शहरं
Join us  
Trending Stories
1
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
2
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
3
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
4
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
5
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
6
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
7
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
8
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
9
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
10
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
11
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
12
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
13
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
14
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
15
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
16
घ्या पैसे, करा पेरणी; राज्याचा कृषी कर्ज टक्का वाढला!
17
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
18
विशेष लेख: महापालिकेचा कारभारही हायकोर्टानेच करायचा का..?
19
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
20
विशेष लेख: अकरावी प्रवेशात शिक्षण विभाग नापास!

टँकरचा आकडा कमी; पण टंचाईच्या झळा वाढल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2018 00:35 IST

मराठवाड्यात यंदा मागील पाच वर्षांच्या तुलनेत टँकरचा आकडा कमी असला तरी टंचाईच्या झळा मात्र वाढू लागल्या आहेत. पावसाळा सुरू होण्यासाठी दीड महिन्याचा कालावधी शिल्लक आहे.

ठळक मुद्देमराठवाड्यात वणवण : जलयुक्त शिवार, शेततळी, विहिरींच्या अधिग्रहणाकडे प्रशासनाचा कल

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : मराठवाड्यात यंदा मागील पाच वर्षांच्या तुलनेत टँकरचा आकडा कमी असला तरी टंचाईच्या झळा मात्र वाढू लागल्या आहेत. पावसाळा सुरू होण्यासाठी दीड महिन्याचा कालावधी शिल्लक आहे. तोपर्यंत ग्रामीण भागाला टँकरने पिण्याचा पाणीपुरवठा करावा लागणार आहे. तीन जिल्ह्यांत पाणीटंचाईची परिस्थिती नाजूक वळणावर आहे.विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी बुधवारी मराठवाड्यातील जलयुक्त शिवार योजना, टँकरने पाणीपुरवठा, शेततळे, प्रकल्पांतील पाणीसाठा, विहिरींचे अधिग्रहण याबाबत माहिती दिली. आयुक्त डॉ. भापकर म्हणाले, मराठवाड्यात लहान-मोठे व मध्यम ८६७ प्रकल्प आहेत. २३ टक्के पाणीसाठा आहे. ११ मोठी धरणे आहेत. जायकवाडीत ४५ टक्के पाणीसाठा आहे. उर्वरित प्रकल्पांमध्ये २६ टक्के पाणी आहे. ४७२ टँकर विभागात सुरू आहेत. त्यात औरंगाबादेत सर्वाधिक टँकर सुरू आहेत. परभणी, नांदेडमध्येही टँकर सुरू आहेत. विहिरींचे अधिग्रहण करावे लागले आहे. जास्तीत जास्त विहिरी औरंगाबाद व नांदेड जिल्ह्यात आहेत. पाच वर्षांतील स्थिती पाहिली तर यावर्षी सर्वाधिक कमी टँकर आहेत.११ प्रकल्पांवर मोठी शहरेअवलंबून आहेत. एमआयडीसी व प्रादेशिक योजनांना यातून पाणीपुरवठा होतो आहे. यावर्षी आराखडा तीन टप्प्यांत केला होता. दर तीन महिन्यांसाठी आराखडा होता. एप्रिल ते जून या कालावधीसाठी केलेल्या आराखड्यासाठी काही योजनांचा अंतर्भाव केला आहे.गेल्या वर्षी विभागात ८६ टक्के पाऊस झाला. औरंगाबाद, नांदेड, जालना जिल्ह्यांत पाऊस कमी झाला. चार ते पाच वर्षांच्या तुलनेत यंदा टँकरची संख्या कमी आहे. जलयुक्त शिवार योजनेचाही फायदा झाला आहे. जायकवाडी भरल्यामुळे टंचाई कमी झाली आहे.

टॅग्स :water transportजलवाहतूकMarathwadaमराठवाडा