19
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
20
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  

सलग चौथ्यावर्षी खरीप हंगाम हिरावला; मराठवाड्यात परतीच्या पावसाचा २० लाख हेक्टरला फटका

By विकास राऊत | Updated: October 25, 2022 12:45 IST

पंचनामे पूर्ण होण्यास आठवडा लागणार, अतिवृष्टी आणि सततचा पाऊस यांमुळे हातातोंडाशी आलेले खरीप हंगामातील पिकाचे पूर्णपणे नुकसान झाले आहे.

औरंगाबाद : मराठवाड्यात परतीच्या पावसाने शेतमालाचे मोठे नुकसान केले आहे. प्राथमिक अंदाज अहवालानुसार विभागात सुमारे २० लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे पूर्ण हाेण्यास आठवडा लागेल, असे सूत्रांनी सांगितले.

मराठवाड्यात सलग चार वर्षांपासून खरीप हंगामातील पिकांचे अतिवृष्टीमुळे नुकसान होत आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. जून ते ऑगस्ट या तीन महिन्यांत विभागात अतिवृष्टीमुळे ७ लाख ३८ हजार ७५०.३६ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले. सततच्या पावसामुळे,परंतु अतिवृष्टी न झालेल्या भागात ४ लाख ३९ हजार ६२० हेक्टरचे नुकसान झाले. सप्टेंबर आणि ऑक्टोबर या दोन महिन्यांतच विभागात प्राथमिक पंचनाम्यानुसार २० लाख हेक्टर क्षेत्रातील खरीप पिके बाधित झाली आहेत,अशी माहिती प्रशासनातील सूत्रांनी दिली. सध्या तरी एकूण ३१ लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचे दिसत आहे.

मराठवाड्यात सलग चौथ्या वर्षीही पावसाने खरीप हंगाम हिरावून घेतला. अतिवृष्टी आणि सततचा पाऊस यांमुळे हातातोंडाशी आलेले खरीप हंगामातील पिकाचे पूर्णपणे नुकसान झाले आहे. त्यामुळे ग्रामीण भागात शेतकऱ्यांच्या दिवाळीवर दु:खाचे सावट आहे. जून ते ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे औरंगाबाद, बीड वगळता इतर सहा जिल्ह्यांत पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या पीक नुकसानीपोटी सरकारने १,००८ कोटी रुपयांचे अनुदान सप्टेंबरमध्येच वितरित केले होते. हे अनुदान वाटप होत नाही,तोच विभागात पुन्हा पावसाचा जोर वाढला. दरम्यान,सततच्या पावसामुळे झालेल्या नुकसान भरपाईसाठी शासनाने ५९९ कोटींची मदत जाहीर केली. गोगलगायीमुळे पिकांच्या झालेल्या नुकसानीपोटी ९८ कोटींची मदत देण्यात आली. शासनाने मराठवाड्यासाठी सुमारे १७०५ कोटी रुपये देऊ केले आहेत.

नुकसान क्षेत्र वाढण्याची शक्यताऔरंगाबाद जिल्ह्यात सप्टेबर,ऑक्टोबर या दोन महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे सर्वाधिक ४ लाख ३० हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. उर्वरित सात जिल्ह्यात १५ लाख ७० हजार हेक्टर क्षेत्रातील पिके बाधित झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. सध्या पंचनामे सुरूच आहे. बहुतांश भागातील शेतात अद्याप पाणी असल्याने पंचनामे पूर्ण होण्यास आठवडा लागेल.

पाऊस थांबला थंडीची चाहूलविभागात २१ ऑक्टोबर पाऊस थांबला आहे. एकूण ६७९ मिली मीटरच्या वार्षिक सरासरीच्या तुलनेत ९११ मि.मी पाऊस झाला आहे. हे प्रमाण सरासरीच्या १२५ टक्के असून,सीतरंग या चक्रिवादळामुळे पुन्हा पाऊस येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. दरम्यान,हवामानात बदल झाला असून,थंडी जाणवू लागली आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादMarathwadaमराठवाडाRainपाऊस