शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

राजू शिंदे यांचा पत्ता कट; कुलकर्णी यांची वर्णी निश्चित!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2019 00:28 IST

महापालिकेतील स्थायी समिती सभापतीपदी भाजपच्या जयश्री कुलकर्णी यांची वर्णी लावण्यात आली आहे. या पदासाठी प्रबळ दावेदार असलेले राजू शिंदे यांचा पत्ता ऐनवेळी कट करण्यात आला. सोमवारी बीड येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिंदे यांना लवकरच मोठी जबाबदारी देण्यात येणार असल्याचा शब्द दिला. महापालिकेची आर्थिक नाडी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महत्त्वाच्या पदावर पहिल्यांदाच एका महिलेची वर्णी लागणार आहे.

ठळक मुद्देस्थायी समिती सभापती : निवडणुकीत आता औपचारिकता शिल्लक

औरंगाबाद : महापालिकेतील स्थायी समिती सभापतीपदी भाजपच्या जयश्री कुलकर्णी यांची वर्णी लावण्यात आली आहे. या पदासाठी प्रबळ दावेदार असलेले राजू शिंदे यांचा पत्ता ऐनवेळी कट करण्यात आला. सोमवारी बीड येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिंदे यांना लवकरच मोठी जबाबदारी देण्यात येणार असल्याचा शब्द दिला. महापालिकेची आर्थिक नाडी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महत्त्वाच्या पदावर पहिल्यांदाच एका महिलेची वर्णी लागणार आहे.महापालिकेत शिवसेना-भाजप युतीने २०१५ मध्ये विविध पदांची आपापसात वाटणी करून घेतली. शेवटच्या वर्षातील स्थायी समिती सभापतीपद भाजपला देण्यात आले. सभापतीपदासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच शिवसेनेने दोन उमेदवारी अर्ज घेऊन भाजपच्या तंबूत खळबळ उडवून दिली. दरम्यान, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी सभापतीपदासाठी राजू शिंदे यांना उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आदेश दिला. शिंदे यांनी पक्षाच्या आदेशानुसार शुक्रवारी अर्जही भरला. त्यापाठोपाठ नगरसेविका जयश्री कुलकर्णी यांनीही अर्ज भरला. कुलकर्णी याच पक्षाच्या अधिकृत उमेदवार असल्याचे शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी यांनी जाहीर केले. त्यामुळे या महत्त्वाच्या पदावर कोणाची वर्णी लागणार याविषयी उत्सुकता निर्माण झाली होती. सोमवारी बीड येथे दिवंगतनेतेगोपीनाथ मुंडे यांच्या पाचव्या पुण्यातिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमास पक्षाचे सर्वच वरिष्ठ नेते उपस्थित होते. यावेळी स्वत: मुख्यमंत्र्यांनी कुलकर्णी यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. राजू शिंदे यांच्यावर लवकरच मोठी जबाबदारी देण्यात येणार असल्याचा शब्दही यावेळी मुख्यमंत्र्यांनी प्रदेशाध्यक्ष दानवे, विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांना दिला. मंगळवारी सकाळी राजू शिंदे आपला उमेदवारी अर्ज मागे घेणार आहेत. त्यामुळे कुलकर्णी या महापालिकेच्या इतिहासात पहिल्याच महिला सभापती ठरणार आहेत.

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाPoliticsराजकारण