शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
3
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
4
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
5
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
6
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
7
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
8
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
9
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
10
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
11
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
12
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
13
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
14
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
15
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
16
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
17
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
18
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
19
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
20
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान

पोकरा घोटाळा चाैकशी अहवालात लाभार्थी शेतकऱ्यांवर ठपका; अधिकारी-कर्मचाऱ्यांना ‘क्लीन चीट’

By बापू सोळुंके | Updated: November 22, 2023 12:32 IST

या अहवालात समितीने कृषी विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना ‘क्लीन चीट’ देत केवळ लाभार्थी शेतकऱ्यांना दोषी ठरवले आहे.

छत्रपती संभाजीनगर : पैठण तालुक्यातील नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पामध्ये (पोकरा) मधुमक्षिका पालन, फळबाग लागवड, तुती लागवड, ठिबक सिंचन व तुषार सिंचन आणि शेततळे, शेततळे अस्तरीकरणाचा लाभ देताना मोठा गैरव्यवहार झाल्याची वृत्त मालिका लोकमतने जुलै महिन्यात प्रकाशित केली होती. या वृत्तमालिकेनंतर कृषी विभागाने नियुक्त केलेल्या चौकशी समितीने चार महिन्यानंतर विभागीय कृषी सहसंचालकांना अहवाल सादर केला. या अहवालात समितीने कृषी विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना ‘क्लीन चीट’ देत केवळ लाभार्थी शेतकऱ्यांना दोषी ठरवले आहे. या शेतकऱ्यांकडून त्यांना देण्यात आलेले अनुदान वसुलीची शिफारस केल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिली.

विविध योजनांचा शेकडो शेतकऱ्यांना २०२२ मध्ये लाभ देण्यात आला होता. शेतकऱ्यांना लाभ कागदोपत्री दाखवून लाखो रुपयांचा अपहार करण्यात आला होता. याविषयी लोकमतने जुलै महिन्यात ‘पोकराला पोखरलं’ या टॅगलाईनखाली वृत्तमालिका प्रकाशित केली. यानंतर विभागीय कृषी सहसंचालकांनी वैजापूरचे उपविभागीय कृषी अधिकारी अशोक आढाव यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमली. समितीला पंधरा दिवसांत अहवाल देण्याची मुदत देण्यात आली होती. समितीने चार महिने चौकशी करून अहवाल नुकताच कृषी सहसंचालकांना सादर केला. सूत्राने दिलेल्या माहितीनुसार अहवालात रांजणगाव दांडगा, खादगाव आणि वडजी या तीन गावांतील २५ लाभार्थ्यांकडून ४० लाख ३३ हजार ८०० रुपये वसूल करण्याची शिफारस करण्यात आली आहे.

मधुमक्षिका पालन योजनेच्या चौकशीत समितीला काय आढळले ?- खादगाव येथील एक शेतकरी वगळता उर्वरित सर्वच लाभार्थी शेतकऱ्यांच्या मधुमक्षिका पेट्या बंद स्थितीत आढळून आल्या. मधकाढणी यंत्र केवळ ७ शेतकऱ्यांकडे दिसले.-शेतकऱ्यांना देण्यात आलेल्या अनुदानानुसार प्रत्येक शेतकऱ्यांकडे ५० मधमाशी पेटी आणि ५० मधमाशी वसाहतींचे कप्पे याप्रमाणे पूर्ण साहित्य असायला हवे होते. मात्र शेतकऱ्यांकडे ५० पेक्षा कमी मधमाशी पेट्या आणि १० ते १५ मधमाश्यांच्या वसाहतींचे कप्पे दिसले.-मधुमक्षिका पालन संचासोबत असलेला चाकू, हाईव टूल, स्मोकर, ट्रे, हातमोजे, मधपेटी, स्टॅण्ड इ. साहित्य शेतकऱ्यांनी राजस्थान येथे भाड्याने दिल्याचे सांगितले. वडजी येथील शेतकऱ्यांनी हे साहित्य वापराअभावी खराब झाल्याचे सांगितले.-सर्वच लाभार्थ्यांनी मधमाश्या उष्णतेमुळे आणि खाद्य उपलब्ध नसल्याने मरण पावल्याचे सांगितले.-मधुमक्षिका पालन संगोपनासाठी सर्व लाभार्थ्यांनी प्रशिक्षण घेतल्याचे प्रमाणपत्र जोडले, परंतु एकाही शेतकऱ्याने फूलशेती अथवा फुले येणाऱ्या पिकांची लागवड न केल्याने मधमाश्या जिवंत राहू शकल्या नाहीत. परिणामी, अनुदानाचा अपव्यय झाला.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रAurangabadऔरंगाबादFarmerशेतकरी