जालना : राज्यातील काही भागात व मराठवाड्यात दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून, दुष्काळी सदृश्य परिस्थितीवर मात करण्यासाठी शासन योग्य ते निर्णय घेत आहे़ सध्या जिल्ह्यात तीन वर्षांपासून काही प्रकल्प तांत्रिक कारणामुळे रखडलले असून प्रलंबित प्रकरणे सुरळीतपणे सुरु करण्यासाठी अधिकाऱ्यांनी तात्काळ कामाला लागावे, असे आदेश भाजपा प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांनी विविध विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात प्रलंबित प्रकल्पाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस जिल्हाधिकारी ए़ एस़ आऱ नायक, निवासी उपजिल्हाधिकारी राजेश इतवारे, उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) भारत कदम, उपजिल्हाधिकारी (रोहयो) संजय गायकवाड, उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन) शोभा ठाकूर, जिल्हा नियोजन अधिकारी रविंद्र जगताप, भोकरदनचे उपविभागीय अधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, जालन्याचे उपविभागीय अधिकारी श्रीकुमार चिंचकर, जिल्हा परिषदेचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी तथा ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य ए.जी़ ताठे, अधीक्षक अभियंता श्री़शिंदे, बेलापट्टे, तसेच उपअभियंता, कनिष्ठ अभियंता व तहसीलदार तसेच संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते़खा. दानवे म्हणाले की, जिल्ह्यातील लघु, साठवण प्रकल्पासाठी शेतकर्यांच्या जमिनी अधिग्रहित केल्या होत्या़ काही तांत्रिक कारणामुळे संबंधित शेतकऱ्यांच्या जमिनीचा मावेजा रखडलेला आहे़ त्या तांत्रिक बाबीची पूर्तता करुन अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांचा मावेजा त्वरित देण्यात यावा़तसेच योग्य त्या सोईसुविधा देऊन प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन त्वरीत करावे असे नमूद करुन खा. दानवे यांनी जिल्ह्यातील नियोजित दरेगांव येथील ड्रायपोर्ट उभारणीसाठी भू-संपादनाच्या काही अडचणी आहेत. त्या लवकरच जिल्हाधिकारी यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा करुन ड्रायपोर्टचा प्रलंबित प्रश्न सोडविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले़सांसद आदर्श ग्राम योजनेंतर्गत राजूर येथे होत असलेल्या विकास कामांचा आढावाही घेण्यात आला़ जिल्हाधिकारी नायक यांनी जिल्ह्यातील विविध विकास कामांबाबत अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना दिल्या़ (प्रतिनिधी)जालना : सांसद आदर्श ग्राम योजनेंतर्गत खा.रावसाहेब दानवे यांनी राजूर या गावाची काही दिवसांपूर्वी निवड केली आहे. या योजनेंतर्गत राजूर येथील सर्व ग्रामस्थांना आरोग्याविषयी सखोल माहिती व्हावी या उद्देशाने बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात खा. रावसाहेब दानवे यांच्या हस्ते व जिल्हा परिषद अध्यक्ष तुकाराम जाधव तसेच जिल्हाधिकारी ए़ एस़ आऱ नायक यांच्या उपस्थितीत वैयक्तिक आरोग्य संचिकेचे विमोचन करण्यात आले़ ४जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा परिषदेचा आरोग्य विभागांतर्गत आरोग्य संचिका काढण्यात आली असून, या संचिकेमध्ये बालक, पुरुष, स्त्रिया यांच्या आरोग्य तपासणीचा संपूर्ण माहिती मराठी भाषेत विषद करण्यात आली आहे. ही संचिका ग्रामस्थांच्या उपयोगात येईल़ ४या प्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी राजेश इतवारे, उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) भारत कदम, उपजिल्हाधिकारी (रोहयो) संजय गायकवाड, उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन) शोभा ठाकूर, भोकरदनचे उपविभागीय अधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, जालन्याचे उपविभागीय अधिकारी श्रीकुमार चिंचकर, जिल्हा परिषदेचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी तथा ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य ए. जी.ताठे, अमोल गिते, जिल्हा परिषदेचे संबंधित व इतर विभागाचे अधिकारी उपस्थित होते़
प्रलंबित प्रकल्पांची कामे निकाली काढा- दानवे
By admin | Updated: September 3, 2015 00:27 IST