शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
2
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
3
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
4
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार
5
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
6
दुसऱ्यांचा विनाश करणे हा धर्म नाही अधर्म आहे, शिक्षा झालीच पाहिजे - प्रेमानंद महाराज
7
‘पत्नीचे अनेक तरुणांशी अनैतिक संबंध, नशेच्या धुंदीत घालतात धिंगाणा, करतात अश्लील चाळे ’, पतीचे गंभीर आरोप, पुरावेही दिले   
8
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
9
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
10
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
11
जिद्द असावी तर अशी! अंगणवाडी ते IAS अधिकारी; ३ वेळा अपयश, मानली नाही हार, रचला इतिहास
12
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान
13
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
14
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
15
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
16
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
17
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
18
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
19
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
20
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'

दुसऱ्या लाटेत ‘ब्लॅक’मध्ये खरेदी केले, आता १४ हजार रेमडेसिविर पडून

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2022 12:25 IST

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेने अवघ्या महिनाभरात परतीचा प्रवास सुरू केला आहे. त्यातही शहरात ९२ टक्के रुग्ण घरीच बरे होत आहेत. त्यामुळे रुग्णालयांत कोविड औषधी, ऑक्सिजनचा वापरच कमी झाला आहे.

संतोष हिरेमठ

औरंगाबाद : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेने अवघ्या महिनाभरात परतीचा प्रवास सुरू केला आहे. त्यातही शहरात ९२ टक्के रुग्ण घरीच बरे होत आहेत. त्यामुळे रुग्णालयांत कोविड औषधी, ऑक्सिजनचा वापरच कमी झाला आहे. दुसऱ्या लाटेत रुग्णांच्या संख्येपुढे रेमडेसिविर कमी पडले. जवळच्या रुग्णासाठी नातेवाइकांनी अक्षरश: हजारो रुपये मोजून ब्लॅकमध्ये रेमडेसिविर खरेदी केले. मात्र, जिल्ह्यात सध्या १४ हजार रेमडेसिविर पडून असून त्यांना कोणीही विचारतही नाही.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत कोरोना रुग्ण आणि रेमडेसिविर इंजेक्शन असे समीकरणच झाले होते; कारण त्यावेळी गंभीर रुग्णांची संख्या सर्वाधिक होती. नातेवाइकांना रेमडेसिविरचा शोध घेत भटकावे लागले. परिणामी, रेमडेसिविरचा काळा बाजारही झाला. मात्र, सध्या तिसऱ्या लाटेत गंभीर रुग्णांचे प्रमाण अत्यल्प आहे. बहुतांश रुग्ण घरीच बरे होत आहेत. त्यामुळे सध्या रेमडेसिविरचा वापर कमीच आहे. ऑक्सिजनसह औषधींचीही हीच स्थिती आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेला दिलासा मिळत आहे. शहरातील सक्रिय २,८०५ कोरोना रुग्णांपैकी तब्बल २,६०२ रुग्ण गृह विलगीकरणात आहेत.

रेमडेसिविरची काय स्थिती?

जिल्ह्यात रेमडेसिविरचा शासकीय साठा ११४९६ आणि खाजगी साठा ३०८९ इतका आहे, अशी माहिती अन्न व औषध प्रशासनाचे (औषध) सहआयुक्त संजय काळे यांनी दिली.

ऑक्सिजनची काय स्थिती?

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत म्हणजे एप्रिल २०२१ मध्ये औरंगाबादेत २४ तासांत ६० टन ऑक्सिजन लागत होता. रोज ऑक्सिजन येतो आणि संपतो, अशी जिल्ह्याची स्थिती होती; परंतु सुदैवाने औरंगाबादेत ऑक्सिजनअभावी कोणतीही मोठी घटना तेव्हा घडली नाही. सध्या औरंगाबादेत रोज ५.५ टन ऑक्सिजन लागतो. म्हणजे दुसऱ्या लाटेत एका दिवसांत संपणारा ऑक्सिजन आता १० दिवसांत संपतो. जिल्ह्यात सध्या ८४.३४ मे. टन इतका ऑक्सिजन साठा आहे.

पुरेसा औषधीसाठा

कोरोनाची रुग्णसंख्या कमी आहे. त्यातही गंभीर रुग्णांची संख्या कमी आहे. लक्षणे नसलेले आणि सौम्य लक्षणे असलेले रुग्ण आहेत. त्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आहे. औषधी साठाही पुरेसा आहे.- डाॅ. सुनीता गोल्हाईत, आरोग्य उपसंचालक

घाटीत महिनाभर पुरेल इतकी औषधी

घाटी रुग्णालयात कोरोना रुग्णांच्या उपचाराच्या दृष्टीने पूर्ण नियोजन करण्यात आले. महिनाभर पुरेल इतका कोविड रुग्णांसाठीचा औषधी साठा आहे. काही औषधी इतर रुग्णांसाठीही वापरात येतात.- डाॅ. वर्षा रोटे-कागिनाळकर, अधिष्ठाता, घाटी

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबादremdesivirरेमडेसिवीर