शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
2
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
3
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
4
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
5
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
6
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
7
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
8
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
9
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
10
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
11
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
12
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
13
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
14
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
15
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
16
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
17
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
18
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
19
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
20
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?

ध्यानधारणेपूर्वी दूर करा मनावरची जळमटे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2019 23:20 IST

ध्यानधारणा करताना सुरुवातीला मन केंद्रित करणे अवघड जाते. अनेक विचार मनात डोकावू लागतात. जोपर्यंत मनावरचे हे विचारांचे मळभ दूर होत नाही, तोपर्यंत ध्यानधारणेतून योग्य फायदे मिळत नाहीत. त्यामुळे ध्यानधारणेला सुरुवात करण्यापूर्वी सगळ्यात आधी मनावरची जळमटे दूर करा, असे मार्गदर्शन डॉ. कपिल ठाकूर यांनी केले आणि ‘मन शुद्धीकरण’ कसे करायचे, हे शिकविले.

ठळक मुद्देडॉ. कपिल ठाकूर : तीनदिवसीय ध्यानोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद

औरंगाबाद : ध्यानधारणा करताना सुरुवातीला मन केंद्रित करणे अवघड जाते. अनेक विचार मनात डोकावू लागतात. जोपर्यंत मनावरचे हे विचारांचे मळभ दूर होत नाही, तोपर्यंत ध्यानधारणेतून योग्य फायदे मिळत नाहीत. त्यामुळे ध्यानधारणेला सुरुवात करण्यापूर्वी सगळ्यात आधी मनावरची जळमटे दूर करा, असे मार्गदर्शन डॉ. कपिल ठाकूर यांनी केले आणि ‘मन शुद्धीकरण’ कसे करायचे, हे शिकविले.हार्टफुलनेस संस्थान, रामचंद्र मिशन आणि ‘लोकमत’च्या सहकार्याने एमजीएम परिसरातील रुक्मिणी सभागृहात तीनदिवसीय ‘ध्यानोत्सव’चे आयोजन करण्यात आले आहे. शनिवारी सायंकाळी नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात ‘ध्यानोत्सव’चे दुसरे सत्र पार पडले. डॉ. कपिल ठाकू र, डॉ. मानसी ठाकूर, लोकमत समाचारचे कार्यकारी संपादक अमिताभ श्रीवास्तव, एमजीएम वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. प्रवीण सूर्यवंशी यांची प्रमुख उपस्थिती होती.दुसऱ्या सत्रात डॉ. ठाकूर यांनी ध्यानधारणा म्हणजे काय, कशाचे ध्यान करायचे, ध्यान कुठे करावे आणि कसे करावे, या सर्वसामान्य लोकांना कायम पडणाºया महत्त्वपूर्ण प्रश्नांची उत्तरे दिली. ते म्हणाले की, ध्यान करणे म्हणजे एखाद्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करणे होय. ज्या विचारावर लक्ष केंद्रित करतो, तसा परिणाम आपल्यावर होत जातो. त्यामुळे कशाचे ध्यान करायचे, हे सांगताना त्यांनी ‘ईश्वरीय प्रकाश’ या गोष्टीचे ध्यान करण्याचा सल्ला दिला. हृदयामधूनच सर्व शरीराला शुद्ध रक्ताचा पुरवठा होतो. त्यामुळे आपल्या हृदयातच ही दिव्य शक्ती आहे, असे समजून शांतचित्ताने ध्यान करावे, असे त्यांनी सूचित केले. मन शुद्धीकरण सगळी कामे संपल्यानंतर रात्री झोपण्यापूर्वी करावे.डॉ. मीनाक्षी भन्साळी यांनी हार्टफुलनेस यांच्या वतीने ५ ते १५ वर्षे या वयोगटातील मुलांसाठी राबविण्यात येणाºया ब्राईटर माइंड्स या उपक्रमाविषयी माहिती दिली. डॉ. मानसी आणि डॉ. सूर्यवंशी यांनीही ध्यानाचे फायदे सांगितले.चौकट :‘ध्यानोत्सव’चा आज समारोप :तीनदिवसीय ‘ध्यानोत्सव’ उपक्रमाचा रविवारी (दि. ७) समारोप होत आहे. सायं. ५:३० वा. रुक्मिणी सभागृहात हा कार्यक्रम होईल. १५ वर्षांवरील सर्वांसाठी कार्यक्रम खुला असून, प्रथम येणाºयास प्रथम प्राधान्य यानुसार दिलेल्या वेळेच्या १५ मिनिटे आधी येऊन आपले आसन निश्चित करावे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादHealthआरोग्य