शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
2
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
3
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
4
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
6
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
7
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
8
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
9
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
10
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
11
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
12
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
13
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
14
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
15
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
16
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
17
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
18
डे-वन टेक-ऑफ घेण्यासाठी नवी मुंबई विमानतळ सज्ज; २५ डिसेंबरपासून व्यावसायिक उड्डाणांना हाेणार सुरुवात
19
आज मुंबई आयआयटीत  रंगणार ‘टेकफेस्ट’चा जागर; तंत्रज्ञानाचा महाकुंभ अनुभवण्याची तरुणाईला संधी
20
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
Daily Top 2Weekly Top 5

आता शेतकरी संघटना राजकारणाच्या आखाड्यात, रघुनाथ पाटील यांची पत्रकार परिषदेत माहिती 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2017 18:03 IST

सरकारचे धोरण शेतक-यांचे मरण असेल तर या प्रस्तापितांच्या विरोधात नवीन पर्याय निर्माण करण्या शिवाय आमच्या समोर गत्यंतर नाही. परिणामी, देशभरातील शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींनी  येथे एकत्र येऊन  शेतक-यांचा नवीन राजकीय पक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती नीती आयोगाचे तज्ञ समितीचे सदस्य व शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथ पाटील यांनी दिली. 

ठळक मुद्देसत्तेत आल्यावर भाजप सरकारने स्वामीनाथन आयोगाने सुचविलेला भाव आम्ही देणार नाही, असे न्यायालयात सांगितले. सर्वाच्च न्यायालयही हा धोरणात्मक निर्णय असल्याने आम्ही हस्तक्षेप करणार नाही, असा निर्णय दिला. प्रस्तापितांच्या विरोधात नवीन पर्याय निर्माण करण्या शिवाय आमच्या समोर गत्यंतर नाही.

औरंगाबाद : काँग्रेसने शेतीमालाला भाव दिला नाही म्हणून भारतीय जनता पार्टीला निवडून आणले. मात्र, सत्तेत आल्यावर त्यांनी स्वामीनाथन आयोगाने सुचविलेला भाव आम्ही देणार नाही, असे न्यायालयात सांगितले. सर्वाच्च न्यायालयही हा धोरणात्मक निर्णय असल्याने आम्ही हस्तक्षेप करणार नाही, असा निर्णय दिला. सरकारचे धोरण शेतक-यांचे मरण असेल तर या प्रस्तापितांच्या विरोधात नवीन पर्याय निर्माण करण्या शिवाय आमच्या समोर गत्यंतर नाही. परिणामी, देशभरातील शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींनी  येथे एकत्र येऊन  शेतक-यांचा नवीन राजकीय पक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती नीती आयोगाचे तज्ञ समितीचे सदस्य व शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथ पाटील यांनी दिली. 

औरंगाबादेत शुक्रवारी आयोजित पत्रपरिषदेत रघुनाथ पाटील यांनी सरकार सोबतच विरोधी पक्ष काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसवरही सडकून टिका केली. ज्यांनी सत्तेत असताना शेतीमालाला कधीच योग्य भाव दिला नाही. तेच आज जनआक्रोश व हल्लाबोल मोर्चा काढत आहे. त्यांना असा मोर्चा काढण्याचा काहीच अधिकार नाही.  सत्तेच्या बाहेर गेल्यावर आता सगळे सांगतात कर्जची परतफेड करु नका, वीजबील भरू नका. मग सत्तेत होते तेव्हा त्यांनी काय केले, असा प्रश्नही पाटील यांनी उपस्थित केला. ते पुढे म्हणाले की,  नेहमी विरोधी पक्ष शेतक-यांच्या बाजूने बोलत असतो.  पण तोच पक्ष सत्तेत गेल्यावर शेतक-यांचे प्रश्न, दु:ख विसरून जातो. हा अनुभव  सातत्याने येत आहे चार वेळा देशातील सरकार बदलून सुद्धा धोरण बदलत नसल्यामुळे आम्ही शेतक-यांचे प्रश्न मांडणारे खासदार लोकसभेत पाठविण्यासाठी नवीन पक्ष स्थापन करणार आहोत. अजून नवीन पक्षाचे नाव निचित केले नाही.  याबाबत लवकरच अलाहबाद येथे देशभरातील शेतकरी संघटनांची बैठक आहे. त्या राजकीय पक्षाच्या नावा संदर्भात चर्चा होणार असल्याचे त्यांनी नमूद केले. 

आगामी लोकसभा लढवणार प्रस्तापितांच्या विरोधात नवीन पर्याय निर्माण करण्यासाठी शेतकरी संघटना राजकारणात उतरणार आहे. तसेच २०१९ मध्ये होणा-या लोकसभा निवडणूकीत आमचा नवीन पक्ष देशभरात उमेदवार उभे करणार आहे, अशी घोषणाही यावेळी रघुनाथ पाटील यांनी केली. 

टॅग्स :PoliticsराजकारणFarmerशेतकरी