शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात हल्ल्याची तयारी, पाकिस्तानी कनेक्शन उघड; दहशतवादी बिलालच्या चौकशीतून धक्कादायक खुलासे
2
Operation Pimple : सैन्याला मोठं यश! कुपवाडामध्ये घुसखोरी करणाऱ्या २ दहशतवाद्यांचा खात्मा
3
शेजाऱ्याशी लफडं, गुपित पतीला कळलं; प्रियकरासोबत मिळून पत्नीने केली हत्या, मृतदेह नदीत फेकला
4
उद्धव ठाकरेंसमोर व्यथा मांडताना ९० वर्षीय शेतकऱ्याला रडू कोसळले; म्हणाले, “कर्जमाफी...”
5
IND vs AUS 5th T20I : तिलक वर्माला बसवलं बाकावर! टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये रिंकूची एन्ट्री
6
जरीन खान यांच्यावर हिंदू पद्धतीने झाले अंत्यसंस्कार, मुलगा झायेदने दिला अग्नी; कारण...
7
कतरिना कैफचे सासरे 'आजोबा' बनल्यानंतर झाले भावुक! 'ज्युनिअर कौशल'साठी शेअर केली प्रेमळ पोस्ट
8
"महाराष्ट्र लुटून खा... आम्ही...! मंत्री सरनाईकांनी २०० कोटींची जमीन ३ कोटीत घेतली", वडेट्टीवारांचा गंभीर आरोप
9
राहू-केतू गोचर २०२५: राहू केतू तसे तापदायकच, पण नोव्हेंबरमध्ये 'या' ८ राशींवर होणार मेहेरबान!
10
Railway: धावत्या ट्रेनला गरुडाची समोरून धडक, जखमी होऊनही लोको पायलटनं प्रसंगावधान दाखवलं, नाही तर...
11
अजबच...! नकळत लग्न झालं...! अमेरिकन पॉप स्टारचा मलेशियन सुलतानशी 'निकाह', आता 'तलाक'ची मागणी; नेमकं प्रकरण काय?
12
“प्रत्येक भारतीयाला वंदे भारत ट्रेनचा अभिमान”: PM मोदी, वाराणसीतून ४ नव्या सेवांचे लोकार्पण
13
"ओए होए छोटा छावा...", विकी कौशल-कतरिना कैफच्या पोस्टवर संतोष जुवेकरची कमेंट
14
७ वर्षांनंतर अनुष्का शर्मा करणार कमबॅक! 'चकदा एक्सप्रेस' OTTवर होणार रिलीज?
15
एका चपातीमध्ये किती कॅलरीज असतात, वजन कमी करण्यासाठी रात्री किती खाव्यात?
16
Crime:  "काका वारले, मुलंही सारखी आजारी पडतात", जादूटोण्याचा संशयातून जन्मदात्या आईची हत्या!
17
IND vs AUS:"कभी शेर को घास खाते हुए देखा है क्या?" सूर्या भाऊनं केली अभिषेकची थट्टा; व्हिडिओ व्हायरल
18
कतरिना कैफने ४२ व्या वर्षी दिला मुलाला जन्म, कशी आहे तब्येत? रुग्णालयाने शेअर केलं अपडेट
19
Video: मराठी अभिनेत्रींनी केलं सोहम बांदेकरचं केळवण; आदेश-सुचित्रा बांदेकरांची होणारी सून कोण?
20
Gardening Tips: बटाट्याची सालं फेकू नका, रोपांसाठी ठरते सुपरफूड; वापर कसा करायचा ते पाहा 

राजकीय दबावापोटी पाण्याचे सीमोल्लंघन लांबले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2018 23:42 IST

औरंगाबाद : मराठवाड्यासाठी जायकवाडी धरणात अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यांतील धरणांतून १७२ दलघमी पाणी सोडण्यावर तीन दिवसांत निर्णय घेतला जाणार ...

ठळक मुद्देसमन्यायी पाणीवाटप : तीन दिवसांनंतरही निर्णय नाही

औरंगाबाद : मराठवाड्यासाठी जायकवाडी धरणात अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यांतील धरणांतून १७२ दलघमी पाणी सोडण्यावर तीन दिवसांत निर्णय घेतला जाणार होता; परंतु तीन दिवसांनंतरही निर्णयाअभावी वरच्या धरणातील पाण्याचे सीमोल्लंघन लांबले आहे. राजकीय दबावापोटी हा निर्णय लांबविला जात असल्याची चर्चा आहे.गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अजय कोहीरकर यांच्या अध्यक्षतेखाली १५ आॅक्टोबर रोजी नगर, नाशिक, गंगापूर आणि जायकवाडी पाटबंधारे विभागाच्या प्रमुख प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत मुळा, भंडारदरा, दारणा या धरणांतील उपलब्ध पाणीसाठ्याचा आढावा घेऊन जायकवाडीत पाणी सोडण्याबाबत चर्चा झाली.जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने ठरवून दिलेल्या धोरणानुसार जायकवाडी धरणाच्या वर असलेल्या प्रकल्पांमध्ये उपलब्ध पाणीसाठा तसेच वापरलेले पाणी यांची बेरीज करून जायकवाडी धरणात पाणी सोडण्याबाबत चर्चा करण्यात आली. चर्चेअंती जायकवाडी धरणात १७२ दलघमी म्हणजे ७ टीएमसी एवढ्या पाण्याची तूट असल्याचे समोर आले. त्यामुळे किमान ७ टीएमसी पाणी वरच्या धरणांतून जायकवाडीत सोडणे अपेक्षित आहे. कोणत्या धरणातून किती पाणी सोडायचे, याचा तीन दिवसांत निर्णय घेतला जाणार होता; परंतु तीन दिवस उलटूनही यावर काही निर्णय झालेला नाही. त्यामुळे जायकवाडीला येणाºया पाण्याची वाट बिकट झाल्याचे दिसते.नगर जिल्ह्यातील शेतकºयांनी जायकवाडीत पाणी सोडण्यास विरोध केला आहे. शिवाय या जिल्ह्यात दुष्काळी स्थिती असल्यामुळे जिल्ह्यातील सर्व धरणांतील पाणी पिण्यासाठी आरक्षित करण्याचा आदेश जिल्ह्याचे पालकमंत्री राम शिंदे यांनी जिल्हा नियोजन समितीच्या सभेत दिला आहे़ कोणत्याही परिस्थितीत जायकवाडीला पाणी न देण्याचा ठरावदेखील या सभेत करण्यात आला आहे. त्यामुळे राजकीय दबावामुळे जायकवाडीत पाणी सोडण्याचा निर्णय लांबवला जात असल्याची चर्चा सुरूआहे.आणखी दोन दिवसजायकवाडीत वरच्या धरणांतून पाणी सोडण्यासंदर्भात अद्याप काही निर्णय झालेला नाही. आगामी दोन दिवसांत यासंदर्भात निर्णय होईल,अशी माहिती गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या अधिकाºयांनी दिली.

टॅग्स :DamधरणWaterपाणी