शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
4
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
5
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
6
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
7
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
8
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
9
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
10
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
11
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
12
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
13
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
14
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
15
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
16
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
17
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
18
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
19
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
20
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
Daily Top 2Weekly Top 5

जायकवाडी धरणात पाणी सोडा; शेतकऱ्यांनी पैठण- छत्रपती संभाजीनगर रोड केला बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2023 18:59 IST

मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी रस्ता रोको आंदोलनात भाग घेतला. 

पैठण: नाशिक व नगर जिल्ह्यातील धरण समुहातून जायकवाडी धरणात पाणी सोडून पैठण तालुका दुष्काळी घोषित करण्यात यावा या मागणीसाठी शुक्रवारी माजी नगराध्यक्ष दत्ता गोर्डे यांच्या नेतृत्वाखाली पैठण छत्रपती संभाजी नगर राष्ट्रीय मार्गावर शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केले.यावेळी जायकवाडी धरणात पाणी सोडण्यास विरोध करणाऱ्या नाशिक व अहमदनगर जिल्ह्यातील पुढाऱ्यांचा निषेध करण्यात आला. रास्तारोकोमुळे दोन तास वाहतूक ठप्प झाली होती.

जायकवाडी धरणात ४५ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. ऊर्ध्व भागातील म्हणजे नगर-नाशिक जिल्ह्यांतील धरण समूहात ७९ ते ८८ टक्के पाणीसाठा आहे. समन्यायी पाणीवाटप कायद्यानुसार १५ ऑक्टोबरला आढावा घेऊन जायकवाडी धरणाची तूट लक्षात घेता  गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक संतोष तिरमनवार यांनी ऊर्ध्व भागातील मुळा समूह, प्रवरा समूह, गंगापूर समूह आणि गोदावरी दारणा समूहातून एकूण ८.६०३ टीएमसी पाणी जायकवाडीत सोडण्याचे आदेश दिलेले आहेत. मात्र या आदेशास स्थगिती मिळावी म्हणून नाशिक अहमदनगर जिल्ह्यातील पुढारी न्यायालयात गेल्याने अद्याप पाणी सोडण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी झालेली नसल्याने मराठवाड्यात अस्वस्थता निर्माण झाली आहे. शुक्रवारी माजी नगराध्यक्ष दत्ता गोर्डे यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी रस्ता रोको आंदोलनात भाग घेतला. 

पैठण तालुका दुष्काळी घोषित करा, खेर्डा प्रकल्पात जायकवाडी धरणातून पाणी सोडा, उजव्या कालव्यातून पाणी सोडा, हिरडपुरी व आपेगाव बंधाऱ्यात पाणी सोडा आदी स्थानिक मागण्या दत्ता गोर्डे यांनी मांडल्या. आंदोलनात संत एकनाथ सचिन घायाळ शुगरचे चेअरमन सचिन घायाळ, अनिल घोडके, प्रल्हाद औटे,आबासाहेब मोरे, गोपिनाना गोर्डे, सुरेश दुबाले,आप्पासाहेब गायकवाड, बद्रीनारायण भुमरे भाऊसाहेब पिसे,   निवृत्ती बोबडे, चंद्रकांत झारगड, दिनेश पारीख, दिपक हजारे, अस्लम पठाण, निसार भाई, राजू बोबडे, सदाशिव नलावडे,  शिवाजी साबळे, उद्धव मापारी, विष्णूपंत नलावडे, किशोर काळे, मुनावर शेख, महादेव ठोके,  रऊफ शेख, कल्याण म्हस्के, रुषी उगले, बहादुर  शेख, शिवाजी लांडगे, कैलास मापारी, गणेश जगताप, अशोक  औटे, एकनाथ नवले, एकनाथ बेळगे, प्रकाश दिलवाले, बाळु  ढाकने,  शुभम गायकवाड, संजय सदावर्ते, राजू नवथर, आबासाहेब मगर, मार्तंड लीपाने यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी आंदोलनात सहभागी झाले होते. दोन तास चाललेल्या आंदोलनामुळे पैठण छत्रपती संभाजी नगर रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली होती. पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादJayakwadi Damजायकवाडी धरण