शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

सातारा ठाण्याच्या विचित्र हद्दीचा नागरिकांना त्रास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2019 17:35 IST

बायपास, सातारा परिसर, पैठण रोडच्या दोन्ही बाजूंनी मोठ्या संख्येने नवनवीन नागरी वसाहती तयार होत आहेत.

ठळक मुद्देभौगोलिक हद्द अडचणीची बायपास परिसरातील नवीन वसाहतींसाठी महत्त्वाचे ठाणे सातारा ठाण्यासाठी सिडकोने दिली गोलवाडीत जागा

औरंगाबाद : बीड बायपास, पैठण रोड, नक्षत्रवाडी आणि विटखेड्यासह लहान-मोठ्या १३ गावांतील नागरिकांच्या जीविताचे आणि मालमत्तेचे रक्षण करण्याची जबाबदारी असलेल्या सातारा ठाण्याची भौगोलिक हद्द विचित्र आहे. परिणामी बजाज कंपनीच्या गेटजवळ अपघात झाल्यास मदतीसाठी नागरिकांना जवळचे ठाणे सोडून सात ते आठ किलोमीटर अंतरावरील सातारा ठाण्यात यावे लागते.  

बायपास, सातारा परिसर, पैठण रोडच्या दोन्ही बाजूंनी मोठ्या संख्येने नवनवीन नागरी वसाहती तयार होत आहेत. कोणत्याही नागरी सुविधा उपलब्ध नसताना नागरिक तेथे राहण्यासाठी आले आहेत. वाढत्या नागरी वसाहतींच्या सुरक्षेचा विचार करून २०१२ साली सातारा पोलीस ठाण्याची स्थापना झाली. तेव्हापासून सातारा ठाणे बायपासजवळील एका भूखंडावर पत्र्याच्या शेडमध्ये कार्यरत आहे. या ठाण्यांतर्गत विटखेडा, कांचननगर, नक्षत्रवाडी, कदम वस्ती, सातारा गाव, सातारा तांडा क्रमांक १ आणि तांडा क्रमांक २, गोलवाडी, पाटोदा, वळदगाव, गंगापूर नेहरी, देवळाईच्या काही भागांसह १३ गावे आहेत. शिवाय ७० ते ८० नागरी वसाहती आहेत. रेल्वेस्टेशन परिसर, सादातनगर, हमालवाडा, बायपास, सातारा परिसर, पैठण रस्त्यावरील विविध वसाहतींचा यात समावेश आहे. बीड बायपास, पैठण रस्ता हे प्रमुख मार्ग या ठाण्यात येतात. सातारा ठाण्यात दरवर्षी सरासरी पाचशे ते साडेपाचशे गुन्ह्यांची नोंद होते. यात सर्वाधिक गुन्हे हे रस्ता अपघात, मारहाणीच्या घटना, घरफोड्या आणि जमीन,भूखंड खरेदी व्यवहारात फसवणुकीचे असतात.

या ठाण्याची हद्द निश्चित करताना सामान्य नागरिकांच्या सोयीचा विचार क रण्यात आला नाही. त्यावेळी झालेल्या चुकांचा फटका आता सामान्यांना बसतो आहे. पावसाळ्यात या ठाण्याच्या छतावरील पत्रे गळतात, पावसाचे पाणी ठाण्यात शिरते. ही बाब लक्षात घेऊन पोलीस अधिकाऱ्यांनी ठाण्यासाठी दुसरी इमारत भाड्याने घेण्याचे निश्चित झाले. इमारतही पसंत करण्यात आली. मात्र त्यावर प्रशासनाकडून निर्णय झालानाही.

सिडकोने दिली गोलवाडीत जागास्वत:च्या जागेत पोलीस ठाणे उभारावे अशा सूचना मिळाल्याने सिडकोेकडे पोलीस ठाण्यासाठी जागेची मागणी करण्यात आली. तेव्हा सिडकोने गोलवाडी येथे पोलीस ठाण्याकरिता जमीन उपलब्ध करून दिली. त्या जागेवर पोलिसांना इमारत बांधावी लागणार आहे. मात्र गोलवाडी येथे ठाणे स्थलांतरित करण्यास बायपास आणि सातारा परिसरातील नागरिकांनी विरोध दर्शविला आहे. महानुभाव आश्रम चौकी परिसरात ठाणे उभारल्यास ते सोयीचे ठरेल, अशी एक भूमिका समोर आली आहे. 

ठाण्याचे विभाजन आवश्यकसातारा ठाण्याची हद्दच खूप मोठी आहे. बायपास, पैठण रोड आणि लिंक रोडवर सतत अपघात घडत असतात. शिवाय वाळूज रस्त्यावरील बजाज कंपनीच्या गेटपर्यंत सातारा ठाण्याची हद्द येते. तेथे एखादी घटना घडल्यास तेथे पोहोचण्यासाठी पोलिसांचा बराच वेळ जातो. शिवाय गोलवाडी परिसर, पाटोदा गाव, पैठण रस्त्यावरील जकात नाक्यापर्यंत ठाण्याची हद्द येते. इकडे देवळाई चौकापासून अर्धा किलोमीटरपर्यंतचे अंतर सातारा ठाण्यात येते. परिसरातील वाढत्या नागरी वसाहतीमुळे गुन्ह्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. ही बाब लक्षात घेऊन ठाण्याच्या हद्दीची पुनर्रचना व्हावी अथवा ठाण्याचे विभाजन होऊन नवीन ठाणे उभारण्याची गरज आहे. - प्रेमसागर चंद्रमोरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सातारा ठाणे

सातारा ठाणे : सातारा ठाण्याचे प्रमुख - प्रेमसागर चंद्रमोरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक़.अन्य पदे- एक सहायक निरीक्षक, चार उपनिरीक्षक, ७० पोलीस कर्मचारी.दाखल होणाऱ्या गुन्ह्यांची सरासरी संख्या - ५०० ते ५५०एकूण नागरी वसाहती सुमारे - ७0खेडी- १३

टॅग्स :Satara areaसातारा परिसरPoliceपोलिसAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाcidco aurangabadसिडको औरंगाबाद