शहरं
Join us  
Trending Stories
1
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
2
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
3
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
4
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
5
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
6
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
7
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
8
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
9
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
10
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
11
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
12
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
13
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
14
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
15
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
16
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
17
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
18
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
19
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
20
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...

पदोन्नतीमध्ये आरक्षण लागू करावेच लागेल; अन्यथा आंदोलन : महाराष्ट्र ऑफिसर्स फोरम 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2018 17:37 IST

शासनाची अशीच भूमिका राहिली, तर आम्हाला लोकशाही मार्गाने आंदोलनाची भूमिका घ्यावी लागेल, असे मत महाराष्ट्र आॅफिसर्स फोरमचे अध्यक्ष तथा निवृत्त सनदी अधिकारी ई. झेड. खोब्रागडे यांनी आज येथे व्यक्त केले. 

औरंगाबाद : पदोन्नतीमध्ये आरक्षण लागू करण्याचा अधिकार राज्य सरकारला असल्याचा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतरही या सरकारने केवळ खुल्या प्रवर्गातील आरक्षणाची प्रक्रिया पार पाडण्याचे परिपत्रक जारी केले. पदोन्नतीमध्ये आरक्षण लागू करण्यासंबंधी आम्ही शासनाला समजावून सांगण्याचा प्रयत्न करू. त्यानंतरही शासनाची अशीच भूमिका राहिली, तर आम्हाला लोकशाही मार्गाने आंदोलनाची भूमिका घ्यावी लागेल, असे मत महाराष्ट्र आॅफिसर्स फोरमचे अध्यक्ष तथा निवृत्त सनदी अधिकारी ई. झेड. खोब्रागडे यांनी आज येथे व्यक्त केले. 

महाराष्ट्र आॅफिसर्स फोरमच्या वतीने आज औरंगाबादेत चिंतन बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस विविध शासकीय, निमशासकीय कार्यालयांचे अधिकारी- कर्मचारी, विविध मागासवर्गीय कर्मचारी- अधिकारी संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आॅफिसर्स फोरमच्या वतीने अनुसूचित जाती, जमाती, ओबीसी, विशेष मागास प्रवर्गाच्या आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक उत्थानाच्या योजनांतील उणिवा, अधिकारी- कर्मचाऱ्यांबाबत घेतले जाणारे चुकीचे निर्णय आदी बाबत काय केले पाहिजे, याबाबत चिंतन बैठकांच्या माध्यमातून म्हणणे ऐकूण घेतले जाते. यासंबंधी शासनाला शिफारसी केल्या जातात.

आजच्या चिंतन बैठकीच्या मध्यंतरानंतर पत्रकारांशी बोलताना खोब्रागडे म्हणाले, मंत्रालयामध्ये आरक्षण विरोधी शक्ती प्रबळ झालेली दिसत असून ही मंडळी शासनाची दिशाभूल करत आहे. मागासवर्गीय अधिकारी- कर्मचाऱ्यांना त्यांचे लाभ मिळूच नयेत, या दृष्टीकोणातून ते काम करत आहेत. प्रामुख्याने पदोन्नतीतील आरक्षणासंबंधी सर्वोच्च न्यायालाने स्पष्ट निर्णय दिल्यानंतरही हे शासन केवळ खुल्या प्रवर्गाच्या पदोन्नतीचा पुरस्कार करत आहे. विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीबाबत या शासनाची उदासिन भूमिका दिसत आहे. महागाई निर्देशांकानुसार शिष्यवृत्तीमध्ये वाढ व्हायला हवी; पण आहे तीच शिष्यवृत्ती वेळेवर मिळत नाही. विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांच्या खात्यावर, तर महाविद्यलायांची शैक्षणिक शुल्क विद्यार्थ्यांऐवजी महाविद्यालयांना अदा केले पाहिजे; पण सध्या विद्यार्थ्यांच्याच खात्यावर शिष्यवृत्ती आणि शैक्षणिक शुल्काची रक्कम जमा केली जात आहे. हे चुकीचे असल्याचे आम्ही शासनाच्या निदर्शनास आणून दिले. यावेळी उपजिल्हाधिकारी डॉ. भारत कदम, डॉ. बबन जोगदंड, विलास सुटे, डॉ. विजयकुमार माहुरे आदींची उपस्थिती होती. 

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादreservationआरक्षणagitationआंदोलनState Governmentराज्य सरकार