शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

९७ हजार बेशिस्त वाहनचालकांकडून तीन कोटींचा दंड वसूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2018 21:37 IST

वाहतूक नियमन करता करता शहर पोलिसांनी वर्षभरात तब्बल ९७ हजार वाहनचालकांना नियम मोडताना पकडले. या चालकांकडून ३ कोटी २४ लाख ६७ हजार ४७२ रुपये दंड वसूल करण्यात आला.

औरंगाबाद : वाहतूक नियमन करता करता शहर पोलिसांनी वर्षभरात तब्बल ९७ हजार वाहनचालकांना नियम मोडताना पकडले. या चालकांकडून ३ कोटी २४ लाख ६७ हजार ४७२ रुपये दंड वसूल करण्यात आला.

पोलीस आयुक्तालय हद्दीतील वाहतूक नियमन करण्यासाठी स्वतंत्र वाहतूक विभाग कार्यरत आहे. या वाहतूक विभागांतर्गत शहर शाखा एक आणि शाखा दोन सोबतच, सिडको, छावणी आणि वाळूज, अशा एकूण पाच शाखेत ३५० पोलीस कार्यरत आहे. वाहतूक नियम मोडून वाहने चालविणाऱ्यांविरोधात पोलिसांकडून दंडात्मक कारवाई केली जाते.

जानेवारी ते डिसेंबर या कालावधीत शहर पोलिसांनी नियम मोडणाºया ९७ हजार ४७२ बेशिस्त वाहनचालकांना पकडले. यात परवान्याचे उल्लंघन करणे, राँग पार्किंग करणे, स्टॅण्ड सोडून वाहन उभे करणे, रिक्षात चालकाशेजारी प्रवासी बसविणे, क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी बसवून वाहने चालविणे. विनासीटबेल्ट कार चालविणे, ट्रीपल सीट दुचाकी पळविणे, विनालायसन्स वाहन चालविणे, विनानोंदणी वाहन चालविणे, वाहन चालविताना मोबाईलवर बोलणे, आरटीओच्या परवानगीशिवाय वाहनांत बदल करणे, फिटनेस प्रमाणपत्र नसलेले वाहन चालविणे, वाहनांवर फॅन्सी आणि अस्पष्ट नंबर टाकणे, विनागणवेश टॅक्सी चालविणे, यासह मोटार वाहन कायदा आणि मुंबई पोलीस कायद्याच्या विविध कलमांचे उल्लंघन करणाºया वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली.

‘नो एंट्री’त पकडले सर्वाधिक वाहनचालकजड वाहनांना शहरात प्रवेश मनाई आहे. याशिवाय बायपासवरील अपघात टाळण्यासाठी सकाळी ८ ते ११ आणि सायंकाळी ५ ते रात्री ९ पर्यंत जड वाहनांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. या नियमांचे उल्लंघन करताना सर्वाधिक २९ हजार ७५५ वाहनचालकांना पकडण्यात आले. या वाहनचालकांकडून ६६ लाख ६१ हजार ७०० रुपये दंड वसूल करण्यात आला. भरधाव वेगाने वाहने पळविणाºया पावणेदोनशे वाहनचालकांना पोलिसांनी पकडले.

अकराशे मद्यपी वाहनचालक ांवर कारवाईदारू पिऊन वाहन चालविल्यामुळे अपघाताचा धोका वाढतो, ही बाब लक्षात घेऊन वर्षभरात अकराशे मद्यपी वाहनचालकांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती वाहतूक विभागाचे सहायक आयुक्त डॉ. एच. एस. भापकर यांनी दिली. ते म्हणाले की, मद्यपी वाहनचालकांकडून २५ लाख २९ हजार ९०० रुपये दंड भरून घेण्यात आला.

४ हजार ८३४ दुचाकीस्वारांना पकडले विनाहेल्मेट४ हजार ८३४ जणांना विनाहेल्मेट दुचाकी चालविताना तर ९ हजार ४६१ जणांना सीटबेल्टविना कार चालविताना पकडून दंड वसूल केला.

 

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादtraffic policeवाहतूक पोलीस