शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत द्वेष्टा...! डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर पहिला वार; ६ भारतीय ऑईल कंपन्यांवर निर्बंध लादले...
2
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
3
सलवार सूट घातला, त्यावर बुरखा चढवला अन् महिला डॉक्टरच्या घरात घुसून ७ वेळा चाकूने वार केला; नेमकं प्रकरण काय?
4
अरे ही कसली आई! १५ महिन्यांच्या लेकाला बस स्टँडवर सोडलं अन् इन्स्टा बॉयफ्रेंडसोबत पळाली
5
जुनी मैत्रिण ४ वर्षांनी पुन्हा भेटली, एकांतात भेटायला बोलावलं; बंद खोलीत तिला कायमचं संपवलं, मग... 
6
Video - क्रूरतेचा कळस! 'ती' जीव वाचवण्यासाठी हाता-पाया पडली पण 'तो' अमानुषपणे मारत राहिला
7
Video - पावसाचे थैमान! पुरामध्ये ३० तास अडकली शाळेची बस, १०० जणांना वाचवण्यात यश
8
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
9
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
10
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
11
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
12
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
13
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
14
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
15
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
16
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
17
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
18
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
19
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
20
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप

बाबासाहेबांच्या संकल्पनेतील रिपब्लिकन पक्ष झंझावात होता

By admin | Updated: August 25, 2014 00:24 IST

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संकल्पनेतील रिपब्लिकन पक्ष एक झंझावात, तुफान होते. त्याने प्रारंभीच्या काळात समता स्थापण्याचा प्रयत्न केला.

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संकल्पनेतील रिपब्लिकन पक्ष एक झंझावात, तुफान होते. त्याने प्रारंभीच्या काळात समता स्थापण्याचा प्रयत्न केला. वंचितांना न्याय दिला; परंतु आता त्याचे झालेली शकलं पाहवत नाहीत, असे उद्गार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा सहवास लाभलेले, रिपाइंचे पूर्वाश्रमीचे नेते, साहित्यिक एल.आर. बाली यांनी रविवारी येथे काढले. सम्यक बौद्ध उपासक- उपासिका महासंघातर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्रात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. डॉ. अरविंद गायकवाड अध्यक्षस्थानी होते. शिवदास कांबळे, प्रा. डॉ. यशवंत खिल्लारे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. एल.आर. बाली म्हणाले, देशात एकाच वेळी सव्वादोन लाख कार्यकर्त्यांनी स्वत:ला अटक करून घेत कारागृहात जाणे ही जबरदस्त ताकद रिपाइंची होती. भूमिहीनांच्या आंदोलनाने लाखो एकर जमीन दलितांना मिळवून दिली; परंतु यशवंतराव चव्हाण यांच्या बोलण्यात येऊन दादासाहेब गायकवाड यांनी काँग्रेसशी युती केली. दिल्लीत तेव्हा पक्षाची बैठक झाली. ही युती म्हणजे रिपब्लिकनची कबर आहे, असे मत मी नोंदविले होते.सध्याच्या स्थितीत रिपब्लिकन पक्ष मजबूतपणे उभा राहू शकतो; परंतु सध्या विकाऊ कार्यकर्त्यांची संख्या वाढली आहे. तुम्ही स्वत:ला बाजारात उभे करणे बंद करा, पक्ष आजही मजबुतीने उभा राहील. यासाठी आजही आपण काम करण्यास तयार आहोत, अशी ग्वाही त्यांनी दिली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार, त्यांचे मूळ लेखन व काही अनुभवही यावेळी बाली यांनी सांगितले. त्यांचे अनुभव ऐकण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. भारत शिंदे यांनी सूत्रसंचालन केले. भीमराव मुगदल यांनी आभार मानले.