शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

पदोन्नतीमध्ये आरक्षण लागू करावेच लागेल; अन्यथा आंदोलन : महाराष्ट्र ऑफिसर्स फोरम 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2018 17:37 IST

शासनाची अशीच भूमिका राहिली, तर आम्हाला लोकशाही मार्गाने आंदोलनाची भूमिका घ्यावी लागेल, असे मत महाराष्ट्र आॅफिसर्स फोरमचे अध्यक्ष तथा निवृत्त सनदी अधिकारी ई. झेड. खोब्रागडे यांनी आज येथे व्यक्त केले. 

औरंगाबाद : पदोन्नतीमध्ये आरक्षण लागू करण्याचा अधिकार राज्य सरकारला असल्याचा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतरही या सरकारने केवळ खुल्या प्रवर्गातील आरक्षणाची प्रक्रिया पार पाडण्याचे परिपत्रक जारी केले. पदोन्नतीमध्ये आरक्षण लागू करण्यासंबंधी आम्ही शासनाला समजावून सांगण्याचा प्रयत्न करू. त्यानंतरही शासनाची अशीच भूमिका राहिली, तर आम्हाला लोकशाही मार्गाने आंदोलनाची भूमिका घ्यावी लागेल, असे मत महाराष्ट्र आॅफिसर्स फोरमचे अध्यक्ष तथा निवृत्त सनदी अधिकारी ई. झेड. खोब्रागडे यांनी आज येथे व्यक्त केले. 

महाराष्ट्र आॅफिसर्स फोरमच्या वतीने आज औरंगाबादेत चिंतन बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस विविध शासकीय, निमशासकीय कार्यालयांचे अधिकारी- कर्मचारी, विविध मागासवर्गीय कर्मचारी- अधिकारी संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आॅफिसर्स फोरमच्या वतीने अनुसूचित जाती, जमाती, ओबीसी, विशेष मागास प्रवर्गाच्या आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक उत्थानाच्या योजनांतील उणिवा, अधिकारी- कर्मचाऱ्यांबाबत घेतले जाणारे चुकीचे निर्णय आदी बाबत काय केले पाहिजे, याबाबत चिंतन बैठकांच्या माध्यमातून म्हणणे ऐकूण घेतले जाते. यासंबंधी शासनाला शिफारसी केल्या जातात.

आजच्या चिंतन बैठकीच्या मध्यंतरानंतर पत्रकारांशी बोलताना खोब्रागडे म्हणाले, मंत्रालयामध्ये आरक्षण विरोधी शक्ती प्रबळ झालेली दिसत असून ही मंडळी शासनाची दिशाभूल करत आहे. मागासवर्गीय अधिकारी- कर्मचाऱ्यांना त्यांचे लाभ मिळूच नयेत, या दृष्टीकोणातून ते काम करत आहेत. प्रामुख्याने पदोन्नतीतील आरक्षणासंबंधी सर्वोच्च न्यायालाने स्पष्ट निर्णय दिल्यानंतरही हे शासन केवळ खुल्या प्रवर्गाच्या पदोन्नतीचा पुरस्कार करत आहे. विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीबाबत या शासनाची उदासिन भूमिका दिसत आहे. महागाई निर्देशांकानुसार शिष्यवृत्तीमध्ये वाढ व्हायला हवी; पण आहे तीच शिष्यवृत्ती वेळेवर मिळत नाही. विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांच्या खात्यावर, तर महाविद्यलायांची शैक्षणिक शुल्क विद्यार्थ्यांऐवजी महाविद्यालयांना अदा केले पाहिजे; पण सध्या विद्यार्थ्यांच्याच खात्यावर शिष्यवृत्ती आणि शैक्षणिक शुल्काची रक्कम जमा केली जात आहे. हे चुकीचे असल्याचे आम्ही शासनाच्या निदर्शनास आणून दिले. यावेळी उपजिल्हाधिकारी डॉ. भारत कदम, डॉ. बबन जोगदंड, विलास सुटे, डॉ. विजयकुमार माहुरे आदींची उपस्थिती होती. 

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादreservationआरक्षणagitationआंदोलनState Governmentराज्य सरकार