शहरं
Join us  
Trending Stories
1
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
2
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
3
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
4
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
5
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
6
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
7
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
8
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
9
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
10
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
11
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
12
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
14
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
15
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
16
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
17
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
18
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
19
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
20
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा

राजकीय दबावापोटी पाण्याचे सीमोल्लंघन लांबले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2018 23:42 IST

औरंगाबाद : मराठवाड्यासाठी जायकवाडी धरणात अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यांतील धरणांतून १७२ दलघमी पाणी सोडण्यावर तीन दिवसांत निर्णय घेतला जाणार ...

ठळक मुद्देसमन्यायी पाणीवाटप : तीन दिवसांनंतरही निर्णय नाही

औरंगाबाद : मराठवाड्यासाठी जायकवाडी धरणात अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यांतील धरणांतून १७२ दलघमी पाणी सोडण्यावर तीन दिवसांत निर्णय घेतला जाणार होता; परंतु तीन दिवसांनंतरही निर्णयाअभावी वरच्या धरणातील पाण्याचे सीमोल्लंघन लांबले आहे. राजकीय दबावापोटी हा निर्णय लांबविला जात असल्याची चर्चा आहे.गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अजय कोहीरकर यांच्या अध्यक्षतेखाली १५ आॅक्टोबर रोजी नगर, नाशिक, गंगापूर आणि जायकवाडी पाटबंधारे विभागाच्या प्रमुख प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत मुळा, भंडारदरा, दारणा या धरणांतील उपलब्ध पाणीसाठ्याचा आढावा घेऊन जायकवाडीत पाणी सोडण्याबाबत चर्चा झाली.जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने ठरवून दिलेल्या धोरणानुसार जायकवाडी धरणाच्या वर असलेल्या प्रकल्पांमध्ये उपलब्ध पाणीसाठा तसेच वापरलेले पाणी यांची बेरीज करून जायकवाडी धरणात पाणी सोडण्याबाबत चर्चा करण्यात आली. चर्चेअंती जायकवाडी धरणात १७२ दलघमी म्हणजे ७ टीएमसी एवढ्या पाण्याची तूट असल्याचे समोर आले. त्यामुळे किमान ७ टीएमसी पाणी वरच्या धरणांतून जायकवाडीत सोडणे अपेक्षित आहे. कोणत्या धरणातून किती पाणी सोडायचे, याचा तीन दिवसांत निर्णय घेतला जाणार होता; परंतु तीन दिवस उलटूनही यावर काही निर्णय झालेला नाही. त्यामुळे जायकवाडीला येणाºया पाण्याची वाट बिकट झाल्याचे दिसते.नगर जिल्ह्यातील शेतकºयांनी जायकवाडीत पाणी सोडण्यास विरोध केला आहे. शिवाय या जिल्ह्यात दुष्काळी स्थिती असल्यामुळे जिल्ह्यातील सर्व धरणांतील पाणी पिण्यासाठी आरक्षित करण्याचा आदेश जिल्ह्याचे पालकमंत्री राम शिंदे यांनी जिल्हा नियोजन समितीच्या सभेत दिला आहे़ कोणत्याही परिस्थितीत जायकवाडीला पाणी न देण्याचा ठरावदेखील या सभेत करण्यात आला आहे. त्यामुळे राजकीय दबावामुळे जायकवाडीत पाणी सोडण्याचा निर्णय लांबवला जात असल्याची चर्चा सुरूआहे.आणखी दोन दिवसजायकवाडीत वरच्या धरणांतून पाणी सोडण्यासंदर्भात अद्याप काही निर्णय झालेला नाही. आगामी दोन दिवसांत यासंदर्भात निर्णय होईल,अशी माहिती गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या अधिकाºयांनी दिली.

टॅग्स :DamधरणWaterपाणी