शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा ट्विस्ट...! 'ॲक्सिस माय इंडिया'कडून पश्चिम बंगालचा एक्झिट पोल जाहीर करण्यास नकार, अंदाजच येईना...
2
सोन्याच्या दराबाबत वर्ल्ड बँकेची मोठी भविष्यवाणी! २०२६ मध्ये अमाप वाढणार, पण २०२७ मध्ये धडाधड...
3
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
4
'राजा शिवाजी'तील वाघनखं, चंद्रकोर, पेहेरावावरून सोशल मीडियावर उलटसुलट चर्चा! पण रितेशने 'या' गोष्टींमध्ये बाजी मारली...
5
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
6
अमेरिकन नौदलावर इराणचा मोठा 'सायबर स्ट्राईक'! २,३७९ सैनिकांचा सीक्रेट डेटा लीक
7
"एकनाथ शिंदेंनी हुल दिली अन् उद्धव ठाकरे..."; विधान परिषदेवरुन ज्योती वाघमारेंनी उडवली खिल्ली
8
MI vs SRH: मुंबई इंडियन्सच्या लाजिरवाण्या पराभवानंतर नीता अंबानी, आकाश अंबानींचा चेहराच पडला
9
ज्या बॉलरचं नाव ऐकून भल्याभल्यांना फुटतो घाम, त्यालाच मारला 'नो लूक सिक्स'; सलील आरोराचा व्हिडीओ व्हायरल?
10
“सॉरी जिया... मम्माला मरावंच लागेल”, महिलेची आत्महत्या; स्मशानभूमीत आला धडकी भरवणारा Video कॉल
11
Bank Holidays in May: मे महिन्यात १३ दिवस बँका राहणार बंद; कोणत्या राज्यात केव्हा असेल सुट्टी?
12
बागेत प्रियकरासोबत रोमान्स करत होती २ मुलांची आई, गावकऱ्यांनी दोघांना पाहिलं अन् पुढे असं काही केलं...
13
Buddha Purnima 2026 Wishes: बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा बुद्ध जयंती!
14
तिढा सुटला, विधान परिषद निवडणुकीतून काँग्रेसची माघार, अंबादास दानवे असतील मविआचे उमेदवार
15
महायुती-महाविकास आघाडीचे ठरले; पाहा, विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी संपूर्ण उमेदवारांची यादी
16
Vastu Shastra: प्रगतीचे मार्ग मोकळे करायचे आहेत? मग तुमच्या घरातील 'हे' वास्तू दोष त्वरित दूर करा!
17
पश्चिम बंगालमध्ये भल्या भल्यांना कोडे सुटेना! ५१ लाख मतदार घटले तरी ३० लाख मते वाढली; ९३% मतदानाचा रेकॉर्ड कोणाचे टेन्शन वाढवणार?
18
"माझ्यावर हसतोय?" कुर्ल्यात तरुणावर चाकूनं सपासप वार, भररस्त्यात घडलेल्या घटनेनं खळबळ!
19
पुतिन-ट्रम्प यांची फोनवर चर्चा; युरेनियम रशियाला देण्याची ऑफर अमेरिकेने नाकारली! इराणचं टेन्शन वाढलं
20
अमेरिकेने भारताला परत केल्या ६५७ प्राचीन मूर्ती, अमूल्य ठेव्याची एवढी आहे किंमत 
Daily Top 2Weekly Top 5

रेशन कार्डांचेही आता आधार लिंक

By admin | Updated: January 20, 2015 01:28 IST

औरंगाबाद : केंद्र सरकारच्या आदेशानुसार जिल्ह्यात गॅस कनेक्शननंतर आता रेशन कार्डांचे आधारशी लिंक करण्याचे सुरू झाले आहे.

औरंगाबाद : केंद्र सरकारच्या आदेशानुसार जिल्ह्यात गॅस कनेक्शननंतर आता रेशन कार्डांचे आधारशी लिंक करण्याचे सुरू झाले आहे. सर्व रेशन कार्डधारकांकडून त्यांचे आधार कार्ड क्रमांक आणि बँक खाते क्रमांक घेऊन ते रेशन कार्डशी लिंक केले जाणार आहेत. त्यासाठी रेशन दुकानदारांकडे अर्ज उपलब्ध करून देण्यात आले असल्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी संजीव जाधवर यांनी सांगितले. राज्य सरकारने निराधार लोकांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजना ‘आधार’ कार्डबरोबर लिंक केल्या आहेत. त्यामुळे लाभार्थीचे पैसे थेट त्यांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. केंद्र शासनाच्या इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी विधवा निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्ती वेतन योजना, श्रावणबाळ योजनांच्या लाभार्थ्यांचे आधार लिंक करण्यात आले आहेत. याशिवाय जिल्ह्यात गॅस कनेक्शनही आधारशी लिंक करण्याची मोहीम राबविण्यात आली. आता शासनाने रेशन कार्डही आधार कार्डांशी लिंक करण्याचा निर्णय घेतला आहे. या मोहिमेमुळे बोगस रेशन कार्डांना आळा बसणार आहे. जिल्ह्यातील रेशन कार्डांचे डिजिटायझेशन करण्याचे काम नुकतेच पूर्ण झाले. त्यामुळे आता रेशन कार्डधारकांकडून त्यांचे आधार कार्ड क्रमांक आणि बँक खाते क्रमांक घेऊन ते रेशन कार्डशी संलग्न केले जाणार आहेत. जिल्ह्यातील सर्व १७१७ रेशन दुकान चालकांना त्यासाठी अर्ज उपलब्ध करून देण्यात आले आहेत. सर्वच प्रकारचे रेशन कार्ड आधार कार्डांशी लिंक केले जाणार आहेत. त्यासाठी दारिद्र्यरेषेखालील (बीपीएल) कार्डधारकांना प्रत्येकी शंभर रुपयांचे प्रोत्साहन अनुदान देण्यात येणार आहे. ४सर्व कार्डधारकांना त्यांच्या रेशन दुकानांवर आधार आणि बँक खाते क्रमांक द्यावयाचा आहे. हे काम करण्यासाठी लाभार्थ्यांचा वेळ जाणार आहे. ४परिणामी गरीब लाभार्थ्यांची त्या दिवसाची मजुरी बुडणार आहे. म्हणून शासनाकडून हे शंभर रुपयांचे अनुदान प्रोत्साहन भत्ता म्हणून त्याला दिले जाणार आहे, असे जिल्हा पुरवठा अधिकारी संजीव जाधवर यांनी सांगितले. ४जिल्ह्यात बीपीएलचे एकूण १ लाख ५७ हजार कार्ड असून, त्यांच्या लाभार्थ्यांची संख्या १० लाख ७ हजार इतकी आहे.