शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

राणा दाम्पत्य हनुमान चालीसा वाचते, याच्याशी सर्वसामान्यांना काही देणघेण नाही: सुजय विखे पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2022 17:08 IST

राष्ट्रवादी कॉंग्रेस शिवसेना संपविण्यासाठी अग्रेसर आहे, हे मुख्यमंत्र्यांना कळायला हव.

औरंगाबाद : राणा दाम्पत्य हनुमान चालीसा वाचतायत याच्याशी सर्वसामान्यांना काही देणेघेण नाही. आजूबाजूला जो बोगसपणा सुरु आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या दैनदिन जीवनात काय बदल होणार आहे ? राज्यातील जनतेला हे सर्व पहावे लागते, ही फार मोठी शोकांतिका आहे. राज्य भारनियमनमुक्त व्हावे यासाठी सर्वपक्षांनी पुढाकार घ्यावा, शेती प्रश्नांवर बोलावे, असे आवाहन खासदार सुजय विखे यांनी आज केले. ते शेंद्रा येथे एका कार्यक्रमासाठी आले असता माध्यम प्रतिनिधींची बोलत होते. 

मातोश्री समोर हनुमान चालीसा पठण करण्याच्या कारणावरून मुंबईत मोठा राडा झाला. यात राणा दाम्पत्य सध्या कोठडीत आहे. यावर खासदार सुजय विखे पाटील यांनी अत्यंत रोखठोक प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, राज्यात सध्या भारनियमन सुरु आहे. यामुळे ग्रामीण भागात शेतकरी त्रस्त आहे. तसेच दुध दराचा प्रश्न आहेच. यावर कोणी बोलत नाही हे दुर्दैव आहे. सर्व पक्षांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोले पाहिजे. सध्या जे सुरु आहे त्याचा सर्वसामान्यांशी काही संबंध नाही. राणा दाम्पत्यांच्या हनुमान चालीसा पठणाने शेतकऱ्यांच्या जीवानात काही फरक पडणार नाही, असा टोलाही खासदार सुजय विखे यांनी लगावला.  

राष्ट्रवादी शिवसेनेला दोन वर्षात संपवणार एकीकडे एका पक्षांचे कार्यकर्ते नेत्याला सुरक्षित ठेवण्यासाठी रस्त्यावर आहेत. तर दुसरीकडे राष्ट्रवादीचा संकल्प मेळावा सुरु आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस शिवसेना संपविण्यासाठी अग्रेसर आहे, हे मुख्यमंत्र्यांना कळायला हव. त्यांनी आज जर यावर निर्णय घेतला नाही तर दोन वर्षात शिवसेना राहणार नाही. राष्ट्रवादी कॉंग्रेसचा अजेंडा शिवसेना संपविण्याचा आहे. तो त्यांनी वेळीच ओळखावा. जेवढ्या लवकर शिवसेना हा अजेंडा ओळखेल तेवढ्या लवकर पक्ष सावरले, असा सल्लाही खासदार सुजय विखे यांनी दिला.  

टॅग्स :Sujay Vikheसुजय विखेFarmerशेतकरीagricultureशेतीnavneet kaur ranaनवनीत कौर राणा