शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
3
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
4
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
5
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
6
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
7
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
8
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
9
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
10
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
11
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
12
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
13
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
14
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
15
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
16
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
17
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
18
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
19
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
20
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण

महापालिकेला दिलासा; स्मार्टसिटीचा २५० कोटींचा हिस्सा भरण्यासाठी मिळाली एका वर्षाची मुदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 18:52 IST

प्रशासकांची दिल्ली वारी फळाला आली असून, आता मनपाला आगामी वर्षभरात स्वहिस्सा उभारण्याची तयारी करावी लागणार आहे.

ठळक मुद्देपाच वर्षांत एक हजार कोटींची कामे

औरंगाबाद : महापालिका जोपर्यंत स्वहिस्सा भरणार नाही, तोपर्यंत स्मार्ट सिटीसाठी असलेला पुढील निधीचा पुढचा टप्पा केंद्र सरकार देणार नाही, असे गेल्या महिन्यात सांगण्यात आले होते. मात्र, दोन दिवसांपूर्वी महापालिकेचे प्रशासक तथा औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉपोर्रेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी आस्तिककुमार पाण्डेय दिल्लीत केंद्रीय उपसचिव कुणालकुमार यांची भेट घेतल्यामुळे २५० कोटींचा स्वहिस्सा भरण्यासाठी मनपाला एक वर्षाची मुदत मिळाली आहे.

प्रशासकांची दिल्ली वारी फळाला आली असून, आता मनपाला आगामी वर्षभरात स्वहिस्सा उभारण्याची तयारी करावी लागणार आहे. प्रशासक पांडेय यांनी स्मार्ट सिटीच्या कामांची माहिती कुणालकुमार यांना दिली. कुणालकुमार यांना महापालिकेची आर्थिक स्थिती कोरोनामुळे कोलमडल्याचे सांगितले. त्यावर त्यांनी मार्च २०२२ पर्यंत महापालिकेला स्वहिस्सा भरण्याची मुभा दिली व केंद्र सरकार स्मार्ट सिटीसाठीचा पुढील निधी देईल, असे कुणालकुमार यांनी स्पष्ट केले. त्यामुळे लवकरच निधी मिळेल, असा विश्वास प्रशासक पाण्डेय यांनी व्यक्त केला.

पाच वर्षांत एक हजार कोटींची कामेपाच वर्षांत एक हजार कोटींच्या प्रकल्पांचे कामे करण्याचे नियोजन स्मार्ट सिटी अभियानात करण्यात आले आहे. त्यातील पाचशे कोटी रुपये केंद्र सरकार तर उर्वरित २५० कोटी राज्य व २५० कोटी महापालिकेचा हिस्सा आहे. केंद्र व राज्य शासनाने पहिल्या दोन टप्प्यांचा निधी दिला पण महापालिकेने आपला २५० कोटी रुपयांचा हिस्सा भरलेला नाही. त्यामुळे दोन महिन्यांपूर्वी झालेल्या बैठकीत केंद्र सरकारचे उपसचिव कुणालकुमार यांनी महापालिकेला सूचित केले होते. 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाfundsनिधी