शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

गुटखा विक्रीवरील कारवाईसाठी मराठवाड्यात २३ जणांवरच जबाबदारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2019 16:36 IST

परराज्यातील गुटखा रोखणे कठीण 

ठळक मुद्देवर्षभरात २१ कोटी ४८ लाखांचा गुटखा, पानसुपारी जप्तबीड जिल्ह्यात सर्वाधिक गुटखा जप्त 

औरंगाबाद : मागील ७ वर्षांपासून राज्यात गुटखा उत्पादन व विक्रीवर बंदी आहे. मात्र, अजूनही सर्रासपणे गुटखा विकला जात आहे. परराज्यातून मराठवाड्यात येणारा गुटखा, सुगंधित पानमसाला जप्ती व कारवाई करण्याची जबाबदारी अवघ्या २३ अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांवर आहे. तोकडे मनुष्यबळ हेच अन्न व औषध प्रशासनाची कमजोरी बनले आहे. तरीपण मागील वर्षभरात २१ कोटी ४८ लाख रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. यात सर्वाधिक गुटखा बीड जिल्ह्यात जप्त करण्यात आला आहे. 

गुटखा आरोग्यास अपायकारक असल्याने २०१२ मध्ये तत्कालीन राज्य शासनाने महाराष्ट्रात गुटखा,  सुगंधित सुपारी, सुगंधित तंबाखू उत्पादन व विक्रीवर बंदी आणली. तेव्हा राज्यातील गुटखा उद्योग आसपासच्या परराज्यांत स्थलांतरित झाला. यास ७ वर्षे झाली; पण अजूनही राज्यात गुटखा सर्रासपणे विकला जात आहे. मराठवाड्याचा विचार केल्यास कर्नाटक, आंध्र प्रदेश, गुजरात राज्यातून मोठ्या प्रमाणात गुटखा, सुगंधित सुपारी, सुगंधित तंबाखू विक्रीला येत आहे. परराज्यांतून होणारी आवक रोखण्यास प्रशासनाला अपयश आले आहे. जप्ती व कारवाई करण्याची जबाबदारी अन्न व औषध प्रशासनावर टाकण्यात आली आहे. मराठवाड्याचा विचार केल्यास औरंगाबाद ५ अन्न सुरक्षा अधिकारी, जालना ४, बीड २, परभणी १, हिंगोली १, उस्मानाबाद ३, नांदेड ४ व लातूर येथे २, असे एकूण २३ अन्न सुरक्षा अधिकारी आहेत. अपुरा अधिकारी वर्ग हीच या प्रशासनाची कमजोरी ठरत आहे.

१९९४-९५ या आर्थिक वर्षात औरंगाबाद जिल्ह्यासाठी १२ अन्न निरीक्षक कार्यरत होते. मात्र, त्यानंतर त्यांची संख्या घटत गेली. आजघडीला प्रत्येक तालुक्यासाठी १ म्हणजे मराठवाड्यात ७६ अन्न व सुरक्षा अधिकाऱ्यांची आवश्यकता आहे. तेव्हाच कायद्याची अंमलबजावणी करता येणे शक्य आहे. अपुरा अधिकारी वर्ग असतानाही मागील आर्थिक वर्षात मराठवाड्यात २१ कोटी ४८ लाख ५५ हजार ६९० रुपयांचा गुटखा, सुगंधित तंबाखू व सुगंधित सुपारी जप्त करण्यात प्रशासनाला यश आले आहे. १०३ जणांवर एफआयआर दाखल करण्यात आला आहे. मात्र, २०१२ पासून उच्च न्यायालयात अनेक खटले प्रलंबित आहेत. यामुळे मराठवाड्यात आजपर्यंत एकाही प्रकरणात आरोपींना शिक्षा झाली नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. 

बीड जिल्ह्यात सर्वाधिक गुटखा जप्त अन्न व औषध प्रशासनाने मागील आर्थिक वर्षात मराठवाड्यात २६३ ठिकाणी कारवाई करून २१ कोटी ४८ लाख ५५ हजार ६९० रुपयांचा गुटखा, सुगंधित तंबाखू, सुपारी जप्त केली. 

जिल्हा               कारवाई                 जप्तीची रक्कम औरंगाबाद             ३९             ७७ लाख २७ हजार ८२० रुपयेजालना                  ३०             ४४ लाख ९५ हजार २८७ रुपयेबीड                        ३१              १२ कोटी २७ लाख ७३ हजार २१५ रुपयेपरभणी- हिंगोली    ६५             ३ कोटी १९ लाख ५२ हजार ५१७ रुपयेनांदेड                      ७८             २ कोटी ३६ लाख २२ हजार ३९२ रुपयेलातूर                      २०              ५४ लाख ७१ हजार ८४६ रुपये

टॅग्स :FDAएफडीएraidधाडMarathwadaमराठवाडा