शहरं
Join us  
Trending Stories
1
“मतांची चोरी पकडली गेली, आता भाजपाची सत्ता जायची वेळ आली आहे”; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
2
Pune Crime: चुलतीला ‘आय लव्ह यू’ म्हटल्याचा राग… हॉकी स्टिकने मारहाण करत युवकाची हत्या
3
अनिल अंबानींना १,८२८ कोटी रुपयांचा दंड? सेबी करणार मोठी कारवाई; कारण काय?
4
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
5
२.५ लाखांपर्यंत पोहोचणार सोन्याचे दर? खरेदीदारांसाठी वाईट बातमी; ६ वर्षांत २००% झालीये वाढ
6
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
7
अमेरिकेतून मायदेशी परतत आहेत भारतीय; का वाटतेय हद्दपार करण्याची भीती?
8
आधी लाबूबू डॉल जाळली, आता तीच पुन्हा समोर आली; भारती सिंह म्हणाली, "ही माझा पिच्छाच..."
9
उद्धवसेना, शरद पवार गटाला खिंडार; पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा अजित पवार गटात प्रवेश
10
पालिकांमध्ये 'एक वॉर्ड-एक नगरसेवक' पद्धत लागू करा; मनसेची राज्य निवडणूक आयुक्तांकडे मागणी
11
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
12
सुवर्णयुगाचा अंत! 'देवदास' फेम बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन, सिनेसृष्टीवर शोककळा
13
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
14
आलिशान कारमधून ३१ कोटींची ड्रग्ज तस्करी; ठाणे पालिकेचा लोगो लावून कारमधून सुरू होता कारभार
15
अग्रलेख: भटक्यांचा 'अनाथाश्रम'; कल्पना यशस्वी झाली तर मोकळेपणाने करता येईल संचार
16
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
17
आधार कार्ड, मतदार ओळखपत्र नागरिकत्वाचा पुरावा नाहीत! मतदार यादीतून वगळण्याचा अधिकार निवडणूक आयोगालाच
18
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
19
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
20
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना

आधी राखी बांधून घेतली आता म्हणतोय तुला संपवून टाकेल; तरुणाची क्लासमेटला धमकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2022 11:10 IST

राखी बांधल्यानंतर काही दिवसांतच तो तिला अनेक मुलांसोबत बोलू नको, असे सांगत होता. त्यामुळे तिला त्याचा त्रास होऊ लागला.

औरंगाबाद : वाळुज परिसरातील एका महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या तरुणी व तरुणाची ओळख झाली. या ओळखीत मैत्री वाढत गेली. तरुणाने तरुणीकडून राखीही बांधून घेतली होती. त्यानंतर काही दिवसांतच तो तिच्यावर अधिकार दाखवू लागला. इतर मुलांशी बोलू नको, असा दम देऊ लागला. दोन दिवसांपूर्वी तर तुला ‘देवगिरी’च्या कशीशसारखे संपवून टाकेन, अशी धमकी दिली. त्यामुळे हादरलेल्या तरुणीने प्राचार्यांकडे धाव घेतली. त्यानंतर दामिनी पथकाला बोलावण्यात आले. दामिनी पथकाने महाविद्यालयात जाऊन विद्यार्थिनीचे समुपदेशन करीत पोलीस ठाण्यात तिला तक्रार देण्यास घेऊन गेल्याची घटना शुक्रवारी घडली आहे.

वाळुज परिसरात एक फार्मसी कॉलेज आहे. त्या कॉलेमध्ये अरुण आणि दिव्या (नावे बदललेली आहेत) ही २० वर्षीय तरुण-तरुणी शिक्षण घेतात. अरुणने दिव्यासोबत संबंध वाढवत तिच्याकडून काही महिन्यांपूर्वी राखी बांधून घेतली होती. राखी बांधल्यानंतर काही दिवसांतच तो तिला अनेक मुलांसोबत बोलू नको, असे सांगत होता. त्यामुळे तिला त्याचा त्रास होऊ लागला. दिव्याने अरुणला समजावून सांगितले, तरी तो ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. त्याने दोन दिवसांपूर्वी तर ‘देवगिरी महाविद्यालयात जसे झाले, तसे मी तुझे करीन’, अशी धमकीच दिली. या धमकीला घाबरून दिव्याने प्राचार्यांकडे धाव घेतली. 

प्राचार्यांनी दिव्याच्या वडिलांना महाविद्यालयात बोलावून घेत त्यांच्यासमोरच अरुणला समजावून सांगितले. तरीही तो ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. त्याने उलट प्राचार्य, उपप्राचार्य आणि दिव्याच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचा मेसेज महाविद्यालयाच्या व्हाॅट्स्अप ग्रुपला टाकला. तेव्हा प्राचार्यांनी दामिनी पथकाच्या प्रमुख सहायक निरीक्षक सुषमा पवार यांना घटनेची माहिती दिली. दामिनी पथकातील नाईक आशा गायकवाड, सुजाता खरात, चालक जारवाल यांनी तत्काळ महाविद्यालय गाठले. दामिनीचे पथक आल्याची माहिती मिळताच अरुण पळून गेला.

ठाण्यात हजर केलेदामिनी पथकाने प्राचार्यांच्या मदतीने दिव्याला एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्याच्या अधिकारी उचित यांच्यासमोर हजर करत तक्रार देण्यास सांगितले. विशेष म्हणजे अरुण याने एका मुलीला अशाच प्रकारे त्रास दिल्याचे समोर आल्याची माहिती दामिनी पथकाने दिली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबाद