शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
3
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
4
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
5
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
6
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
7
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
8
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
9
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
10
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
11
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
12
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
13
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
14
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
15
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
16
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
17
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
18
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
19
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
20
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा

पोकरा घोटाळा चाैकशी अहवालात लाभार्थी शेतकऱ्यांवर ठपका; अधिकारी-कर्मचाऱ्यांना ‘क्लीन चीट’

By बापू सोळुंके | Updated: November 22, 2023 12:32 IST

या अहवालात समितीने कृषी विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना ‘क्लीन चीट’ देत केवळ लाभार्थी शेतकऱ्यांना दोषी ठरवले आहे.

छत्रपती संभाजीनगर : पैठण तालुक्यातील नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पामध्ये (पोकरा) मधुमक्षिका पालन, फळबाग लागवड, तुती लागवड, ठिबक सिंचन व तुषार सिंचन आणि शेततळे, शेततळे अस्तरीकरणाचा लाभ देताना मोठा गैरव्यवहार झाल्याची वृत्त मालिका लोकमतने जुलै महिन्यात प्रकाशित केली होती. या वृत्तमालिकेनंतर कृषी विभागाने नियुक्त केलेल्या चौकशी समितीने चार महिन्यानंतर विभागीय कृषी सहसंचालकांना अहवाल सादर केला. या अहवालात समितीने कृषी विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना ‘क्लीन चीट’ देत केवळ लाभार्थी शेतकऱ्यांना दोषी ठरवले आहे. या शेतकऱ्यांकडून त्यांना देण्यात आलेले अनुदान वसुलीची शिफारस केल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिली.

विविध योजनांचा शेकडो शेतकऱ्यांना २०२२ मध्ये लाभ देण्यात आला होता. शेतकऱ्यांना लाभ कागदोपत्री दाखवून लाखो रुपयांचा अपहार करण्यात आला होता. याविषयी लोकमतने जुलै महिन्यात ‘पोकराला पोखरलं’ या टॅगलाईनखाली वृत्तमालिका प्रकाशित केली. यानंतर विभागीय कृषी सहसंचालकांनी वैजापूरचे उपविभागीय कृषी अधिकारी अशोक आढाव यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमली. समितीला पंधरा दिवसांत अहवाल देण्याची मुदत देण्यात आली होती. समितीने चार महिने चौकशी करून अहवाल नुकताच कृषी सहसंचालकांना सादर केला. सूत्राने दिलेल्या माहितीनुसार अहवालात रांजणगाव दांडगा, खादगाव आणि वडजी या तीन गावांतील २५ लाभार्थ्यांकडून ४० लाख ३३ हजार ८०० रुपये वसूल करण्याची शिफारस करण्यात आली आहे.

मधुमक्षिका पालन योजनेच्या चौकशीत समितीला काय आढळले ?- खादगाव येथील एक शेतकरी वगळता उर्वरित सर्वच लाभार्थी शेतकऱ्यांच्या मधुमक्षिका पेट्या बंद स्थितीत आढळून आल्या. मधकाढणी यंत्र केवळ ७ शेतकऱ्यांकडे दिसले.-शेतकऱ्यांना देण्यात आलेल्या अनुदानानुसार प्रत्येक शेतकऱ्यांकडे ५० मधमाशी पेटी आणि ५० मधमाशी वसाहतींचे कप्पे याप्रमाणे पूर्ण साहित्य असायला हवे होते. मात्र शेतकऱ्यांकडे ५० पेक्षा कमी मधमाशी पेट्या आणि १० ते १५ मधमाश्यांच्या वसाहतींचे कप्पे दिसले.-मधुमक्षिका पालन संचासोबत असलेला चाकू, हाईव टूल, स्मोकर, ट्रे, हातमोजे, मधपेटी, स्टॅण्ड इ. साहित्य शेतकऱ्यांनी राजस्थान येथे भाड्याने दिल्याचे सांगितले. वडजी येथील शेतकऱ्यांनी हे साहित्य वापराअभावी खराब झाल्याचे सांगितले.-सर्वच लाभार्थ्यांनी मधमाश्या उष्णतेमुळे आणि खाद्य उपलब्ध नसल्याने मरण पावल्याचे सांगितले.-मधुमक्षिका पालन संगोपनासाठी सर्व लाभार्थ्यांनी प्रशिक्षण घेतल्याचे प्रमाणपत्र जोडले, परंतु एकाही शेतकऱ्याने फूलशेती अथवा फुले येणाऱ्या पिकांची लागवड न केल्याने मधमाश्या जिवंत राहू शकल्या नाहीत. परिणामी, अनुदानाचा अपव्यय झाला.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रAurangabadऔरंगाबादFarmerशेतकरी