शहरं
Join us  
Trending Stories
1
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
2
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
3
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
4
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
5
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
6
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
7
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
8
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
9
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
10
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
11
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
12
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
13
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
14
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
15
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
16
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
17
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
18
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
19
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
20
'या' देशात वडील मुलाला देतात कंडोम तर आई बॅगेत गर्भनिरोधक गोळ्या ठेवते; कारण ऐकून हैराण व्हाल

तंटामुक्ती अध्यक्ष निवडीवरून राडा

By admin | Updated: August 17, 2015 00:05 IST

आखाडा बाळापूर : तंटामुक्त ग्राम समितीचा अध्यक्ष निवडण्याच्या कारणावरून १५ आॅगस्टला आखाडा बाळापूरच्या ग्रामसभेतच राडा झाला. दोन गट समोरासमोर भिडल्याने तुंबळ हाणामारी झाली.

आखाडा बाळापूर : तंटामुक्त ग्राम समितीचा अध्यक्ष निवडण्याच्या कारणावरून १५ आॅगस्टला आखाडा बाळापूरच्या ग्रामसभेतच राडा झाला. दोन गट समोरासमोर भिडल्याने तुंबळ हाणामारी झाली. याप्रकरणी शिवसेना व काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांवर परस्परांविरोधी तक्रारींवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या वादामुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाल्याने अतिरिक्त कुमक मागवून पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली.बाळापूर येथील ग्रामपंचायत निवडणुक मोठी अटीतटीची झाली. काँग्रेस आणि सेनेच्या पॅनलमध्ये काट्याची टक्कर होती. तंटामुक्ती ग्राम समितीचे अध्यक्ष म. झिया कुरेशी ग्रा. पं. निवडणुकीत विजयी झाले. ते सरपंचपदाचे दावेदार असून त्यांची निवड होण्यास केवळ औपचारिकता बाकी आहे. १५ आॅगस्ट रोजी सकाळी ९ वाजता ग्रामसभा बोलाविण्यात आली होती. ग्रामसभेत तंटामुक्त ग्राम समिती अध्यक्ष निवडीची प्रक्रिया सुरू झाली. कोरम पूर्ण आहे की नाही? या कारणावरून दोन गटात बाचाबाची सुरू झाली. वाकयुद्धात शिव्यांचा वापर झाल्याने प्रकरण मारामारीवर आले. तीनशे ते साडेतीनशेचा जमाव मारामारी करीत पळू लागला. यामध्ये कोण कोणाला मारत होते हे लक्षात येत नव्हते. या घटनेमुळे अचानक गावात तणाव निर्माण झाला. याप्रकरणी शिवचरण विजयकुमार गोयंका यांच्या फिर्यादीवरून काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय बोंढारे, विजय बोंढारे दत्ता बोंढारे, नागेश बोंढारे, गोविंद बोंढारे, रूखमाजी हेंन्द्रे, संदीप बोंढारे व इतर अनोळखी पाच जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच ‘आम्ही ग्रामसभेस हजर नसताना ग्रामसभा का? घेतली या कारणावरून ग्रामसभेत गोंधळ घातला. थापडबुक्यांनी व खुर्च्यानी मारहाण करून जखमी केले व जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याच प्रकरणी परस्परांविरोधी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, ‘आम्ही तंटामुक्त अध्यक्षांची निवड करताना तू मध्ये मध्ये करून गोंधळ घालत आहेस म्हणून लोखंडी रॉडने व थापडबुक्यांनी मारहाण केली. याप्रकरणी गोविंद भीमराव बोंढारे यांच्या फिर्यादीवरून शिवचरण गोयंका, मोहनसिंग बयास, डॉ. संतोष बोंढारे, संजय इंगळे, रोहित गोयंका, लक्ष्मीकांत गोयंका, अझहरखाँ पठाण व चार ते पाच जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सपोनि पंडीत कच्छवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ शेषेराव राठोड करीत आहेत. या घटनेनंतर बाळापूर व्यापारपेठेत दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. हिंगोली येथून जादा पोलिस कुमक मागवून वातावरण शांत करण्यात आले. अप्पर पोलिस अधीक्षक नामदेव मिठ्ठेवाड यांनी भेट दिली. तसेच सेना व काँगे्रसच्या नेत्यांवर गुन्हे दाखल झाल्याने कोणाची भेट घेण्याऐवजी त्यांनी व्यापारपेठेतील मुख्य रस्त्यावरील अतिक्रमण काढण्याच्या सूचना दिल्या. उपविभागीय अधिकाऱ्यांनीही गावाला भेट दिली. (वार्ताहर)