शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

राहुल गांधींच्या दौºयाने काँग्रेसमध्ये चैतन्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2017 00:16 IST

ऐन महापालिका निवडणुकीच्या प्रारंभी काँग्रेसचे राष्ट्रीय उपाध्यक्ष खा. राहूल गांधी यांचा नांदेड दौरा काँग्रेसमध्ये चैतन्य निर्माण करणारा ठरणार आहे. एकीकडे निवडणुकीची घोषणा आणि दुसºया दिवशी राहूल गांधींची सभा हा योग काँग्रेससाठी दुग्धशर्करा ठरला आहे. महापालिका निवडणुकीत या दौºयाचा काँग्रेसला निश्चितच लाभ मिळणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : ऐन महापालिका निवडणुकीच्या प्रारंभी काँग्रेसचे राष्ट्रीय उपाध्यक्ष खा. राहूल गांधी यांचा नांदेड दौरा काँग्रेसमध्ये चैतन्य निर्माण करणारा ठरणार आहे. एकीकडे निवडणुकीची घोषणा आणि दुसºया दिवशी राहूल गांधींची सभा हा योग काँग्रेससाठी दुग्धशर्करा ठरला आहे. महापालिका निवडणुकीत या दौºयाचा काँग्रेसला निश्चितच लाभ मिळणार आहे.महापालिकेच्या निवडणुकीची घोषणा बुधवारी सायंकाळी झाली. या निवडणुकीची रणनीती काँग्रेसने तयार केली आहे. त्यातच खा. राहूल गांधींचे शुक्रवारी नांदेडसह मराठवाड्यातील काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. नांदेडमध्ये होणाºया विभागीय मेळाव्यात राज्यभरातील काँग्रेस नेते नांदेडमध्ये दाखल होणार आहेत. त्यामुळे संपूर्ण शहर काँग्रेसमय होईल. महापालिकेच्या रणधुमाळीची सुरुवातच काँग्रेसकडून धडाकेबाज होत आहे. त्यामुळे आधीच विखुरलेल्या विरोधकांना सावरण्यास वेळ लागणार आहे. त्यामुळे याचा लाभ ऐन निवडणुकीत काँग्रेस निश्चितपणे उचलणार आहे. काँग्रेसच्या ध्येय धोरणांना खा. राहूल गांधी यांच्यासह राज्यभरातून आलेले नेते शुक्रवारी उजाळा देतील. त्याचवेळी देशात नोटबंदी, कर्जमाफी, जीएसटी आदी विषयामुळे असलेली अस्वस्थताही जनतेपुढे ठेवली जाईल.महापालिकेच्या स्थापनेपासून प्रारंभीचे एक वर्ष वगळता महापालिकेवर काँग्रेसचीच सत्ता आहे. ही सत्ता काबिज करण्याचे प्रयत्न होत असले तरी काँग्रेसजणांचा विजयाचा विश्वास विरोधकांना सुरुवातीपासूनच बॅकफुटवर नेणारा आहे.माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण यांचे एकहाती नेतृत्व, विकासाची ध्यास तसेच दिवंगत शंकरराव चव्हाणांचे नांदेडसह मराठवाड्यासाठी केलेले कार्यही काँग्रेसला यशाकडे नेणारे आहे. महापालिका निवडणुकीची सूत्रे महानगराध्यक्ष अमरनाथ राजूरकर आणि माजी राज्यमंत्री आ. डी.पी. सावंत यांच्या हाती सोपवल्याचे खुद्द खा. अशोकराव चव्हाण यांनी सांगितले. राजूरकरांचे आक्रमक तर सावंतांचे संयमी नेतृत्व सर्वांना एकत्र बांधणारेच ठरणार आहे.