शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
4
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
5
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
6
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
7
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
8
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
9
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
10
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
11
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
12
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
13
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
14
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
15
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
16
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
17
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
18
नाशिक: मुलासोबत ट्रेकिंगला गेले अन् पांडव लेणीच्या डोंगरावर अडकले; नंतर...
19
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
20
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!

नागरिकत्व कायद्याच्या समर्थनार्थ मराठवाडा विदर्भात ठिकठिकाणी रॅली

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2019 05:45 IST

भाजपसह हिंदुत्ववादी संघटनांचा सहभाग : मोदी सरकारच्या धोरणांना पाठिंबा

औरंगाबाद /नागपूर : राष्ट्रीय नागरिकत्त्व कायद्याच्या (सीएए) समर्थनार्थ बुधवारी औरंगाबादसह विदर्भातील तीन जिल्ह्यात विविध संघटनांच्यावतीने रॅली काढून पाठिंबा व्यक्त करण्यात आला. औरंगाबादमध्ये राष्टÑीय सुरक्षा मंचच्या वतीने सकाळी हातात तिरंगा ध्वज व घोषवाक्यांचे फलक घेऊन रॅली काढण्यात आली. क्रांतीचौकातून या रॅलीस प्रारंभ झाला. औरंगपुरा येथील महात्मा फुले दाम्पत्याच्या पुतळ्यावजळ रॅलीचे सभेत रूपांतर झाले. यावेळी मोदी-मोदी, अशी घोषवाक्ये असलेले फलक लावण्यात आले व ‘जब तक सूरज-चांद रहेगा, मोदी तेरा नाम रहेगा’ अशा घोषणाही देण्यात आल्या.

व्यापारी, उद्योजक, वकील, डॉक्टर, व मोठ्या प्रमाणावर महिलांनी या रॅलीत सहभाग घेतला. ‘एक भारतीय म्हणून माझा सीएएला पाठिंबा आहे. सीएए के सम्मान में, हम मैदान में, तिरंगे के सम्मान में, राष्टÑभक्त मैदान में,’ अशा वाक्यांचे फलक प्रत्येकाच्याच हातात होते. रॅली औरंगपुऱ्यात आल्यानंतर फुले दाम्पत्याच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. तेथेच व्यासपीठावर महाराष्टÑ विधानसभेचे माजी अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांचे भाषण झाले. या कायद्याला विरोध करणारे संघ परिवाराविरुद्ध षड्यंत्र रचत आहेत. ३० खासदारांच्या समितीत काँग्रेस, तृणमूल व शिवसेनेचेही खासदार होते. अडीच वर्षांपर्यंत यावर मंथन चालू होते. मग त्यावेळी या खासदारांनी का विरोध केला नाही? असा सवाल बागडे यांनी केला.आ. अतुल सावे, भाजपचे शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी, मधुकर जाधव, पुरुषोत्तम हेडा, माजी खा. जयसिंगराव गायकवाड, डॉ. दिवाकर कुलकर्णी, माजी उपमहापौर विजय औताडे आदी रॅलीत सहभागी झाले होते.अब हम खुश है...पाकिस्तानातून औरंगाबादेत येऊन अनेक वर्षे राहत असलेल्या काही बांधवांचा यावेळी सत्कार करण्यात आला. आशिष नावंदर यांनी सीएए कायद्याची माहिती दिली, तसेच या कायद्याविषयी माहिती देणारी पत्रके वाटण्यात आली. ‘आमचा पाकिस्तानात खूप छळ झाला. मंदिर, दुकाने जाळून टाकण्यात आली. धर्मपरिवर्तन करा नाही तर भारतात जा, असे सांगण्यात येत होते. सीएए कायदा केल्याने आम्ही फार खूश आहोत. आता आम्ही भारताचे नागरिक होणार, असे मनोगत त्यांनी मांडले.गोंदियात राष्टÑभक्त समाजाची रॅलीगोंदिया येथे सर्व राष्टÑभक्त समाजतर्फे या कायदाच्या समर्थनार्थ शहरातून भव्य रॅली काढण्यात आली. या रॅलीत नागरिक मोठ्या संख्येनी सहभागी झाले होते. देशाच्या सन्मानाला कुठलाही धक्का बसू देणार नाही, शिवाय यासाठी कुठलाही समझोता करणार नाही, भारत देश म्हणजे धर्मशाळा नाही. देशात घुसखोरी करणाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवा असा सूर या रॅलीतून उमटला.विदर्भात ठिकठिकाणी रॅलीच्नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या समर्थनार्थ बुधवारी विदर्भातील यवतमाळ, गोंदिया, भंडारा व वर्धा जिल्ह्यात ठिकठिकाणी भव्य रॅली काढण्यात आल्या. यवतमाळ येथे राष्ट्रीय विचार मंचसह विविध संघटनांनी पुढाकार घेत बुधवारी येथे मोर्चा काढला.च्या मोर्चाचे नेतृत्व भाजपचे माजी केंद्रीय मंत्रीहंसराज अहीर व जिल्ह्यातील भाजपच्या पाच आमदारांनी केले. शहरातील प्रमुख मार्गावरून हा मोर्चा मार्गक्रमण करीत गेला. यावेळी कायदा देशहिताचा असल्याच्या घोषणा दिल्या.च्यावेळी भाजप आमदार मदन येरावार, आमदार प्राचार्य डॉ. अशोक उईके, आमदार डॉ. संदीप धुर्वे, आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, आमदार नामदेव ससाने, माजी आमदार दिवाकर पांडे, विजयाताई धोटे, प्रवक्ते अमोल पुसदकर, भाजप जिल्हाध्यक्ष नितीन भूतडा, माजी जिल्हाध्यक्ष राजेंद्र डांगे, प्रा. प्रवीण प्रजापती आदी उपस्थित होते.च्वर्धेत भारतीय जनता पार्टीसह विविध हिंदूत्ववादी संघटनांच्यावतीने रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये खासदार रामदास तडस यांच्यासह भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाºयांसह विविध हिंदुत्वावादी संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

 

टॅग्स :nagpurनागपूरAurangabadऔरंगाबादcitizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयक