शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

सलग चौथ्यावर्षी खरीप हंगाम हिरावला; मराठवाड्यात परतीच्या पावसाचा २० लाख हेक्टरला फटका

By विकास राऊत | Updated: October 25, 2022 12:45 IST

पंचनामे पूर्ण होण्यास आठवडा लागणार, अतिवृष्टी आणि सततचा पाऊस यांमुळे हातातोंडाशी आलेले खरीप हंगामातील पिकाचे पूर्णपणे नुकसान झाले आहे.

औरंगाबाद : मराठवाड्यात परतीच्या पावसाने शेतमालाचे मोठे नुकसान केले आहे. प्राथमिक अंदाज अहवालानुसार विभागात सुमारे २० लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे पूर्ण हाेण्यास आठवडा लागेल, असे सूत्रांनी सांगितले.

मराठवाड्यात सलग चार वर्षांपासून खरीप हंगामातील पिकांचे अतिवृष्टीमुळे नुकसान होत आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. जून ते ऑगस्ट या तीन महिन्यांत विभागात अतिवृष्टीमुळे ७ लाख ३८ हजार ७५०.३६ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले. सततच्या पावसामुळे,परंतु अतिवृष्टी न झालेल्या भागात ४ लाख ३९ हजार ६२० हेक्टरचे नुकसान झाले. सप्टेंबर आणि ऑक्टोबर या दोन महिन्यांतच विभागात प्राथमिक पंचनाम्यानुसार २० लाख हेक्टर क्षेत्रातील खरीप पिके बाधित झाली आहेत,अशी माहिती प्रशासनातील सूत्रांनी दिली. सध्या तरी एकूण ३१ लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचे दिसत आहे.

मराठवाड्यात सलग चौथ्या वर्षीही पावसाने खरीप हंगाम हिरावून घेतला. अतिवृष्टी आणि सततचा पाऊस यांमुळे हातातोंडाशी आलेले खरीप हंगामातील पिकाचे पूर्णपणे नुकसान झाले आहे. त्यामुळे ग्रामीण भागात शेतकऱ्यांच्या दिवाळीवर दु:खाचे सावट आहे. जून ते ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे औरंगाबाद, बीड वगळता इतर सहा जिल्ह्यांत पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या पीक नुकसानीपोटी सरकारने १,००८ कोटी रुपयांचे अनुदान सप्टेंबरमध्येच वितरित केले होते. हे अनुदान वाटप होत नाही,तोच विभागात पुन्हा पावसाचा जोर वाढला. दरम्यान,सततच्या पावसामुळे झालेल्या नुकसान भरपाईसाठी शासनाने ५९९ कोटींची मदत जाहीर केली. गोगलगायीमुळे पिकांच्या झालेल्या नुकसानीपोटी ९८ कोटींची मदत देण्यात आली. शासनाने मराठवाड्यासाठी सुमारे १७०५ कोटी रुपये देऊ केले आहेत.

नुकसान क्षेत्र वाढण्याची शक्यताऔरंगाबाद जिल्ह्यात सप्टेबर,ऑक्टोबर या दोन महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे सर्वाधिक ४ लाख ३० हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. उर्वरित सात जिल्ह्यात १५ लाख ७० हजार हेक्टर क्षेत्रातील पिके बाधित झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. सध्या पंचनामे सुरूच आहे. बहुतांश भागातील शेतात अद्याप पाणी असल्याने पंचनामे पूर्ण होण्यास आठवडा लागेल.

पाऊस थांबला थंडीची चाहूलविभागात २१ ऑक्टोबर पाऊस थांबला आहे. एकूण ६७९ मिली मीटरच्या वार्षिक सरासरीच्या तुलनेत ९११ मि.मी पाऊस झाला आहे. हे प्रमाण सरासरीच्या १२५ टक्के असून,सीतरंग या चक्रिवादळामुळे पुन्हा पाऊस येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. दरम्यान,हवामानात बदल झाला असून,थंडी जाणवू लागली आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादMarathwadaमराठवाडाRainपाऊस