शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवजी, तुम्हाला सत्तेत येण्याचा स्कोप; फडणवीस यांची ‘ऑफर’, विधानभवनात रंगली जोरदार टोलेबाजी
2
आजचे राशीभविष्य, १७ जुलै २०२५: आजचा दिवस अत्यंत लाभदायी, नोकरीत यश मिळेल
3
देशातील १०० जिल्ह्यांमध्ये १.७ कोटी शेतकरी आता होणार अधिक सक्षम 
4
राज्यातील पक्षांमध्ये तब्बल १६० ‘आघाडी’ अन् ४० ‘सेना’; राज्य निवडणूक आयोगाकडे ४२३ नोंदणीकृत पक्ष
5
बेपत्ता ६,३२४ महिला, बालकांचा महिनाभरात शोध; मुख्यमंत्री फडणवीस यांची विधान परिषदेत माहिती
6
अकबर ‘सहिष्णू’ तर औरंगजेब ‘मंदिर पाडणारा...’; आठवीच्या पाठ्यपुस्तकात एनसीईआरटीकडून उल्लेख
7
भारतात सापडले कच्चे तेल, छाेटे राज्य हाेणार मालामाल
8
इस्रायली उद्योजकापासून दोन मुली; पतीला न सांगता महिला गोव्यातून गेली गुहेत राहायला
9
अधिवेशन गाजणार? विरोधक करणार कोंडी; काँग्रेससह विरोधी पक्षांकडून मुद्द्यांची जुळवाजुळव सुरू
10
जुनी शस्त्रे वापरून भारताला आधुनिक युद्धे जिंकणे अवघड; सीडीएस जनरल अनिल चौहान यांचे परखड मत
11
इलेक्ट्रिक कारच्या विक्रीत २१ पट वाढ; चार्जिंग स्टेशनही तीन वर्षांत ५ पट वाढले
12
काैटुंबिक कलहातून होतेय कोवळ्या मुलांची हाेरपळ; बदलापुरात मुलीचे अपहरण; मुंब्य्रात आईच बनली क्रूर
13
रस्ते अपघातांच्या मुळाशी पोलिस का जात नाहीत? वाहनचालकच का ठरतात गुन्हेगार?
14
दोस्त दोस्त ना रहा..!   भांडणातून घेतला जीव 
15
तरुणांभोवती ऑनलाइन गेमचा फास; टार्गेट पूर्ण न झाल्याने दाेघांची आत्महत्या
16
खासदारांना 'हेल्दी मेन्यू'द्वारे मिळणार 'ताकद'!
17
“CM फडणवीस रामासारखे चारित्र्यवान, कृष्णासारखे चतूर”; भाजपा आमदारांकडून कौतुकाचा वर्षाव
18
CM देवेंद्र फडणवीसांच्या ऑफरवर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले...
19
“वयाच्या १० वर्षापासून RSSशी संबंध, मी पुन्हा येईन, पण कुठून येईन ते विचारू नका”: दानवे
20
Budget Cars: कुटुंबासाठी कमी बजेटमध्ये ७-सीटर कार शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन! 

जिल्ह्यात गव्हाचे विक्रमी उत्पादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:04 IST

औरंगाबाद : यंदा जिल्ह्यात दहा वर्षांनंतर प्रथमच गव्हाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात झाले. यामुळे मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थानमधून शहरात ...

औरंगाबाद : यंदा जिल्ह्यात दहा वर्षांनंतर प्रथमच गव्हाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात झाले. यामुळे मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थानमधून शहरात येणाऱ्या गव्हाला थोडा ब्रेक लागला आहे, तर नवीन ज्वारी काळसर पडल्याने भाव उतरले आहेत.

गतवर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडला. भूजलपातळी वाढली. थंडीही चांगली पडली होती. या पोषक वातावरणामुळे यंदा जिल्ह्यात गव्हाचे उत्पादन शेतकऱ्यांच्या हाती लागले. मागील दहा वर्षांत प्रथमच जिल्ह्यातील गहू मोठ्या प्रमाणात जाधववाडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत विक्रीला येत आहे. नेवासा, प्रवरासंगम, घोडेगाव, लासूर स्टेशन, वैजापूर, फुलंब्री, सिल्लोड, खुलताबाद या भागातून दररोज हजार क्विंटल गव्हाची आवक झाली. स्थानिक गहू न निवडलेला १८०० ते २००० रुपये, तर निवडलेला गहू २१०० ते २२५० रुपये प्रतिक्विंटल विक्री झाला.

याकाळात मध्य प्रदेश, गुजरात व राजस्थान या राज्यातून दररोज पाच हजारपेक्षा अधिक गहू बाजारात विक्रीला येत असे. पण स्थानिक गव्हाची आवक वाढल्याने व्यापारी परराज्यातील गहू कमी प्रमाणात मागवीत आहे. मागील आठवड्यात दररोज अडीच ते तीन हजार क्विंटल गहू परराज्यातून आला. २१०० ते २४०० रुपये प्रतिक्विंटल विक्री करण्यात येत होता.

ज्वारीला फटका

अवकाळी पावसाचा यंदा ज्वारीला मोठा फटका बसला आहे. नवीन ज्वारी काळपट पडली आहे. त्यात मागणी घटल्याने भाव क्विंटलमागे ५०० ते ७०० रुपयांनी कमी झाले आहेत. मागील आठवड्यात १२०० ते ३५०० रुपये प्रतिक्विंटल ज्वारी विकली जात होती.

चौकट

भाजीपाला, आडत बाजार बंदचा आवकेवर परिणाम

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कृषी उत्पन्न बाजार समितीमधील फळ, भाजीपाल्याचा आडत बाजार ११ मार्चपासून बंद ठेवला आहे. त्याचा परिणाम शहरातील अन्य भाजी मंडईवर दिसून आला. विक्रेत्यांकडे तुरळक भाज्या असल्याचे आढळून आले. लिंबाचे भाव ४० ते ५० रुपयांनी वधारून १०० ते १२० रुपये प्रतिकिलोपर्यंत विक्री झाले.

चौकट

भाजीपाला ८ मार्च १४ मार्च

लिंबू ६०-८० रु. १००-१२० रु.

टोमॅटो ३०-४० रु. ३०-४० रु.

पत्ताकोबी ३०-४० रु. ३०-४० रु.

हिरवी मिरची ६०-८० रु. ६०-८० रु.

-------

धान्य

गहू (स्थानिक) १८-२३ रु. १८-२३ रु.

गहू (परराज्य) २१-२४ रु. २१-२४ रु.

ज्वारी १७-३५ रु. १२-३५ रु.

----

लॉकडाऊनमुळे अडचण

आडत बाजार सात दिवस बंद ठेवल्याने व रस्त्यावरही भाज्या विक्री करू देत नसल्याने त्याचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. विक्रीविना भाजीपाला खराब होत आहे.

अजय चव्हाण, शेतकरी

---

वर्षी धान्य खरेदीची तयारी

मार्च महिना लागला की, वार्षिक धान्य खरेदीचे वेध लागतात. मागील वर्षी अतिपावसामुळे धान्याला लवकर कीड लागली होती.

रागिणी टाकळकर, गृहिणी