शहरं
Join us  
Trending Stories
1
..तर महाराष्ट्रात एक नवीन 'खिचडी' पकेल! एकत्र राहण्यासाठी वरून खूपच दबाव आला तर बंडखोरीचे पेव फुटेल
2
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
3
आजचे राशीभविष्य, 19 सप्टेंबर 2025: धनलाभ होण्याचा योग; कोणत्या राशींसाठी आजचा दिवस आनंदाचा?
4
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
5
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
6
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली
7
ओला उबरचे भाडे प्रति किमी २२.७२ रुपये, मागणीच्या वेळेत १.५ पट वाढ करण्यास परवानगी
8
गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात ५५ हजार किलो गांजा जप्त; सिंथेटिक अमली पदार्थांच्या तस्करीत ६ पटीने वाढ; 'एनसीबी'चा अहवाल
9
रविवारी 'खंडग्रास' पाहण्यावर लागणार 'ग्रहण'; दा. कृ. सोमण यांचे मत; भारतीयांची होणार निराशा
10
'महापालिका निवडणुकीत महायुतीचाच झेंडा फडकणार': एकनाथ शिंदे
11
आधीच प्लॅन ठरला होता, आंतरवालीतील दगडफेकीमागे पवारांचे आमदार; छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट
12
ट्रम्प यांचा भारताला टॅरिफनंतर आणखी एक मोठा झटका, टेन्शन वाढणार! आता काय करणार मोदी सरकार?
13
Asia Cup 2025 स्पर्धेतील Super Four चं चित्र स्पष्ट! भारत-पाकसह कोण कुणाविरुद्ध अन् कधी भिडणार? जाणून घ्या सविस्तर
14
“राहुल गांधी हे सीरियल लायर, हायड्रोजनचं सोडा, लवंगी फटाकाही फोडू शकले नाहीत”: CM फडणवीस
15
Asia Cup 2025 : 'जानी दुश्मन' असलेल्या बांगलादेशच्या मदतीला धावला श्रीलंका; अफगाणिस्तानचा खेळ खल्लास!
16
Hindenberg प्रकरणात ‘सेबी’ची Adani समूहाला क्लीन चिट; गौतम अदानी म्हणाले, “सत्यमेव जयते...”
17
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
18
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
19
"युक्रेन युद्ध थांबवणे सर्वात सोपे वाटत होते, पण पुतिन..."; ट्रम्प यांची रशियन राष्ट्राध्यक्षांवर थेट टीका, स्पष्टच बोलले
20
Best Catch In T20I : परेरानं घेतलेला झेल भारीच! पण सूर्या दादाला तोड नाय! कारण....(VIDEO)

औरंगाबादच्या प्रवेशद्वारावर खड्ड्यांची रांगोळी; कॅंब्रिज चौकाजवळ वाहनचालकांची कसरत, रुग्णांचे हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2021 14:03 IST

Aurangabad Pothole पर्यटनाची राजधानी असलेल्या औरंगाबाद शहरात मराठवाडा, विदर्भातून​ येणाऱ्या पर्यटकांचे शहरात प्रवेश करतात खड्ड्यांच्या रांगोळीने स्वागत होत आहे.

ठळक मुद्देमागील सहा महिन्यांपासून तब्बल दीड किमीच्या मार्गावर खड्डेच खड्डे दिसत आहेतखड्डा चुकविण्याच्या प्रयत्नात अनेक अपघात होत असल्याने वाहनचालक त्रस्त आहेत

-  श्रीकांत पोफळे

करमाड : मराठवाड्यासह महाराष्ट्रातं यंदा पावसाने जोरदार हजेरी लावली, पावसाचे​प्रमाण यावर्षी ​जास्त असल्याने मुख्य महामार्गासह गावखेड्यातील रस्त्याची पूर्णपणे चाळणी झाली आहे. औरंगाबाद-जालना या मुख्य​महामार्गावरही​ राजमाता जिजाऊ चौक कॅंब्रिज स्कूल ते चिकलठाणापर्यंत गेल्या सहा महिन्यापासून​ खड्डेचखड्डे पडल्याने रस्त्याची चाळणी झाली आहे. सलग ६ महिने रस्ता खराब असल्याची 10 वर्षांत पहिलीच वेळ असल्याची रोज प्रवास करणारे त्रस्त प्रवासी सांगत आहे. प्रवासी आणि रुग्णांना याचा त्रास होत असूनही संबंधित विभागाचे अधिकारी सुस्त असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

पर्यटनाची राजधानी असलेल्या औरंगाबाद शहरात मराठवाडा, विदर्भातून​ येणाऱ्या पर्यटकांचे शहरात प्रवेश करतात खड्ड्यांच्या रांगोळीने स्वागत होतं आहे. महामार्गावर​ मोठमोठ्या खड्ड्यांमुळे रस्त्याची​मोठी दुरवस्था झाली आहे. कॅंब्रिज शाळा ते चिकलठाणा​ हा रस्ता धोकादायक बनला आहे. हा रस्ता शहरात येणारा​मुख्य रस्ता व​ महामार्ग असूनही याच्या दुरुस्तीकडे​संबंधित विभागाचे​दुर्लक्ष होत आहे. खड्ड्यांमुळे महामार्गावर रोज छोटे मोठे अपघात होत आहेत. यामुळे जिव मुठीत धरून दोन तीन किलोमीटर अंतर पार करावे लागत असून अनेकांना अपंगत्वाला सामोरे जावे लागतं आहे. काही दिवसांपूर्वीचं खड्डा वाचविण्याच्या प्रयत्नात एका बाईकस्वाराचा अपघात होऊन जीव गमवावा लागला होता. प्रवासी, रुग्ण आणि वाहनचालक त्रस्त असूनही या मार्गाच्या दुरुस्तीसाठी संबंधित विभाग गेल्या सहा महिन्यापासून झोपेचं सोंग घेत गप्प असल्याचा संताप नागरिकांनी व्यक्त केला आहे .

जवळपास दीड किलोमीटरचा रस्ता अत्यंत खराब आहे. खड्यांमुळे प्रचंड मनस्ताप होत असून वाहनांचेही नुकसान होत आहे. वयस्कर मंडळींना मणक्याचे त्रास उद्भवत आहेत. संबंधित विभागाने थोडी शरम वाटू द्यावी व तात्काळ रस्ता दुरुस्ती करावी. - रवी शिरसाठ, रहिवासी, सुंदरवाडी.

अपघाताच्या भीतीने कमी वेगात गाडी चालवावी लागते. त्यामुळे या मार्गावर सतत वाहनकोंडी होत आहे. यामुळे प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे.- बद्री शिंदे, हॉटेल चालक, झाल्टा

टॅग्स :AurangabadऔरंगाबादPotholeखड्डे