शहरं
Join us  
Trending Stories
1
मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
2
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
3
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
4
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
5
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
6
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
7
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
8
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
9
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
10
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
11
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
12
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
13
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
14
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
15
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
16
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
17
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेला; रस्त्यावर पडताच कारने चिरडले
18
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
19
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
20
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार

दबाव झुगारून समितीने केली विद्यापीठ कुलसचिवांची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2020 18:26 IST

कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीचा निर्णय

ठळक मुद्देतीनही संवैधानिक पदांचा कार्यकाळ पाच वर्षांचा अधिष्ठातांचा कार्यकाळ विद्यमान कुलगुरूंचा कार्यकाळ अथवा किमान साडेतीन वर्षे

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने बहुप्रतीक्षित तीन संवैधानिक पदे व चार अधिष्ठातांची निवड केली. कुलसचिवपदी डॉ. जयश्री सूर्यवंशी, विद्यापीठ उपपरिसर संचालकपदी डॉ. दत्तात्रय गायकवाड, तर परीक्षा मंडळ संचालकपदी डॉ. योगेश पाटील या तिघांची निवड करण्यात आली आहे. निवड करताना समितीने कोणत्याही गटातटाच्या हस्तक्षेपाला थारा दिला नाही, हे विशेष!

यासंदर्भात पत्रकार परिषदेत कुलगुरू डॉ. येवले यांनी सांगितले की, वेगवेगळ्या कारणांमुळे मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली कुलसचिव, परीक्षा मंडळ संचालक, उस्मानाबाद येथील विद्यापीठ उपपरिसरासाठी संचालक तसेच वाणिज्य व व्यवस्थापनशास्त्र, आंतरविद्याशाखा, विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्याशाखा आणि मानवविद्या व सामाजिकशास्त्रे विद्याशाखांच्या अधिष्ठांची निवड प्रक्रिया नुकतीच पार पडली. पात्र उमेदवारांच्या मुलाखती दि.७, १४ आणि १५ मार्च रोजी निवड समितीने घेतल्या. विद्यापीठ प्रशासनाने सदर प्रक्रिया अत्यंत पारदर्शकरीतीने पार पाडली.

आस्थापना विभागाचे उपकुलसचिव दिलीप भरड व सहकाऱ्यांनी यासाठी प्रयत्न केले. आंतरविद्याशाखेच्या अधिष्ठातापदासाठी ७ अर्ज आले होते. ५ उमेदवारांनी मुलाखती दिल्या. या पदासाठी शिवाजी विद्यापीठातील डॉ. चेतना सोनकांबळे यांची निवड झाली. वाणिज्य व व्यवस्थापनशास्त्राच्या अधिष्ठातापदासाठी ५ अर्ज आले होते. या पदासाठी डॉ. वाल्मीक सरवदे यांची निवड झाली. मानवविद्या व सामाजिकशास्त्रे विभागाच्या अधिष्ठातापदासाठी डॉ. प्रशांत अमृतकर यांची, तर विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्याशाखेसाठी डॉ. भालचंद्र वायकर यांची निवड करण्यात आली.  कुलगुरूंच्या अध्यक्षतेखालील निवड समितीमध्ये राज्यपालांचे सदस्य किशोर शितोळे, व्यवस्थापन परिषदेचे एक सदस्य, प्रकुलगुरू आदींचा समावेश होता.

तीनही पदांचा कार्यकाळ पाच वर्षांचा राहणारकुलसचिवपदासाठी प्राप्त ३९ अर्जदारांपैकी १८ जणांनी मुलाखत दिली. यामध्ये डॉ. जयश्री सूर्यवंशी यांची निवड झाली. परीक्षा मंडळाच्या संचालकपदी लोणेरे येथील ‘बार्टी’चे परीक्षा नियंत्रक योगेश पाटील आणि उस्मानाबाद विद्यापीठ परिसराच्या संचालकपदी डॉ. दत्तात्रय गायकवाड यांची निवड करण्यात आली. या तीनही संवैधानिक पदांचा कार्यकाळ पाच वर्षांचा असेल, तर अधिष्ठातांचा कार्यकाळ विद्यमान कुलगुरूंचा कार्यकाळ अथवा किमान साडेतीन वर्षे राहील.  

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादEducation Sectorशिक्षण क्षेत्रEducationशिक्षणProfessorप्राध्यापक