शहरं
Join us  
Trending Stories
1
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
2
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
3
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
4
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
5
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
6
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
7
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
8
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
9
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
10
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
11
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
12
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
13
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
14
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
15
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
16
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
17
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
18
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
19
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
20
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा

साई संस्थानच्या निधीवर हायकोर्टाने घातले निर्बंध

By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2019 4:41 AM

राज्यात कोणतीही योजना अथवा प्रकल्प राबविण्याची जबाबदारी राज्य शासनाची असताना शिर्डी संस्थानने निळवंडे प्रकल्पासाठी ५०० कोटींचा निधी कोणत्या कामासाठी आणि कुठल्या अटींवर जाहीर केला.

औरंगाबाद : राज्यात कोणतीही योजना अथवा प्रकल्प राबविण्याची जबाबदारी राज्य शासनाची असताना शिर्डी संस्थानने निळवंडे प्रकल्पासाठी ५०० कोटींचा निधी कोणत्या कामासाठी आणि कुठल्या अटींवर जाहीर केला. शासन तो निधी संस्थानला परत करणार आहे का, अशा प्रकारे अन्य कामांसाठी संस्थानचा निधी वापरण्याची तरतूद आहे का, अशी प्रश्नांची सरबत्ती शुक्रवारी औरंगाबाद खंडपीठाचे न्या. एस. एस. शिंदे आणि न्या. आर. जी. अवचट यांनी केली. पुढील सुनावणी होईपर्यंत संस्थानच्या या निधीचा निळवंडे प्रकल्पासह इतर कुठल्याही कामासाठी वापरू नये, असे तोंडी निर्देश खंडपीठाने दिले.निळवंडे धरणाशी संबंधित सर्व याचिकांवर शुक्रवारी एकत्रित सुनावणी झाली. याबाबत सविस्तर माहिती सादर करण्याचे निवेदन मुख्य सरकारी वकील अमरजितसिंह गिरासे यांनी सुनावणीच्या वेळी केले असता केवळ शिर्डी संस्थानच्या संदर्भातील सर्व याचिकांची पुढील एकत्रित सुनावणी २९ जानेवारी रोजी ठेवण्यात आली आहे. तोपर्यंत संस्थानच्या निधीचा वापर कुठल्याही कामासाठी करू नये, असे तोंडी निर्देश खंडपीठाने दिले आहेत.‘संस्थानकडे जमा होणारा पैसा हा भाविकांचा आहे’ असे मत खंडपीठाने व्यक्त केले.

टॅग्स :shirdiशिर्डी