शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

आंबेडकरवादाचा नवा आयाम रुजवा, बाबासाहेबांना अधिक व्यापक करा : बाळासाहेब आंबेडकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2018 13:33 IST

‘सामूहिक जीवनाचा’ आंबेडकरवादाचा नवा आयाम रुजवा, बाबासाहेब अधिक व्यापक करा’, असे आवाहन भारिप-बहुजन महासंघाचे नेते अ‍ॅड. बाळासाहेब आंबेडकर यांनी केले.

ठळक मुद्दे‘बाबासाहेबांचा राष्ट्रवाद’ या मुद्यापासून बाळासाहेबांनी आपली मांडणी सुरू केली. आरएसएस सांस्कृतिक राष्ट्रवादाची भाषा करतो; पण याबाबतची मांडणी त्यांच्याकडे नाही.

औरंगाबाद : ‘सामूहिक जीवनाचा’ आंबेडकरवादाचा नवा आयाम रुजवा, बाबासाहेब अधिक व्यापक करा’, असे आवाहन भारिप-बहुजन महासंघाचे नेते अ‍ॅड. बाळासाहेब आंबेडकर यांनी केले. अनुसूचित जाती, जमाती व बौद्ध आयुर्विमा कर्मचारी कल्याण संघटनेच्या वतीने रविवारी ( दि. ८ ) आयोजित डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संघटनेचे औरंगाबाद विभागीय अध्यक्ष अशोकराव कुशेर होते. 

‘बाबासाहेबांचा राष्ट्रवाद’ या मुद्यापासून बाळासाहेबांनी आपली मांडणी सुरू केली. आरएसएस सांस्कृतिक राष्ट्रवादाची भाषा करतो; पण याबाबतची मांडणी त्यांच्याकडे नाही. केवळ या शब्दाचा वापर ते करतात. संस्कृती वेगवेगळी असेल तर त्यातून आपुलकीची भावना जोपासली जात नाही. आंबेडकरवादाचा आढावा घेताना आपण महात्मा गांधी यांच्याजवळ येऊन अटकतो, असे सांगत गांधी-आंबेडकर यांच्यातील वैचारिक मतभेदांसह काही साम्यस्थळेही त्यांनी दाखवली. 

उमेदवार हा प्रतिनिधी असतोबाळासाहेबांच्या आधी अध्यक्षीय समारोप करताना अशोकराव कुशेर यांनी सांगितले होते की, आगामी निवडणुकांमध्ये ंिजंकणारा उमेदवार द्या. हा धागा पकडत बाळासाहेब म्हणाले, उमेदवार जिंकणारा नसतोच. त्याला जिंकून देणारा विचार प्रवाह असतो. या प्रवाहानेच हे ठरवण्याची गरज असते. यापुढे व्यक्तिगत जीवनाचा फंडा नको. सामूहिक जीवनाचा फंडा विकसित करण्याची गरज आहे आणि सामाजिक लोकशाहीबरोबरच कौटुंबिक लोकशाहीही रुजवली गेली पाहिजे. 

भीमा-कोरेगाव दंगलीच्या पार्श्वभूमीवर बाळासाहेब काय बोलतात या  उत्सुकतेपोटी भानुदास चव्हाण सभागृहात मोठी गर्दी झाली होती. अत्यंत शांततेत त्यांचे भाषण उपस्थित सारेच जण ऐकत होते. प्रारंभी, संघटनेचे सरचिटणीस टी.डी. काकडे यांनी प्रास्ताविक केले. ११७ व्या घटना दुरुस्तीवर इतर नेते कुणी बोलत नाहीत. बाळासाहेबांचं त्यावर चिंतन आहे, याकडे भीमराव सरवदे यांनी लक्ष वेधले. प्रारंभी, बाबासाहेबांच्या प्रतिमेचे पूजन करून बाळासाहेबांनी दीपप्रज्वलन केले. संध्या पंडागळे यांनी सूत्रसंचालन केले, तर नंदकुमार सोनवणे यांनी आभार मानले.

‘आठवणींचे पक्षी ’आवडते आत्मकथन‘दलित पँथर चळवळीच्या काळात अनेक आत्मकथने आली. त्यातील प्र. ई. सोनकांबळे यांचे ‘आठवणीचे पक्षी’ हे माझे आवडते आत्मकथन. बाकीचे आत्मकथन मला कृत्रिम वाटतात. ओढूनताणून लिहिलेली वाटतात’ असा आरोप आंबेडकर यांनी यावेळी केला. ते म्हणाले, व्यक्तीची प्रगती हा फंडा पँथरच्या काळात होता. तो आवश्यकही होता. त्यातूनच आत्मकथन आले. यावेळी प्रबुद्ध भारत या नावाने संघटनेतर्फे तीन लाखांच्या धनादेशाचा व ओबीसी संघटनेतर्फे २५ हजारांच्या मदतीचा स्वीकार आंबेडकर यांनी केला.

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरdr. babasaheb ambedkar birthday celebrationडॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीSocialसामाजिकPoliticsराजकारण