शहरं
Join us  
Trending Stories
1
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
2
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
3
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
4
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
5
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
6
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
7
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
8
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
9
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
10
Maharashtra Politics : सांगलीत जयंत पाटलांना धक्का! अण्णासाहेब डांगे यांनी सोडली साथ; भाजपामध्ये केला प्रवेश
11
ताई चांगलं शिकवतात, ओरडत नाही, त्यांची बदली करु नका; तिसरीच्या विद्यार्थ्याचे शरद पवारांना पत्र
12
ट्रम्प सत्य सांगतील, म्हणून PM मोदी त्यांचे नाव घेत नाहीत; राहुल गांधींची बोचरी टीका
13
Jasprit Bumrah Miss Oval Test : जे आधी ठरलंय तसेच होणार! मग बुमराहची जागा कोण घेणार?
14
प्रा. ममता पाठक यांना जन्मठेपेची शिक्षा, पतीच्या खूनाचा आरोप; तो व्हिडिओ झालेला व्हायरल
15
दहशतवाद्यांनी कुंकूच पुसलं मग ऑपरेशनचं नाव 'सिंदूर' कशासाठी? जया बच्चन यांचा परखड सवाल
16
मालकिणीच्या हाताला झटका देऊन कुत्र्याची समोरून येणाऱ्या महिलेवर झडप, धडकी भरवणारा व्हिडीओ!
17
धुळ्यातील जोडपे कोकणात फिरायला आले अन् चिपळूणमधील वशिष्ठी नदीत मारल्या उड्या
18
निखिल रविशंकर यांच्या हाती एअर न्यूझीलंडची धुरा; कोण आहेत ते? जाणून घ्या अधिक माहिती
19
शौचालयात गेलेला मुलगा बाहेर येईना, घरच्यांनी दार तोडलं अन् समोर भयंकर दिसलं!
20
Sheetala Saptami 2025: आज रात्री थोडा जास्तच स्वयंपाक करा, कारण उद्या आहे शितला सप्तमी!

धर्मा पाटील यांच्या आत्महत्येस जबाबदार असणार्‍या मंत्र्याविरुद्ध तात्काळ गुन्हे नोंदवा; औरंगाबाद जिल्हा परिषदेत ठराव मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2018 14:10 IST

धुळे जिल्ह्यातील वयोवृद्ध शेतकरी धर्मा पाटील यांच्या आत्महत्येचे प्रकरण शुक्रवारी औरंगाबादच्या जिल्हा परिषदेतही उपस्थित झाले. पाटील यांच्या आत्महत्येस जबाबदार असणार्‍या मंत्री व अधिकार्‍यांविरुद्ध तात्काळ फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावेत, असा ठरावच  जि. प. स्थायी समितीच्या विशेष बैठकीत घेण्यात आला. 

ठळक मुद्देधर्मा पाटील यांचा मंत्रालयात विष प्राशन केल्यानंतर रुग्णालयात मृत्यू झाला.हा विषय औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या बैैठकीतही उपस्थित झाला.सदस्य रमेश गायकवाड यांनी सभागृहात याबाबत सविस्तर निवेदन केले. धर्मा पाटील यांच्या आत्महत्येस जबाबदार मंत्री आणि अधिकार्‍यांविरुद्ध मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, असा ठराव मंजूर करून तो शासनाकडे पाठविण्याचा निर्णय घेण्यात

औरंगाबाद : धुळे जिल्ह्यातील वयोवृद्ध शेतकरी धर्मा पाटील यांच्या आत्महत्येचे प्रकरण शुक्रवारी औरंगाबादच्याजिल्हा परिषदेतही उपस्थित झाले. पाटील यांच्या आत्महत्येस जबाबदार असणार्‍या मंत्री व अधिकार्‍यांविरुद्ध तात्काळ फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावेत, असा ठरावच  जि. प. स्थायी समितीच्या विशेष बैठकीत घेण्यात आला. 

धर्मा पाटील यांचा मंत्रालयात विष प्राशन केल्यानंतर रुग्णालयात मृत्यू झाला. या घटनेचे राज्यभर पडसाद उमटले होते. धर्मा पाटील यांच्या मृत्यूला जबाबदार असणार्‍यांवर गुन्हे दाखल करावेत, अशी राज्यभरातून मागणी झाली. हा विषय औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या बैैठकीतही उपस्थित झाला.सदस्य रमेश गायकवाड यांनी सभागृहात याबाबत सविस्तर निवेदन केले. ते म्हणाले की, औष्णिक ऊर्जा प्रकल्पासाठी धर्मा पाटील यांची ५ एकर जमीन २००९ मध्ये संपादित करण्यात आली. त्या जमिनीत आंब्यांची ६०० झाडे होती. ती २००९ च्या संयुक्त मोजणीमध्ये दाखविण्यात आली; पण पुढे २०१२ मध्ये ती वगळण्यात आली.

पाटील यांच्या बांधाला लागून दुसर्‍या शेतकर्‍यांच्या शेतातील झाडे मात्र दाखविण्यात आली. ते शेतकरी हे केंद्रीय मंत्री जयकुमार रावळ यांचे नातेवाईक असल्यामुळे फेरमोजणी करून त्यांना १ कोटी ८९ लाख रुपये एवढा वाढीव मावेजा देण्यात आला. या शेतकर्‍याची जमिनी केवळ दीड एकर असताना त्यांना १ कोटी ८९ लाख रुपये मावेजा आणि धर्मा पाटील यांची जमीन ५ एकर असताना त्यांना अवघा ४ लाख रुपयांचा मावेजा मिळाला. त्यामुळे त्यांनी अपील दाखल केले होते. धर्मा पाटील यांचे नातेवाईक मंत्री नसल्यामुळे त्यांच्यावर अन्याय करण्यात आला. यामुळे मंत्रालयातच विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. 

ठराव शासनाकडेधर्मा पाटलांसारखीच परिस्थिती औरंगाबाद जिल्ह्यातील शेतकर्‍यांची आहे. जिल्ह्यात दोन लाख शेतकरी प्रकल्पग्रस्त आहेत. या शेतकर्‍यांना वाढीव मावेजा मिळत नाही. प्रकल्पग्रस्त पुनर्वसनासाठी आवश्यक त्या सुविधा दिल्या जात नाहीत. ५ टक्के आरक्षणानुसार प्रकल्पग्रस्त शेतकर्‍यांच्या मुलांना नोकरीत सामावून घेतले जात नाही. पुनर्वसित गावांना ग्रामपंचायत तसेच जि. प. च्या योजनांचा लाभ दिला जात नाही. प्रकल्पग्रस्त शेतकर्‍यांना शासन निर्णयाप्रमाणे फायदे मिळाले पाहिजेत, तसेच धर्मा पाटील यांच्या आत्महत्येस जबाबदार मंत्री आणि अधिकार्‍यांविरुद्ध मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, असा ठराव मंजूर करून तो शासनाकडे पाठविण्याचा निर्णय घेण्यात

टॅग्स :zpजिल्हा परिषदAurangabadऔरंगाबाद