शहरं
Join us  
Trending Stories
1
एखाद्याला खूश करण्यासाठी मुलांचे भविष्य खराब करू नका, हिंदी सक्तीवरून सुप्रिया सुळे भडकल्या!
2
शेफाली जरीवालाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे संशय वाढला
3
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, आज 'या' राशीतील लोकांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक
4
झटपट पैसे कमावण्यासाठी पती-पत्नीने सुरू केला असा धंदा, अश्लील चॅट, व्हिडीओ आणि...
5
आता मोबाइल ॲपद्वारे कुठूनही करता येणार मतदान; कोणत्या मतदारांना मिळणार अधिकार?
6
Shefali Jariwala: शेफाली जरीवालाच्या शेवटच्या एक्स पोस्टमध्ये 'या' व्यक्तीच्या नावाचा उल्लेख!
7
भारतासोबत ‘खूप मोठा’ व्यापार करार; डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली माहिती, भारताला कोणती चिंता?
8
Maharashtra Politics: हिंदीवरून महायुतीत गोंधळ, महाविकास आघाडीमध्ये ऐक्य
9
तरुण जोडप्यांना मुलांची आस, पण तरीही का घसरतोय देशाचा प्रजनन दर?
10
नग्न फोटो काढले; भयग्रस्त विद्यार्थिनीने जेवण सोडले; बीडमध्ये २ शिक्षकांकडून १० महिन्यांपासून लैंगिक छळ
11
आपले पूर्वज तरी कोण? कोणाशी जुळतो डीएनए? एम्स व कॅलिफोर्नियाच्या शास्त्रज्ञांचा महत्त्वपूर्ण शोध
12
भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण, १ जुलैला घोषणा; किरण रिजिजू निरीक्षक
13
विशेष लेख: इंदिरा गांधी यांच्या जागी दुसरे कुणी असते तरीही...
14
जुलैमध्ये १३ दिवस बँका राहणार बंद; राज्यनिहाय वेगळ्या सुट्ट्या, महाराष्ट्रात किती दिवस राहणार बंद?
15
मनोमीलनाआधी ‘मोर्चा’मीलन; हिंदी विरोधी मोर्चात राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र
16
अग्रलेख: अंतराळात भारतीय शुभकिरण! भारताचे स्वप्न पूर्ण होण्याचा क्षण
17
लेख: तुमच्या घरातला एसी आता ‘फार’ थंड नाही होणार!
18
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
19
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
20
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले

नोंदींची दुरुस्ती रखडल्याने चालू शैक्षणिक वर्षात शिक्षकांच्या बदल्यांची शक्यता धूसर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2017 12:58 IST

जोपर्यंत संवर्ग-१ आणि संवर्ग-२ मध्ये मोडणा-या शिक्षकांच्या आॅनलाइन नोंदीची खातरजमा होत नाही, तोपर्यंत बदलीचे आदेश निर्गमित होणार नाहीत, असा पवित्रा राज्यस्तरीय बदली विभागाने घेतला आहे. त्यामुळे चालू शैक्षणिक वर्षात बदल्या होण्याची शक्यता फार कमी आहे.

ठळक मुद्देगेल्या दहा दिवसांपासून शिक्षकांच्या बदलीबाबत राज्यस्तरीय आॅनलाइन बदल्यांच्या विभागाकडून कोणतीही सूचना प्राप्त नाही दरवर्षी साधारणपणे मे अखेरपर्यंत शिक्षकांच्या बदल्या होत असतात.यंदा ग्रामविकास विभागाने जिल्हास्तराऐवजी राज्यस्तरावरूनच शिक्षकांच्या बदल्या करण्याचा निर्णय घेतला.

औरंगाबाद : गेल्या दहा दिवसांपासून शिक्षकांच्याबदलीबाबत राज्यस्तरीय आॅनलाइन बदल्यांच्या विभागाकडून कोणतीही सूचना प्राप्त नसल्यामुळे शिक्षणाधिका-यांसह जिल्हा परिषदेच्याशिक्षकांमध्येही मोठी अस्वस्थता पसरली आहे. तथापि, जोपर्यंत संवर्ग-१ आणि संवर्ग-२ मध्ये मोडणा-या शिक्षकांच्या आॅनलाइन नोंदीची खातरजमा होत नाही, तोपर्यंत बदलीचे आदेश निर्गमित होणार नाहीत, असा पवित्रा राज्यस्तरीय बदली विभागाने घेतला आहे. त्यामुळे चालू शैक्षणिक वर्षात बदल्या होण्याची शक्यता फार कमी आहे. 

दरवर्षी साधारणपणे मे अखेरपर्यंत शिक्षकांच्या बदल्या होत असतात. यंदा ग्रामविकास विभागाने जिल्हास्तराऐवजी राज्यस्तरावरूनच शिक्षकांच्या बदल्या करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी स्वतंत्र राज्यस्तरीय विभाग स्थापन करण्यात आला. या विभागाने यंदा पहिल्यांदाच शिक्षकांच्या आॅनलाइन बदल्या करण्यासाठी २७ फेब्रुवारी २०१७ च्या शासन निर्णयानुसार संवर्गनिहाय नोंदी मागविल्या. जूनपासून संपूर्ण आॅक्टोबरपर्यंत शिक्षकांकडून आॅनलाइन नोंदणी करून घेतली. यासंदर्भात राज्यस्तरीय बदली विभागाकडून वारंवार तब्बल ११२३ सूचना प्रसिद्ध करण्यात आल्या. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात बदलीपात्र यादीतील शिक्षकांपैकी मयत झालेले किंवा बदलीपात्र नसतानादेखील चुकीने काही शिक्षकांचा बदलीपात्र यादीत समावेश करण्यात आला आहे काय, याची जिल्हानिहाय खातरजमा करण्यात आली. त्यानंतर आजपर्यंत राज्यस्तरीय बदली विभागाकडून कोणत्याही हालचाली झालेल्या नाहीत. 

तथापि, राज्यस्तरीय बदली विभागाच्या सूत्रांनी सांगितले की, संवर्ग-१मध्ये काही शिक्षकांनी गंभीर आजारी नसतानादेखील वैद्यकीय अधिका-यांकडून आजाराचे खोटे प्रमाणपत्र मिळवून ते आॅनलाइन नोंदणीच्या वेळी जोडले आहे. याशिवाय अनेकांनी पती-पत्नी एकत्रीकरणाचा फायदा उचलण्यासाठी ३० किलोमीटरच्या आतमध्ये असलेल्या शाळांवर कार्यरत शिक्षकांनीही आॅनलाइन नोंदणी केलेली आहे. अशा शिक्षकांची तालुकानिहाय सखोल तपासणी केल्यानंतर खोट्या नोंदी करणाºया शिक्षकांना यादीतून वगळले जाईल. त्यानंतरच बदलींचे आदेश निर्गमित केले जाणार आहेत. परंतु राज्यस्तरीय बदली विभागाकडून अजूनपर्यंत तालुकानिहाय याद्यांच्या तपासणीचे आदेश शिक्षणाधिकारी कार्यालयाकडे प्राप्त झालेले नाहीत.

शिक्षकांमध्ये दोन गट सक्रियशिक्षकांमध्ये आता बदलीच्या बाजूने व विरोधी, असे दोन दबाव गट सक्रिय झाले आहेत. या दोन्ही गटांनी संपूर्ण राज्यभरात जिल्ह्याच्या ठिकाणी शक्तिप्रदर्शनही केले. सर्वोच्च न्यायालयानेदेखील २७ फेब्रुवारीच्या शासन निर्णयानुसार शिक्षकांच्या बदल्यांसाठी हिरवा कंदिल दाखविला. पहिल्यापासून आक्रमक असलेला राज्यस्तरीय बदली विभाग मात्र, अंतिम टप्प्यात शांत दिसत आहे. चालू शैक्षणिक वर्षात बदल्या होतील, की मे २०१८ अखेर बदल्यांबाबत निर्णय घेतला जाईल, यासंबंधीच्या सूचनांकडे राज्यभरातील शिक्षकांचे लक्ष लागले आहे.