शहरं
Join us  
Trending Stories
1
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
2
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मानले पंतप्रधान मोदींचे आभार!
3
Today's Horoscope : शेअर्स बाजारात लाभ होईल, आर्थिक स्थिती सुधारेल; वाचा तुमचे आजचे राशीभविष्य काय?
4
मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष
5
अभियांत्रिकीचे यंदा विक्रमी १ लाख ६६ हजार प्रवेश; कॉम्प्युटर, आयटी, एआयच्या ८८ टक्के जागा भरल्या
6
छगन भुजबळांना कोर्टाचा दणका, बेनामी मालमत्तेचा खटला पुन्हा चालविण्याचे आदेश
7
विना‘आधार’ आडमुठेपणा...ती नामुष्की निवडणूक आयोगामुळे सरकारवर ओढवेल
8
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तीन टप्प्यांत? जाणून घ्या सविस्तर
9
एकनाथ शिंदेंवरील टीकेला प्रत्युत्तर देणार; खा. नरेश म्हस्के यांचा मंत्री नाईकांना अप्रत्यक्ष इशारा
10
परवाना मिळण्याआधीच मोडले नियम; ई-बाईकऐवजी चक्क पेट्रोलवरील गाडी हजर
11
रेसकोर्सवरील थीम पार्कवर पुन्हा ‘इव्हेंट’; काम सुरू होईपर्यंत कार्यक्रमांसाठी देणार भाड्याने
12
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
13
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
14
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
15
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
16
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
17
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
18
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
19
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
20
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार

धर्मा पाटील यांच्या आत्महत्येस जबाबदार असणार्‍या मंत्र्याविरुद्ध तात्काळ गुन्हे नोंदवा; औरंगाबाद जिल्हा परिषदेत ठराव मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2018 14:10 IST

धुळे जिल्ह्यातील वयोवृद्ध शेतकरी धर्मा पाटील यांच्या आत्महत्येचे प्रकरण शुक्रवारी औरंगाबादच्या जिल्हा परिषदेतही उपस्थित झाले. पाटील यांच्या आत्महत्येस जबाबदार असणार्‍या मंत्री व अधिकार्‍यांविरुद्ध तात्काळ फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावेत, असा ठरावच  जि. प. स्थायी समितीच्या विशेष बैठकीत घेण्यात आला. 

ठळक मुद्देधर्मा पाटील यांचा मंत्रालयात विष प्राशन केल्यानंतर रुग्णालयात मृत्यू झाला.हा विषय औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या बैैठकीतही उपस्थित झाला.सदस्य रमेश गायकवाड यांनी सभागृहात याबाबत सविस्तर निवेदन केले. धर्मा पाटील यांच्या आत्महत्येस जबाबदार मंत्री आणि अधिकार्‍यांविरुद्ध मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, असा ठराव मंजूर करून तो शासनाकडे पाठविण्याचा निर्णय घेण्यात

औरंगाबाद : धुळे जिल्ह्यातील वयोवृद्ध शेतकरी धर्मा पाटील यांच्या आत्महत्येचे प्रकरण शुक्रवारी औरंगाबादच्याजिल्हा परिषदेतही उपस्थित झाले. पाटील यांच्या आत्महत्येस जबाबदार असणार्‍या मंत्री व अधिकार्‍यांविरुद्ध तात्काळ फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावेत, असा ठरावच  जि. प. स्थायी समितीच्या विशेष बैठकीत घेण्यात आला. 

धर्मा पाटील यांचा मंत्रालयात विष प्राशन केल्यानंतर रुग्णालयात मृत्यू झाला. या घटनेचे राज्यभर पडसाद उमटले होते. धर्मा पाटील यांच्या मृत्यूला जबाबदार असणार्‍यांवर गुन्हे दाखल करावेत, अशी राज्यभरातून मागणी झाली. हा विषय औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या बैैठकीतही उपस्थित झाला.सदस्य रमेश गायकवाड यांनी सभागृहात याबाबत सविस्तर निवेदन केले. ते म्हणाले की, औष्णिक ऊर्जा प्रकल्पासाठी धर्मा पाटील यांची ५ एकर जमीन २००९ मध्ये संपादित करण्यात आली. त्या जमिनीत आंब्यांची ६०० झाडे होती. ती २००९ च्या संयुक्त मोजणीमध्ये दाखविण्यात आली; पण पुढे २०१२ मध्ये ती वगळण्यात आली.

पाटील यांच्या बांधाला लागून दुसर्‍या शेतकर्‍यांच्या शेतातील झाडे मात्र दाखविण्यात आली. ते शेतकरी हे केंद्रीय मंत्री जयकुमार रावळ यांचे नातेवाईक असल्यामुळे फेरमोजणी करून त्यांना १ कोटी ८९ लाख रुपये एवढा वाढीव मावेजा देण्यात आला. या शेतकर्‍याची जमिनी केवळ दीड एकर असताना त्यांना १ कोटी ८९ लाख रुपये मावेजा आणि धर्मा पाटील यांची जमीन ५ एकर असताना त्यांना अवघा ४ लाख रुपयांचा मावेजा मिळाला. त्यामुळे त्यांनी अपील दाखल केले होते. धर्मा पाटील यांचे नातेवाईक मंत्री नसल्यामुळे त्यांच्यावर अन्याय करण्यात आला. यामुळे मंत्रालयातच विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. 

ठराव शासनाकडेधर्मा पाटलांसारखीच परिस्थिती औरंगाबाद जिल्ह्यातील शेतकर्‍यांची आहे. जिल्ह्यात दोन लाख शेतकरी प्रकल्पग्रस्त आहेत. या शेतकर्‍यांना वाढीव मावेजा मिळत नाही. प्रकल्पग्रस्त पुनर्वसनासाठी आवश्यक त्या सुविधा दिल्या जात नाहीत. ५ टक्के आरक्षणानुसार प्रकल्पग्रस्त शेतकर्‍यांच्या मुलांना नोकरीत सामावून घेतले जात नाही. पुनर्वसित गावांना ग्रामपंचायत तसेच जि. प. च्या योजनांचा लाभ दिला जात नाही. प्रकल्पग्रस्त शेतकर्‍यांना शासन निर्णयाप्रमाणे फायदे मिळाले पाहिजेत, तसेच धर्मा पाटील यांच्या आत्महत्येस जबाबदार मंत्री आणि अधिकार्‍यांविरुद्ध मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, असा ठराव मंजूर करून तो शासनाकडे पाठविण्याचा निर्णय घेण्यात

टॅग्स :zpजिल्हा परिषदAurangabadऔरंगाबाद