शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
3
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
4
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
5
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
6
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
7
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
8
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
9
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
10
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
11
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
12
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
13
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
14
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
15
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
16
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
17
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
18
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
19
पंचक २०२५: सावधान! २४ ते २९ डिसेंबर दरम्यान 'पंचक' काळ; 'या' ७ राशींनी राहावे अधिक सतर्क!
20
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादच्या प्रवेशद्वारावर खड्ड्यांची रांगोळी; कॅंब्रिज चौकाजवळ वाहनचालकांची कसरत, रुग्णांचे हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2021 14:03 IST

Aurangabad Pothole पर्यटनाची राजधानी असलेल्या औरंगाबाद शहरात मराठवाडा, विदर्भातून​ येणाऱ्या पर्यटकांचे शहरात प्रवेश करतात खड्ड्यांच्या रांगोळीने स्वागत होत आहे.

ठळक मुद्देमागील सहा महिन्यांपासून तब्बल दीड किमीच्या मार्गावर खड्डेच खड्डे दिसत आहेतखड्डा चुकविण्याच्या प्रयत्नात अनेक अपघात होत असल्याने वाहनचालक त्रस्त आहेत

-  श्रीकांत पोफळे

करमाड : मराठवाड्यासह महाराष्ट्रातं यंदा पावसाने जोरदार हजेरी लावली, पावसाचे​प्रमाण यावर्षी ​जास्त असल्याने मुख्य महामार्गासह गावखेड्यातील रस्त्याची पूर्णपणे चाळणी झाली आहे. औरंगाबाद-जालना या मुख्य​महामार्गावरही​ राजमाता जिजाऊ चौक कॅंब्रिज स्कूल ते चिकलठाणापर्यंत गेल्या सहा महिन्यापासून​ खड्डेचखड्डे पडल्याने रस्त्याची चाळणी झाली आहे. सलग ६ महिने रस्ता खराब असल्याची 10 वर्षांत पहिलीच वेळ असल्याची रोज प्रवास करणारे त्रस्त प्रवासी सांगत आहे. प्रवासी आणि रुग्णांना याचा त्रास होत असूनही संबंधित विभागाचे अधिकारी सुस्त असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

पर्यटनाची राजधानी असलेल्या औरंगाबाद शहरात मराठवाडा, विदर्भातून​ येणाऱ्या पर्यटकांचे शहरात प्रवेश करतात खड्ड्यांच्या रांगोळीने स्वागत होतं आहे. महामार्गावर​ मोठमोठ्या खड्ड्यांमुळे रस्त्याची​मोठी दुरवस्था झाली आहे. कॅंब्रिज शाळा ते चिकलठाणा​ हा रस्ता धोकादायक बनला आहे. हा रस्ता शहरात येणारा​मुख्य रस्ता व​ महामार्ग असूनही याच्या दुरुस्तीकडे​संबंधित विभागाचे​दुर्लक्ष होत आहे. खड्ड्यांमुळे महामार्गावर रोज छोटे मोठे अपघात होत आहेत. यामुळे जिव मुठीत धरून दोन तीन किलोमीटर अंतर पार करावे लागत असून अनेकांना अपंगत्वाला सामोरे जावे लागतं आहे. काही दिवसांपूर्वीचं खड्डा वाचविण्याच्या प्रयत्नात एका बाईकस्वाराचा अपघात होऊन जीव गमवावा लागला होता. प्रवासी, रुग्ण आणि वाहनचालक त्रस्त असूनही या मार्गाच्या दुरुस्तीसाठी संबंधित विभाग गेल्या सहा महिन्यापासून झोपेचं सोंग घेत गप्प असल्याचा संताप नागरिकांनी व्यक्त केला आहे .

जवळपास दीड किलोमीटरचा रस्ता अत्यंत खराब आहे. खड्यांमुळे प्रचंड मनस्ताप होत असून वाहनांचेही नुकसान होत आहे. वयस्कर मंडळींना मणक्याचे त्रास उद्भवत आहेत. संबंधित विभागाने थोडी शरम वाटू द्यावी व तात्काळ रस्ता दुरुस्ती करावी. - रवी शिरसाठ, रहिवासी, सुंदरवाडी.

अपघाताच्या भीतीने कमी वेगात गाडी चालवावी लागते. त्यामुळे या मार्गावर सतत वाहनकोंडी होत आहे. यामुळे प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे.- बद्री शिंदे, हॉटेल चालक, झाल्टा

टॅग्स :AurangabadऔरंगाबादPotholeखड्डे