शहरं
Join us  
Trending Stories
1
दबावापुढे झुकणार नाही, विद्यार्थ्यांचेच हित बघणार; आम्ही इगो न ठेवता जीआर रद्द केले; फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं
2
आजचे राशीभविष्य : सरकारी कामात होईल फायदा, प्रमोशनचा योग; जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
3
वेटिंग रेल्वे तिकीट कन्फर्म झाले का? आरक्षणाचा तक्ता आता चार नव्हे आठ तास आधी होणार तयार
4
आता पोटाच्या प्रश्नांकडे वळा!
5
एसटीच्या तिकिटाचे आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना आजपासून मिळेल १५ टक्के सूट
6
मुंबई विमानतळाजवळील निर्धारित उंचीपेक्षा अधिक उंचीच्या इमारतींवर काय कारवाई केली?
7
रवींद्र चव्हाण भाजप प्रदेशाध्यक्षपदी, आज अधिवेशनात सूत्रे स्वीकारणार
8
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ५७,५०९ कोटींच्या पुरवणी मागण्या
9
उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या कार्यालयाला जागा मिळेना, विधानभवनात दालन आहे, पण कार्यालय मात्र नाही
10
एकनाथ शिंदे यांच्यावर पुन्हा विश्वास; पक्षनेतेपदी फेरनिवड, आगामी निवडणुकीचे सर्वाधिकार शिंदेंकडेच
11
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले हीच सर्वांत मोठी उपलब्धी, महायुतीची सत्ता आली: चंद्रशेखर बावनकुळे
12
जून महिन्यात मुंबईने दिला १ हजार कोटींचा महसूल; मुंबईत एक महिन्यात झाली ११,५२१ मालमत्तांची नोंदणी
13
शेफाली जरीवाला मृत्यू प्रकरणी पोलिसांकडून १४ जणांचे जबाब
14
कल्याण आरटीओचा अजब कारभार, स्टॅंडऐवजी दरपत्रक साेशल मीडियावर
15
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानचा प्रत्येक वार ज्यानं हाणून पाडला, आता ते शस्त्र खरेदीसाठी हा मोठा देशही आतूरलेला, करणार 'बिग डील'!
16
राजा रघुवंशीच्या हत्येनंतर, पर्यटकांसाठी नवा नियम; मेघालयात जाणाऱ्यांसाठी आता 'ही' एक गोष्ट असणार अनिवार्य!
17
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
18
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
19
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
20
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार

परतीच्या पावसाचा फटका; मराठवाड्यात ३ हजार कोटींचे अनुदान लागणार ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2019 14:24 IST

पावसामुळे ९० टक्के खरीप हंगामाची माती 

औरंगाबाद : मराठवाड्यात परतीच्या व अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या हाताशी आलेल्या खरीप हंगामाची माती झाली. नुकसानीचे पंचनामे सोमवारी पूर्ण करण्यात आले. विभागातील ४८ लाख हेक्टरपैकी तब्बल ३७ लाख हेक्टरवरील पिके अवकाळी पावसामुळे गेली. केंद्राच्या नैसर्गिक आपत्ती निकषानुसार विभागाला अनुदानापोटी अंदाजे ३ हजार कोटींची गरज असल्याचा अंदाज सूत्रांनी व्यक्त केला.  

३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झालेल्या ९९.१६ टक्के  हेक्टवरील पंचनामे पूर्ण झाले. शनिवारपर्यंत नुकसानीचा अहवाल शासनाकडे जाईल. दररोज ६ लाख हेक्टवरील नुकसानीचे पंचनामे करण्यात आले. दुष्काळी अनुदानाच्या १३ मे २०१५ च्या निकषानुसार कोरडवाहू पिकांसाठी प्रतिहेक्टर ६ हजार ८००, फळबागांसाठी प्रतिहेक्टर १८ हजार तर बागायती पिकांसाठी प्रतिहेक्टर १३ हजार ५०० रुपये अनुदान देण्यात येते. त्यानुसार अहवाल तयार करण्याचे काम सुरू केले आहे.

आॅक्टोबर महिन्यातच तब्बल ३३७.८५ टक्के  अधिक पाऊस झाला असल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले. परतीच्या तसेच अवकाळी पावसाचा मराठवाड्यातील तब्बल ३४ लाख ३९ हजार शेतकऱ्यांना फटका बसला. सर्वाधिक १४ लाख २९ हजार हेक्टर सोयाबीन पिकाचे नुकसान झाले. कापूस पिकाचे ११ लाख ४२ हजार हेक्टर, मका पिकाचे २ लाख ३२ हजार हेक्टर, बाजरी ९२ हजार ५२३ हेक्टर, ज्वारी ६० हजार तर इतर पिकांचे २५ हजार हेक्टरवरील पीक पावसामुळे वाया गेले. 

टॅग्स :RainपाऊसMarathwadaमराठवाडाDivisional Commissioner Office Aurangabadऔरंगाबाद विभागीय आयुक्तालयfundsनिधी