शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

साई संस्थानच्या निधीवर हायकोर्टाने घातले निर्बंध

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2019 04:41 IST

राज्यात कोणतीही योजना अथवा प्रकल्प राबविण्याची जबाबदारी राज्य शासनाची असताना शिर्डी संस्थानने निळवंडे प्रकल्पासाठी ५०० कोटींचा निधी कोणत्या कामासाठी आणि कुठल्या अटींवर जाहीर केला.

औरंगाबाद : राज्यात कोणतीही योजना अथवा प्रकल्प राबविण्याची जबाबदारी राज्य शासनाची असताना शिर्डी संस्थानने निळवंडे प्रकल्पासाठी ५०० कोटींचा निधी कोणत्या कामासाठी आणि कुठल्या अटींवर जाहीर केला. शासन तो निधी संस्थानला परत करणार आहे का, अशा प्रकारे अन्य कामांसाठी संस्थानचा निधी वापरण्याची तरतूद आहे का, अशी प्रश्नांची सरबत्ती शुक्रवारी औरंगाबाद खंडपीठाचे न्या. एस. एस. शिंदे आणि न्या. आर. जी. अवचट यांनी केली. पुढील सुनावणी होईपर्यंत संस्थानच्या या निधीचा निळवंडे प्रकल्पासह इतर कुठल्याही कामासाठी वापरू नये, असे तोंडी निर्देश खंडपीठाने दिले.निळवंडे धरणाशी संबंधित सर्व याचिकांवर शुक्रवारी एकत्रित सुनावणी झाली. याबाबत सविस्तर माहिती सादर करण्याचे निवेदन मुख्य सरकारी वकील अमरजितसिंह गिरासे यांनी सुनावणीच्या वेळी केले असता केवळ शिर्डी संस्थानच्या संदर्भातील सर्व याचिकांची पुढील एकत्रित सुनावणी २९ जानेवारी रोजी ठेवण्यात आली आहे. तोपर्यंत संस्थानच्या निधीचा वापर कुठल्याही कामासाठी करू नये, असे तोंडी निर्देश खंडपीठाने दिले आहेत.‘संस्थानकडे जमा होणारा पैसा हा भाविकांचा आहे’ असे मत खंडपीठाने व्यक्त केले.

टॅग्स :shirdiशिर्डी