शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
3
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
4
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
5
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
6
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
7
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
8
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
9
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
10
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
11
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
12
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
13
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
14
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
15
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
16
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
17
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
18
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
19
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
20
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा

जायकवाडी धरणात पाणी सोडा; शेतकऱ्यांनी पैठण- छत्रपती संभाजीनगर रोड केला बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2023 18:59 IST

मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी रस्ता रोको आंदोलनात भाग घेतला. 

पैठण: नाशिक व नगर जिल्ह्यातील धरण समुहातून जायकवाडी धरणात पाणी सोडून पैठण तालुका दुष्काळी घोषित करण्यात यावा या मागणीसाठी शुक्रवारी माजी नगराध्यक्ष दत्ता गोर्डे यांच्या नेतृत्वाखाली पैठण छत्रपती संभाजी नगर राष्ट्रीय मार्गावर शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केले.यावेळी जायकवाडी धरणात पाणी सोडण्यास विरोध करणाऱ्या नाशिक व अहमदनगर जिल्ह्यातील पुढाऱ्यांचा निषेध करण्यात आला. रास्तारोकोमुळे दोन तास वाहतूक ठप्प झाली होती.

जायकवाडी धरणात ४५ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. ऊर्ध्व भागातील म्हणजे नगर-नाशिक जिल्ह्यांतील धरण समूहात ७९ ते ८८ टक्के पाणीसाठा आहे. समन्यायी पाणीवाटप कायद्यानुसार १५ ऑक्टोबरला आढावा घेऊन जायकवाडी धरणाची तूट लक्षात घेता  गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक संतोष तिरमनवार यांनी ऊर्ध्व भागातील मुळा समूह, प्रवरा समूह, गंगापूर समूह आणि गोदावरी दारणा समूहातून एकूण ८.६०३ टीएमसी पाणी जायकवाडीत सोडण्याचे आदेश दिलेले आहेत. मात्र या आदेशास स्थगिती मिळावी म्हणून नाशिक अहमदनगर जिल्ह्यातील पुढारी न्यायालयात गेल्याने अद्याप पाणी सोडण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी झालेली नसल्याने मराठवाड्यात अस्वस्थता निर्माण झाली आहे. शुक्रवारी माजी नगराध्यक्ष दत्ता गोर्डे यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी रस्ता रोको आंदोलनात भाग घेतला. 

पैठण तालुका दुष्काळी घोषित करा, खेर्डा प्रकल्पात जायकवाडी धरणातून पाणी सोडा, उजव्या कालव्यातून पाणी सोडा, हिरडपुरी व आपेगाव बंधाऱ्यात पाणी सोडा आदी स्थानिक मागण्या दत्ता गोर्डे यांनी मांडल्या. आंदोलनात संत एकनाथ सचिन घायाळ शुगरचे चेअरमन सचिन घायाळ, अनिल घोडके, प्रल्हाद औटे,आबासाहेब मोरे, गोपिनाना गोर्डे, सुरेश दुबाले,आप्पासाहेब गायकवाड, बद्रीनारायण भुमरे भाऊसाहेब पिसे,   निवृत्ती बोबडे, चंद्रकांत झारगड, दिनेश पारीख, दिपक हजारे, अस्लम पठाण, निसार भाई, राजू बोबडे, सदाशिव नलावडे,  शिवाजी साबळे, उद्धव मापारी, विष्णूपंत नलावडे, किशोर काळे, मुनावर शेख, महादेव ठोके,  रऊफ शेख, कल्याण म्हस्के, रुषी उगले, बहादुर  शेख, शिवाजी लांडगे, कैलास मापारी, गणेश जगताप, अशोक  औटे, एकनाथ नवले, एकनाथ बेळगे, प्रकाश दिलवाले, बाळु  ढाकने,  शुभम गायकवाड, संजय सदावर्ते, राजू नवथर, आबासाहेब मगर, मार्तंड लीपाने यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी आंदोलनात सहभागी झाले होते. दोन तास चाललेल्या आंदोलनामुळे पैठण छत्रपती संभाजी नगर रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली होती. पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादJayakwadi Damजायकवाडी धरण