शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी शिंदेसेनेला धक्का? १५ माजी नगरसेवक नाराजीची चर्चा
2
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, वक्फ कायद्याला अभय; बोर्डात ३ गैर मुस्लीम सदस्य बनू शकतात, परंतु...
3
Acharya Devvrat: आचार्य देवव्रत यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून घेतली शपथ 
4
पाकिस्तान फायनलमध्ये हवीय...! प्लीज भारताने पुढला सामना बॉयकॉट करावा; पाकिस्तानी चाहत्यांची मागणी
5
"...तर माझ्या वडिलांचा जीव वाचला असता"; नवजोत सिंग यांच्या मुलाने केला गंभीर आरोप
6
ITR भरण्याची अंतिम मुदत वाढणार? सोशल मीडियावर चर्चा; आयकर विभागाने केलं स्पष्ट
7
"आपण कधी काळी तोडले गेलो, पण तेही परत मिळवू"; सरसंघचालक मोहन भागवत यांचे मोठे विधान
8
टीम इंडियाने हस्तांदोलन नाकारल्याने पाकिस्तानचा तीळपापड, पत्रक जारी करत नोंदवला निषेध
9
बाबाचं लक्ष फोनमध्ये, आई चेंजिंगरूममध्ये; स्विमिंग पूलमध्ये पडलेल्या ४ वर्षांच्या मुलीकडे कुणी पाहिलच नाही अन्...
10
Ameesha Patel : "९० टक्के सेलिब्रिटी पैसे देऊन..."; अमिषा पटेलने उलगडलं बॉलिवूड इंडस्ट्रीचं गुपित, सांगितलं 'ते' सत्य
11
शेवटी आईच ती! स्वत:ला झोकून दिले आणि लेकीला मगरीच्या जबड्यातून सोडवले, पण... 
12
४ महिन्यापूर्वी लग्न झालेल्या विवाहितेचा संशयास्पद मृत्यू; हुंड्यासाठी छळ करून केली हत्या? 
13
यह नया भारत है..., टीम इंडियाने पाकिस्तानला नमवल्यानंतर भाजपाने विरोधकांना डिवचले  
14
२२ सप्टेंबरपासून टीव्ही, फ्रीज, एसीसह इलेक्ट्रॉनिक वस्तू स्वस्त होणार; किती रुपयांची बचत होईल?
15
Cloudburst In Maharashtra: अहिल्यानगर जिल्ह्यात ढगफुटी, अनेक गावांना फटका; छोटा तलाव फुटला
16
कहानी में ट्विस्ट! नवऱ्याने बायकोचं बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं, आता 'त्याचं' भलतंच सत्य समोर आलं
17
सचिनला तुम्ही सीनिअर आहात?, मिश्कील प्रश्नावर दिलीप प्रभावळकरांना आलं हसू; मग म्हणाले...
18
दबावाखाली बाजार: ऑक्टोबर ‘ब्रेकआउट’ देईल की ‘ब्रेक’ घ्यावा लागेल?
19
झारखंडमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई; तीन माओवादी ठार, एकावर एक कोटी रुपयांचे बक्षीस
20
अहिल्यानगरमध्ये भूकंपाचे धक्के! बोटा, घारगाव परिसर हादरला; लोकांमध्ये भीतीचे वातावरण

लक्षात ठेवा, बालविवाहाला उपस्थित राहाल, तर दोन वर्षे कोठडीत जाल!

By विजय सरवदे | Updated: December 10, 2022 19:46 IST

लग्नसराईत बालविवाह प्रतिबंधक पथकांची बालविवाहावर करडी नजर

- विजय सरवदेऔरंगाबाद : सध्या लग्नसराईची धामधूम सुरू आहे. जिल्ह्यात कुठे बालविवाह होताहेत का, यावर महिला व बालविकास विभागांतर्गत कार्यरत बालविवाह प्रतिबंधक पथकांची करडी नजर आहे. त्यामुळे सावधान! बालविवाह लावून देणारे कुटुंब व लग्नाला उपस्थित वऱ्हाडी मंडळीवरही कायदेशीर कारवाई होऊ शकते. जिल्हा बाल संरक्षण अधिकारी महादेव डोंगरे यांनी सांगितले की, यंदा आतापर्यंत ११ महिन्यांत महिला व बालविकास विभागाने जिल्ह्यात ३९ बालविवाह रोखलेे आहेत, हे विशेष!

‘बालविवाह प्रतिबंध कायदा’ हा मुलींना संरक्षण देणारा कायदा आहे. या कायद्यानुसार मुलीचे १८ वर्षांहून कमी व मुलाचे २१ वर्षांहून कमी वय हे कायदेशीर विवाहासाठी योग्य नाही. वर किंवा वधू यांच्यातील एक जरी अल्पवयीन असेल, तरी तो बालविवाह समजला जातो. प्रामुख्याने गरीबी, निरक्षरता हेच घटक बालविवाहास कारणीभूत ठरत आहेत. मुलींना सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या सुरक्षित ठेवण्याचा एक मार्ग म्हणून पालक याकडे पाहतात. संस्कृती, परंपरा यांच्या नावाखाली सुद्धा अनेक बालविवाह केले जातात.

- काय आहे कायदा ?देशात बालविवाह प्रतिबंधक कायदा सन २००६ मध्ये करण्यात आला आणि १ नोव्हेंबर २००७ पासून तो अमलात आला. या कायद्यानुसार वधूचे वय १८ आणि वराचे २१ पेक्षा कमी असेल, तर तो बालविवाह ठरतो. बालविवाह हा मुलांच्या अधिकारांचे उल्लंघन करणारा विवाह आहे. लहान वयात लग्न झाल्यामुळे मुलींना लैंगिकतेविषयी पुरेसे ज्ञान नसते. बालविवाह हा कायद्याने गुन्हा आहे.

- लाखाचा दंड अन् दोन वर्षे कारावासजास्त वयाच्या पुरुषाने १८ पेक्षा कमी वयाच्या मुलीसोबत लग्न केले, तर त्याला दोन वर्षांपर्यंत सक्त मजुरी आणि एक लाख रुपयापर्यंत दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. संबंधित वर व वधू यांचे आईवडील, नातेवाईक, मित्र परिवार असे सर्व, ज्यांनी हा विवाह लावण्यास प्रत्यक्षात मदत केली, जे अशा विवाहात सामील झाले होते, त्या सर्वांना दोन वर्षापर्यंत सक्त मजुरीची शिक्षा व एक लाख रुपयापर्यंत दंड होऊ शकतो. मात्र, संबंधित स्त्री गुन्हेगारांना कैदेची शिक्षा होणार नाही. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार कायद्याने अल्पवयीन ठरविलेल्या मुलीचे लग्न झाल्यास पोक्सो - २०१२ कायद्यानुसार सुद्धा गुन्हा दाखल होऊ शकतो.

- ११ महिन्यांत ३९ बालविवाह रोखलेजिल्हा महिला व बालविकास विभागांतर्गत कार्यरत सर्वच यंत्रणांच्या प्रयत्नाने यंदा ११ महिन्यांत ३९ बालविवाह रोखण्यात आले आहेत.

कायदा फार कडक झाला आहेग्रामीण भागात बालविवाह प्रतिबंधक अधिकारी म्हणून ग्रामसेवक, तर शहरी भागात बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यरत आहेत. अलीकडेच ग्रामेसवक, केंद्रप्रमुख, शिक्षक, पोलिस यांचेही प्रशिक्षण घेण्यात आले आहे. या सर्व यंत्रणांनी प्रयत्न केले, तर बालविवाहाला रोख लागेल. कायदा फार कडक झाला आहे. त्यामुळे कोणी बालविवाहाला प्रोत्साहन देऊ नये. जर असे कुठे घडत असेल, तर सजग नागरिकांनी चाईल्ड लाईनला १०९८ या क्रमांकावर कळवावे.- जिल्हा महिला व बालविकास अधिकारी प्रमोद येंडोले

टॅग्स :marriageलग्नAurangabadऔरंगाबादCrime Newsगुन्हेगारी