शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
2
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
3
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
4
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
5
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
6
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
7
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
8
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
9
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
10
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
11
कमी मद्यपानामुळेही तोंडाच्या कर्करोगाचा धोका; ‘टाटा मेमोरियल’च्या अभ्यासातील निष्कर्ष
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

पोकरा घोटाळा चाैकशी अहवालात लाभार्थी शेतकऱ्यांवर ठपका; अधिकारी-कर्मचाऱ्यांना ‘क्लीन चीट’

By बापू सोळुंके | Updated: November 22, 2023 12:32 IST

या अहवालात समितीने कृषी विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना ‘क्लीन चीट’ देत केवळ लाभार्थी शेतकऱ्यांना दोषी ठरवले आहे.

छत्रपती संभाजीनगर : पैठण तालुक्यातील नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पामध्ये (पोकरा) मधुमक्षिका पालन, फळबाग लागवड, तुती लागवड, ठिबक सिंचन व तुषार सिंचन आणि शेततळे, शेततळे अस्तरीकरणाचा लाभ देताना मोठा गैरव्यवहार झाल्याची वृत्त मालिका लोकमतने जुलै महिन्यात प्रकाशित केली होती. या वृत्तमालिकेनंतर कृषी विभागाने नियुक्त केलेल्या चौकशी समितीने चार महिन्यानंतर विभागीय कृषी सहसंचालकांना अहवाल सादर केला. या अहवालात समितीने कृषी विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना ‘क्लीन चीट’ देत केवळ लाभार्थी शेतकऱ्यांना दोषी ठरवले आहे. या शेतकऱ्यांकडून त्यांना देण्यात आलेले अनुदान वसुलीची शिफारस केल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिली.

विविध योजनांचा शेकडो शेतकऱ्यांना २०२२ मध्ये लाभ देण्यात आला होता. शेतकऱ्यांना लाभ कागदोपत्री दाखवून लाखो रुपयांचा अपहार करण्यात आला होता. याविषयी लोकमतने जुलै महिन्यात ‘पोकराला पोखरलं’ या टॅगलाईनखाली वृत्तमालिका प्रकाशित केली. यानंतर विभागीय कृषी सहसंचालकांनी वैजापूरचे उपविभागीय कृषी अधिकारी अशोक आढाव यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमली. समितीला पंधरा दिवसांत अहवाल देण्याची मुदत देण्यात आली होती. समितीने चार महिने चौकशी करून अहवाल नुकताच कृषी सहसंचालकांना सादर केला. सूत्राने दिलेल्या माहितीनुसार अहवालात रांजणगाव दांडगा, खादगाव आणि वडजी या तीन गावांतील २५ लाभार्थ्यांकडून ४० लाख ३३ हजार ८०० रुपये वसूल करण्याची शिफारस करण्यात आली आहे.

मधुमक्षिका पालन योजनेच्या चौकशीत समितीला काय आढळले ?- खादगाव येथील एक शेतकरी वगळता उर्वरित सर्वच लाभार्थी शेतकऱ्यांच्या मधुमक्षिका पेट्या बंद स्थितीत आढळून आल्या. मधकाढणी यंत्र केवळ ७ शेतकऱ्यांकडे दिसले.-शेतकऱ्यांना देण्यात आलेल्या अनुदानानुसार प्रत्येक शेतकऱ्यांकडे ५० मधमाशी पेटी आणि ५० मधमाशी वसाहतींचे कप्पे याप्रमाणे पूर्ण साहित्य असायला हवे होते. मात्र शेतकऱ्यांकडे ५० पेक्षा कमी मधमाशी पेट्या आणि १० ते १५ मधमाश्यांच्या वसाहतींचे कप्पे दिसले.-मधुमक्षिका पालन संचासोबत असलेला चाकू, हाईव टूल, स्मोकर, ट्रे, हातमोजे, मधपेटी, स्टॅण्ड इ. साहित्य शेतकऱ्यांनी राजस्थान येथे भाड्याने दिल्याचे सांगितले. वडजी येथील शेतकऱ्यांनी हे साहित्य वापराअभावी खराब झाल्याचे सांगितले.-सर्वच लाभार्थ्यांनी मधमाश्या उष्णतेमुळे आणि खाद्य उपलब्ध नसल्याने मरण पावल्याचे सांगितले.-मधुमक्षिका पालन संगोपनासाठी सर्व लाभार्थ्यांनी प्रशिक्षण घेतल्याचे प्रमाणपत्र जोडले, परंतु एकाही शेतकऱ्याने फूलशेती अथवा फुले येणाऱ्या पिकांची लागवड न केल्याने मधमाश्या जिवंत राहू शकल्या नाहीत. परिणामी, अनुदानाचा अपव्यय झाला.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रAurangabadऔरंगाबादFarmerशेतकरी