शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
2
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
3
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
4
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
5
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
6
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
7
इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यात किती लोकांचा मृत्यू झाला? दूतावासाने जारी केली धक्कादायक आकडेवारी
8
रिक्षा, दुचाकी कचऱ्यासारख्या वाहून गेल्या; गुजरातमध्ये तुफान पाऊस, व्हिडीओ व्हायरल
9
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
10
चार दिवस कसोटीचे! रुपडं बदलणार; पण टीम इंडियासह हे २ संघ जुनी परंपरा जपणार?
11
Ashadhi Ekadashi 2025: यंदा आषाढी एकादशी आणि चतुर्मासाची सुरुवात कधी ते जाणून घ्या!
12
Mumbai: मुंबईतील दोन आंतरराष्ट्रीय शाळांना बॉम्बची धमकी, तपासात असं समजलं की...
13
Sonam Raghuwanshi: १८ मिनिटांत राजाची हत्या अन् उचलून फेकले दरीत, सोनम 'या' व्यक्तीसोबत स्कूटरवरून झाली फरार
14
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव
15
क्षण आनंदाचा! IPS वडिलांचा IAS लेकीला सॅल्यूट; पाणावले डोळे, अभिमानाने भरून आला ऊर
16
ज्याला घुसखोर म्हणून महाराष्ट्रातून हाकललं, त्याला ममता सरकारने आणखी ४ जणांसह बांगलादेशमधून परत आणलं  
17
शेतीसाठी AI धोरण मंजूर, धारावीकरांसाठी खुशखबर, 'या' लोकांचे मानधन दुप्पट; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
18
"कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी..."; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शरद पवारांचे स्पष्ट मत
19
होम लोनचा EMI भरुन-भरुन थकलायत, ही पद्धत वापरुन पाहा; लवकर संपेल तुमचं कर्ज
20
KEM Hospital: ‘केईएममध्ये नव्हे; तर आवारात पाणी तुंबले’ रुग्णालय प्रशासनाची न्यायालयाला माहिती

आता शेतकरी संघटना राजकारणाच्या आखाड्यात, रघुनाथ पाटील यांची पत्रकार परिषदेत माहिती 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2017 18:03 IST

सरकारचे धोरण शेतक-यांचे मरण असेल तर या प्रस्तापितांच्या विरोधात नवीन पर्याय निर्माण करण्या शिवाय आमच्या समोर गत्यंतर नाही. परिणामी, देशभरातील शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींनी  येथे एकत्र येऊन  शेतक-यांचा नवीन राजकीय पक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती नीती आयोगाचे तज्ञ समितीचे सदस्य व शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथ पाटील यांनी दिली. 

ठळक मुद्देसत्तेत आल्यावर भाजप सरकारने स्वामीनाथन आयोगाने सुचविलेला भाव आम्ही देणार नाही, असे न्यायालयात सांगितले. सर्वाच्च न्यायालयही हा धोरणात्मक निर्णय असल्याने आम्ही हस्तक्षेप करणार नाही, असा निर्णय दिला. प्रस्तापितांच्या विरोधात नवीन पर्याय निर्माण करण्या शिवाय आमच्या समोर गत्यंतर नाही.

औरंगाबाद : काँग्रेसने शेतीमालाला भाव दिला नाही म्हणून भारतीय जनता पार्टीला निवडून आणले. मात्र, सत्तेत आल्यावर त्यांनी स्वामीनाथन आयोगाने सुचविलेला भाव आम्ही देणार नाही, असे न्यायालयात सांगितले. सर्वाच्च न्यायालयही हा धोरणात्मक निर्णय असल्याने आम्ही हस्तक्षेप करणार नाही, असा निर्णय दिला. सरकारचे धोरण शेतक-यांचे मरण असेल तर या प्रस्तापितांच्या विरोधात नवीन पर्याय निर्माण करण्या शिवाय आमच्या समोर गत्यंतर नाही. परिणामी, देशभरातील शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींनी  येथे एकत्र येऊन  शेतक-यांचा नवीन राजकीय पक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती नीती आयोगाचे तज्ञ समितीचे सदस्य व शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथ पाटील यांनी दिली. 

औरंगाबादेत शुक्रवारी आयोजित पत्रपरिषदेत रघुनाथ पाटील यांनी सरकार सोबतच विरोधी पक्ष काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसवरही सडकून टिका केली. ज्यांनी सत्तेत असताना शेतीमालाला कधीच योग्य भाव दिला नाही. तेच आज जनआक्रोश व हल्लाबोल मोर्चा काढत आहे. त्यांना असा मोर्चा काढण्याचा काहीच अधिकार नाही.  सत्तेच्या बाहेर गेल्यावर आता सगळे सांगतात कर्जची परतफेड करु नका, वीजबील भरू नका. मग सत्तेत होते तेव्हा त्यांनी काय केले, असा प्रश्नही पाटील यांनी उपस्थित केला. ते पुढे म्हणाले की,  नेहमी विरोधी पक्ष शेतक-यांच्या बाजूने बोलत असतो.  पण तोच पक्ष सत्तेत गेल्यावर शेतक-यांचे प्रश्न, दु:ख विसरून जातो. हा अनुभव  सातत्याने येत आहे चार वेळा देशातील सरकार बदलून सुद्धा धोरण बदलत नसल्यामुळे आम्ही शेतक-यांचे प्रश्न मांडणारे खासदार लोकसभेत पाठविण्यासाठी नवीन पक्ष स्थापन करणार आहोत. अजून नवीन पक्षाचे नाव निचित केले नाही.  याबाबत लवकरच अलाहबाद येथे देशभरातील शेतकरी संघटनांची बैठक आहे. त्या राजकीय पक्षाच्या नावा संदर्भात चर्चा होणार असल्याचे त्यांनी नमूद केले. 

आगामी लोकसभा लढवणार प्रस्तापितांच्या विरोधात नवीन पर्याय निर्माण करण्यासाठी शेतकरी संघटना राजकारणात उतरणार आहे. तसेच २०१९ मध्ये होणा-या लोकसभा निवडणूकीत आमचा नवीन पक्ष देशभरात उमेदवार उभे करणार आहे, अशी घोषणाही यावेळी रघुनाथ पाटील यांनी केली. 

टॅग्स :PoliticsराजकारणFarmerशेतकरी