शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

औरंगाबाद जिल्ह्यात मृग नक्षत्राची हजेरी; वादळी वाऱ्यासह पाऊस; वीज कोसळून तिघे ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2022 19:38 IST

जोरदार वाऱ्यासोबत वीजेच्या कडकडाटात व ढगांच्या गडगडाटात मृग नक्षत्राने हजेरी लावली.

औरंगाबाद: शहरात आणि जिल्ह्यात आज दुपारपासून पावसाचे विजांच्या गडगडाटासह जोरदार आगमन झाले. दरम्यान, पैठण येथे दोन तर सिल्लोड येथे एक असा तिघांचा वीज कोसळून मृत्यू झाला. 

सायंकाळी पैठण शहरात जोरदार वाऱ्यासोबत वीजेच्या कडकडाटात व ढगांच्या गडगडाटात मृग नक्षत्राने हजेरी लावली. मृगाचा पाऊस शेतजमीनीसाठी पोषक असल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. पैठण विहामांडवा, नवगाव, टाकळी, पिंपळवाडी, आवडे उंचेगाव, पाचो परिसर, आडूळ रजापूर असा सर्वदूर पावसाने शनिवारी दुपारनंतर हजेरी लावली. केकत जळगाव येथे शेतात काम करत असताना जवळच वीज कोसळल्याने शेतकरी गजानन दराडे (२७) यांचे ह्दय बंद पडून मृत्यू झाला तर आडगाव जावळे येथील सांडू शामराव नजन यांच्या  घरा लगत वीज कोसळल्याने सांडू नजन यांची बहीन सरूबाई शहादेव लांडे यांचा मृत्यू झाल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. दोन्ही घटनेचा पंचनामा करून अहवाल सादर करण्याचे आदेश तहसीलदार दत्ता निलावाड यांनी तलाठ्यास दिले आहेत. 

सिल्लोड तालुक्यात एकाचा मृत्यूसिल्लोड तालुक्यात वादळी वाऱ्यासह शनिवारी दुपारी पाऊस झाला काही ठिकाणी चांगला जोरदार तर काही ठिकाणी रिपरिप हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. मात्र, वादळी वारा जास्त होता. यामुळे अनेक घरे व वखारींचे  टिन पत्रे उडाली. तर तालुक्यातील सावखेडा बुद्रुक उटाडेवाडीतील एका  शेतात वीज पडून शेतकरी  जागीच ठार झाला. पालोद येथे एक म्हैस वीज पडून मरण पावली. सावखेडा येथे वीज पडून मरण पावलेल्या शेतकऱ्यांचे नाव संजय नथु उटाडे वय ४५ वर्षे रा. उटाडेवाडी सावखेडा असे आहे.ते शेतात मशागतीचे काम करत असताना अचानक दुपारी अंगावर वीज पडून त्यांचा जागीच मृत्यू झाला.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादFarmerशेतकरी