शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

आता शेतकरी संघटना राजकारणाच्या आखाड्यात, रघुनाथ पाटील यांची पत्रकार परिषदेत माहिती 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2017 18:03 IST

सरकारचे धोरण शेतक-यांचे मरण असेल तर या प्रस्तापितांच्या विरोधात नवीन पर्याय निर्माण करण्या शिवाय आमच्या समोर गत्यंतर नाही. परिणामी, देशभरातील शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींनी  येथे एकत्र येऊन  शेतक-यांचा नवीन राजकीय पक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती नीती आयोगाचे तज्ञ समितीचे सदस्य व शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथ पाटील यांनी दिली. 

ठळक मुद्देसत्तेत आल्यावर भाजप सरकारने स्वामीनाथन आयोगाने सुचविलेला भाव आम्ही देणार नाही, असे न्यायालयात सांगितले. सर्वाच्च न्यायालयही हा धोरणात्मक निर्णय असल्याने आम्ही हस्तक्षेप करणार नाही, असा निर्णय दिला. प्रस्तापितांच्या विरोधात नवीन पर्याय निर्माण करण्या शिवाय आमच्या समोर गत्यंतर नाही.

औरंगाबाद : काँग्रेसने शेतीमालाला भाव दिला नाही म्हणून भारतीय जनता पार्टीला निवडून आणले. मात्र, सत्तेत आल्यावर त्यांनी स्वामीनाथन आयोगाने सुचविलेला भाव आम्ही देणार नाही, असे न्यायालयात सांगितले. सर्वाच्च न्यायालयही हा धोरणात्मक निर्णय असल्याने आम्ही हस्तक्षेप करणार नाही, असा निर्णय दिला. सरकारचे धोरण शेतक-यांचे मरण असेल तर या प्रस्तापितांच्या विरोधात नवीन पर्याय निर्माण करण्या शिवाय आमच्या समोर गत्यंतर नाही. परिणामी, देशभरातील शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींनी  येथे एकत्र येऊन  शेतक-यांचा नवीन राजकीय पक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती नीती आयोगाचे तज्ञ समितीचे सदस्य व शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथ पाटील यांनी दिली. 

औरंगाबादेत शुक्रवारी आयोजित पत्रपरिषदेत रघुनाथ पाटील यांनी सरकार सोबतच विरोधी पक्ष काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसवरही सडकून टिका केली. ज्यांनी सत्तेत असताना शेतीमालाला कधीच योग्य भाव दिला नाही. तेच आज जनआक्रोश व हल्लाबोल मोर्चा काढत आहे. त्यांना असा मोर्चा काढण्याचा काहीच अधिकार नाही.  सत्तेच्या बाहेर गेल्यावर आता सगळे सांगतात कर्जची परतफेड करु नका, वीजबील भरू नका. मग सत्तेत होते तेव्हा त्यांनी काय केले, असा प्रश्नही पाटील यांनी उपस्थित केला. ते पुढे म्हणाले की,  नेहमी विरोधी पक्ष शेतक-यांच्या बाजूने बोलत असतो.  पण तोच पक्ष सत्तेत गेल्यावर शेतक-यांचे प्रश्न, दु:ख विसरून जातो. हा अनुभव  सातत्याने येत आहे चार वेळा देशातील सरकार बदलून सुद्धा धोरण बदलत नसल्यामुळे आम्ही शेतक-यांचे प्रश्न मांडणारे खासदार लोकसभेत पाठविण्यासाठी नवीन पक्ष स्थापन करणार आहोत. अजून नवीन पक्षाचे नाव निचित केले नाही.  याबाबत लवकरच अलाहबाद येथे देशभरातील शेतकरी संघटनांची बैठक आहे. त्या राजकीय पक्षाच्या नावा संदर्भात चर्चा होणार असल्याचे त्यांनी नमूद केले. 

आगामी लोकसभा लढवणार प्रस्तापितांच्या विरोधात नवीन पर्याय निर्माण करण्यासाठी शेतकरी संघटना राजकारणात उतरणार आहे. तसेच २०१९ मध्ये होणा-या लोकसभा निवडणूकीत आमचा नवीन पक्ष देशभरात उमेदवार उभे करणार आहे, अशी घोषणाही यावेळी रघुनाथ पाटील यांनी केली. 

टॅग्स :PoliticsराजकारणFarmerशेतकरी