शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादावरून राजनाथ सिंह यांनी चीनसमोरच केलं पाकिस्तानचं वस्त्रहरण, म्हणाले...  
2
धक्कादायक! डीजेच्या प्रेमात मुलगी आंधळी झाली, प्रियकराला घरी बोलावून आईची हत्या केली
3
सर्व ऑनलाइन पासवर्ड बदला; सरकारच्या नागरिकांना सूचना, १६ अब्ज पासवर्ड हॅकर्सनी लांबविले
4
आजचे राशीभविष्य - २६ जून २०२५, या राशीच्या मंडळींना सरकारकडून लाभ होईल, धन, मान-सन्मान वाढेल
5
Viral Video: जीव वाचवण्यासाठी थेट बिबट्याशी भिडला, मजुराचं धाडस पाहून अंगावर येईल काटा! पाहा व्हिडीओ
6
चांदीच्या ताटात न दिलेल्या जेवणाची चर्चा जोरदार; आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा
7
वीज कमी वापरणाऱ्यांना स्वस्त दर; जास्त वापरल्यास बिलात ‘झटका’, किती युनिटपर्यंत दिलासा?
8
अहिल्यानगर हादरले! आठवीच्या विद्यार्थ्याने केला दहावीच्या विद्यार्थ्याचा खून; क्रिकेटच्या वादातून शाळेतच संपवले
9
पंचगंगा, चंद्रभागेला पूर, भीमा नदीत ६३ हजार क्युसेकचा विसर्ग सुरू; विदर्भाला पावसाचा दिलासा 
10
अग्रलेख: इराण विरुद्ध इस्रायल; युद्ध संपले, की तात्पुरते थांबले?
11
समृद्धी महामार्गावर आता २४ तास खड्डे दुरुस्तीपथक; देखभाल-दुरुस्तीचे काम कंत्राटदारामार्फत नियमित
12
जमीन सरकारी, वापरण्याचा हक्क सरकारलाच; मोघरपाड्यात मेट्रो कार शेड उभारण्याचा मार्ग मोकळा
13
‘गडकरी’ सुरू झाल्याखेरीज ‘घाणेकर’ बंद होणार नाही! ठाणे महापालिकेने मांडली स्पष्ट भूमिका
14
विशेष लेख: माझ्या मनात पाल का चुकचुकते आहे?
15
विधानसभा निकाल रद्द करण्याची मागणी फेटाळली; याचिका करून कोर्टाचा वेळ वाया घालवला : हायकोर्ट
16
लेख : मेट्रोच्या डब्यात वाढदिवस, लग्ने साजरी होतात, तेव्हा...
17
एसटी महामंडळाच्या २ हजार बसेस भंगारात; ‘एमएसटीसी’च्या माध्यमातून करण्यात येणार लिलाव
18
भरती-ओहोटीचे सर्वेक्षण वाढवणवासियांनी उधळले; आयटीडीसी पथकाला पिटाळले
19
उद्योगस्नेही वातावरणामुळे महाराष्ट्रात देशातील सर्वाधिक गुंतवणूक -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
20
तरुणांनी प्रामाणिकपणा, नवकल्पनांसह परंपरा पुढे न्यावी : मंत्री आदिती तटकरे

राणा दाम्पत्य हनुमान चालीसा वाचते, याच्याशी सर्वसामान्यांना काही देणघेण नाही: सुजय विखे पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2022 17:08 IST

राष्ट्रवादी कॉंग्रेस शिवसेना संपविण्यासाठी अग्रेसर आहे, हे मुख्यमंत्र्यांना कळायला हव.

औरंगाबाद : राणा दाम्पत्य हनुमान चालीसा वाचतायत याच्याशी सर्वसामान्यांना काही देणेघेण नाही. आजूबाजूला जो बोगसपणा सुरु आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या दैनदिन जीवनात काय बदल होणार आहे ? राज्यातील जनतेला हे सर्व पहावे लागते, ही फार मोठी शोकांतिका आहे. राज्य भारनियमनमुक्त व्हावे यासाठी सर्वपक्षांनी पुढाकार घ्यावा, शेती प्रश्नांवर बोलावे, असे आवाहन खासदार सुजय विखे यांनी आज केले. ते शेंद्रा येथे एका कार्यक्रमासाठी आले असता माध्यम प्रतिनिधींची बोलत होते. 

मातोश्री समोर हनुमान चालीसा पठण करण्याच्या कारणावरून मुंबईत मोठा राडा झाला. यात राणा दाम्पत्य सध्या कोठडीत आहे. यावर खासदार सुजय विखे पाटील यांनी अत्यंत रोखठोक प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, राज्यात सध्या भारनियमन सुरु आहे. यामुळे ग्रामीण भागात शेतकरी त्रस्त आहे. तसेच दुध दराचा प्रश्न आहेच. यावर कोणी बोलत नाही हे दुर्दैव आहे. सर्व पक्षांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोले पाहिजे. सध्या जे सुरु आहे त्याचा सर्वसामान्यांशी काही संबंध नाही. राणा दाम्पत्यांच्या हनुमान चालीसा पठणाने शेतकऱ्यांच्या जीवानात काही फरक पडणार नाही, असा टोलाही खासदार सुजय विखे यांनी लगावला.  

राष्ट्रवादी शिवसेनेला दोन वर्षात संपवणार एकीकडे एका पक्षांचे कार्यकर्ते नेत्याला सुरक्षित ठेवण्यासाठी रस्त्यावर आहेत. तर दुसरीकडे राष्ट्रवादीचा संकल्प मेळावा सुरु आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस शिवसेना संपविण्यासाठी अग्रेसर आहे, हे मुख्यमंत्र्यांना कळायला हव. त्यांनी आज जर यावर निर्णय घेतला नाही तर दोन वर्षात शिवसेना राहणार नाही. राष्ट्रवादी कॉंग्रेसचा अजेंडा शिवसेना संपविण्याचा आहे. तो त्यांनी वेळीच ओळखावा. जेवढ्या लवकर शिवसेना हा अजेंडा ओळखेल तेवढ्या लवकर पक्ष सावरले, असा सल्लाही खासदार सुजय विखे यांनी दिला.  

टॅग्स :Sujay Vikheसुजय विखेFarmerशेतकरीagricultureशेतीnavneet kaur ranaनवनीत कौर राणा