शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

बदलीसाठी दिलेल्या पैशांची तलाठ्यांकडून वसुली; फेरफार अडवून ठेवत घेतली लाच 

By विकास राऊत | Updated: September 28, 2024 18:39 IST

लाचखोरीच्या सापळ्यात अडकला तलाठी

छत्रपती संभाजीनगर : जिल्हा प्रशासनाने गेल्या महिन्यात केलेल्या तलाठी बदल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात अर्थकारण झाले. दरम्यान, बदलीसाठी दिलेली रक्कम वसूल करण्यासाठी तलाठ्यांनी आता सामान्यांच्या खिशात हात घालण्यास सुरुवात केली आहे. फेरफार अडवून ठेवत लाखो रुपयांची मागणी केल्यामुळे सातारा-देवळाईचे तलाठी दिलीप जाधव याला लाच घेताना एसीबी पथकाने पकडले. यातून तलाठी बदल्यांसाठी झालेला लिलाव स्पष्ट होत आहे.

‘पैसे कमवायचे असतील, तर पैसे द्यावेच लागतील’, या वृत्तीने तलाठी बदलीत मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल झाली. ती रक्कम वसूल करण्यासाठी काही तलाठी सरसावल्याचे दिसत आहेत. बदलीनंतर तलाठ्यांच्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये उफाळून आलेला वाद ‘लोकमत’ने चव्हाट्यावर आणला होता.

बदल्यानंतर तलाठ्यांच्या सोशल मीडिया ग्रुपमध्ये मर्जीतील ठिकाण मिळण्यासाठी ३ ते १२ लाख रुपयांपर्यंतची रक्कम मोजल्याची चर्चा होती. ही रक्कम कुणी-कुणाला दिली आणि कुणी-कुणाकडून घेतली, यावरून बदल्यांच्या प्रक्रियेत असलेले वरिष्ठ अधिकारी संशयाच्या भोवऱ्यात सापडले. शासनाने बदल्यांसाठी घालून दिलेल्या निकषाची पायमल्ली झाली. याप्रकरणात चौकशी सुरू असून अहवाल आल्यानंतरच किती आर्थिक उलाढाल, हे समोर येईल.

महिनाभरातच ती भीती ठरली खरीमर्जीतील सज्जा मिळण्यासाठी ३ ते १२ लाख एवढी रक्कम देणाऱ्या तलाठ्यांनी ती पगारातून दिली असेल का? उदाहरण म्हणून एका सज्जा-मंडळसाठी तीन वर्षांसाठी १२ लाख दिले. म्हणजे वर्षाला ४ लाख याप्रमाणे महिना ३० ते ३५ हजार वरकमाई करावीच लागणार, हे स्पष्ट आहे. हे ३० ते ३५ हजार सामान्य लोकांच्या खिशातूनच घेतले जाणार, हे निश्चित आहे. या चक्रव्यूहात तलाठी अँटी करप्शनच्या जाळ्यात अडकून बदनाम होईल, अशी भीती तलाठ्यांच्या व्हाॅट्सॲप ग्रुपमध्ये होती. त्यानंतरच महिनाभरातच तलाठी जाधव अँटी करप्शनच्या जाळ्यात अडकला.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAnti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभाग