शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

सलग चौथ्यावर्षी खरीप हंगाम हिरावला; मराठवाड्यात परतीच्या पावसाचा २० लाख हेक्टरला फटका

By विकास राऊत | Updated: October 25, 2022 12:45 IST

पंचनामे पूर्ण होण्यास आठवडा लागणार, अतिवृष्टी आणि सततचा पाऊस यांमुळे हातातोंडाशी आलेले खरीप हंगामातील पिकाचे पूर्णपणे नुकसान झाले आहे.

औरंगाबाद : मराठवाड्यात परतीच्या पावसाने शेतमालाचे मोठे नुकसान केले आहे. प्राथमिक अंदाज अहवालानुसार विभागात सुमारे २० लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे पूर्ण हाेण्यास आठवडा लागेल, असे सूत्रांनी सांगितले.

मराठवाड्यात सलग चार वर्षांपासून खरीप हंगामातील पिकांचे अतिवृष्टीमुळे नुकसान होत आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. जून ते ऑगस्ट या तीन महिन्यांत विभागात अतिवृष्टीमुळे ७ लाख ३८ हजार ७५०.३६ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले. सततच्या पावसामुळे,परंतु अतिवृष्टी न झालेल्या भागात ४ लाख ३९ हजार ६२० हेक्टरचे नुकसान झाले. सप्टेंबर आणि ऑक्टोबर या दोन महिन्यांतच विभागात प्राथमिक पंचनाम्यानुसार २० लाख हेक्टर क्षेत्रातील खरीप पिके बाधित झाली आहेत,अशी माहिती प्रशासनातील सूत्रांनी दिली. सध्या तरी एकूण ३१ लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचे दिसत आहे.

मराठवाड्यात सलग चौथ्या वर्षीही पावसाने खरीप हंगाम हिरावून घेतला. अतिवृष्टी आणि सततचा पाऊस यांमुळे हातातोंडाशी आलेले खरीप हंगामातील पिकाचे पूर्णपणे नुकसान झाले आहे. त्यामुळे ग्रामीण भागात शेतकऱ्यांच्या दिवाळीवर दु:खाचे सावट आहे. जून ते ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे औरंगाबाद, बीड वगळता इतर सहा जिल्ह्यांत पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या पीक नुकसानीपोटी सरकारने १,००८ कोटी रुपयांचे अनुदान सप्टेंबरमध्येच वितरित केले होते. हे अनुदान वाटप होत नाही,तोच विभागात पुन्हा पावसाचा जोर वाढला. दरम्यान,सततच्या पावसामुळे झालेल्या नुकसान भरपाईसाठी शासनाने ५९९ कोटींची मदत जाहीर केली. गोगलगायीमुळे पिकांच्या झालेल्या नुकसानीपोटी ९८ कोटींची मदत देण्यात आली. शासनाने मराठवाड्यासाठी सुमारे १७०५ कोटी रुपये देऊ केले आहेत.

नुकसान क्षेत्र वाढण्याची शक्यताऔरंगाबाद जिल्ह्यात सप्टेबर,ऑक्टोबर या दोन महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे सर्वाधिक ४ लाख ३० हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. उर्वरित सात जिल्ह्यात १५ लाख ७० हजार हेक्टर क्षेत्रातील पिके बाधित झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. सध्या पंचनामे सुरूच आहे. बहुतांश भागातील शेतात अद्याप पाणी असल्याने पंचनामे पूर्ण होण्यास आठवडा लागेल.

पाऊस थांबला थंडीची चाहूलविभागात २१ ऑक्टोबर पाऊस थांबला आहे. एकूण ६७९ मिली मीटरच्या वार्षिक सरासरीच्या तुलनेत ९११ मि.मी पाऊस झाला आहे. हे प्रमाण सरासरीच्या १२५ टक्के असून,सीतरंग या चक्रिवादळामुळे पुन्हा पाऊस येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. दरम्यान,हवामानात बदल झाला असून,थंडी जाणवू लागली आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादMarathwadaमराठवाडाRainपाऊस