शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
3
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
4
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
5
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
6
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
7
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
8
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
9
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
10
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
11
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
12
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
13
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
14
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
15
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
16
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
17
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
18
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
19
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
20
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे

आंबेडकरवादाचा नवा आयाम रुजवा, बाबासाहेबांना अधिक व्यापक करा : बाळासाहेब आंबेडकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2018 13:33 IST

‘सामूहिक जीवनाचा’ आंबेडकरवादाचा नवा आयाम रुजवा, बाबासाहेब अधिक व्यापक करा’, असे आवाहन भारिप-बहुजन महासंघाचे नेते अ‍ॅड. बाळासाहेब आंबेडकर यांनी केले.

ठळक मुद्दे‘बाबासाहेबांचा राष्ट्रवाद’ या मुद्यापासून बाळासाहेबांनी आपली मांडणी सुरू केली. आरएसएस सांस्कृतिक राष्ट्रवादाची भाषा करतो; पण याबाबतची मांडणी त्यांच्याकडे नाही.

औरंगाबाद : ‘सामूहिक जीवनाचा’ आंबेडकरवादाचा नवा आयाम रुजवा, बाबासाहेब अधिक व्यापक करा’, असे आवाहन भारिप-बहुजन महासंघाचे नेते अ‍ॅड. बाळासाहेब आंबेडकर यांनी केले. अनुसूचित जाती, जमाती व बौद्ध आयुर्विमा कर्मचारी कल्याण संघटनेच्या वतीने रविवारी ( दि. ८ ) आयोजित डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संघटनेचे औरंगाबाद विभागीय अध्यक्ष अशोकराव कुशेर होते. 

‘बाबासाहेबांचा राष्ट्रवाद’ या मुद्यापासून बाळासाहेबांनी आपली मांडणी सुरू केली. आरएसएस सांस्कृतिक राष्ट्रवादाची भाषा करतो; पण याबाबतची मांडणी त्यांच्याकडे नाही. केवळ या शब्दाचा वापर ते करतात. संस्कृती वेगवेगळी असेल तर त्यातून आपुलकीची भावना जोपासली जात नाही. आंबेडकरवादाचा आढावा घेताना आपण महात्मा गांधी यांच्याजवळ येऊन अटकतो, असे सांगत गांधी-आंबेडकर यांच्यातील वैचारिक मतभेदांसह काही साम्यस्थळेही त्यांनी दाखवली. 

उमेदवार हा प्रतिनिधी असतोबाळासाहेबांच्या आधी अध्यक्षीय समारोप करताना अशोकराव कुशेर यांनी सांगितले होते की, आगामी निवडणुकांमध्ये ंिजंकणारा उमेदवार द्या. हा धागा पकडत बाळासाहेब म्हणाले, उमेदवार जिंकणारा नसतोच. त्याला जिंकून देणारा विचार प्रवाह असतो. या प्रवाहानेच हे ठरवण्याची गरज असते. यापुढे व्यक्तिगत जीवनाचा फंडा नको. सामूहिक जीवनाचा फंडा विकसित करण्याची गरज आहे आणि सामाजिक लोकशाहीबरोबरच कौटुंबिक लोकशाहीही रुजवली गेली पाहिजे. 

भीमा-कोरेगाव दंगलीच्या पार्श्वभूमीवर बाळासाहेब काय बोलतात या  उत्सुकतेपोटी भानुदास चव्हाण सभागृहात मोठी गर्दी झाली होती. अत्यंत शांततेत त्यांचे भाषण उपस्थित सारेच जण ऐकत होते. प्रारंभी, संघटनेचे सरचिटणीस टी.डी. काकडे यांनी प्रास्ताविक केले. ११७ व्या घटना दुरुस्तीवर इतर नेते कुणी बोलत नाहीत. बाळासाहेबांचं त्यावर चिंतन आहे, याकडे भीमराव सरवदे यांनी लक्ष वेधले. प्रारंभी, बाबासाहेबांच्या प्रतिमेचे पूजन करून बाळासाहेबांनी दीपप्रज्वलन केले. संध्या पंडागळे यांनी सूत्रसंचालन केले, तर नंदकुमार सोनवणे यांनी आभार मानले.

‘आठवणींचे पक्षी ’आवडते आत्मकथन‘दलित पँथर चळवळीच्या काळात अनेक आत्मकथने आली. त्यातील प्र. ई. सोनकांबळे यांचे ‘आठवणीचे पक्षी’ हे माझे आवडते आत्मकथन. बाकीचे आत्मकथन मला कृत्रिम वाटतात. ओढूनताणून लिहिलेली वाटतात’ असा आरोप आंबेडकर यांनी यावेळी केला. ते म्हणाले, व्यक्तीची प्रगती हा फंडा पँथरच्या काळात होता. तो आवश्यकही होता. त्यातूनच आत्मकथन आले. यावेळी प्रबुद्ध भारत या नावाने संघटनेतर्फे तीन लाखांच्या धनादेशाचा व ओबीसी संघटनेतर्फे २५ हजारांच्या मदतीचा स्वीकार आंबेडकर यांनी केला.

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरdr. babasaheb ambedkar birthday celebrationडॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीSocialसामाजिकPoliticsराजकारण